शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डाळींब बाग केली पोपटांनी फस्त

By admin | Updated: May 22, 2016 01:55 IST

शेती करण्याची नवी ऊर्जा घेऊन पारंपरिक पिकांपासून फारकत घेत फळबागेकडे वळलेल्या युवा शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.

लाखोंचे नुकसान : तीन वर्षांचे श्रम ठरले व्यर्थघोराड : शेती करण्याची नवी ऊर्जा घेऊन पारंपरिक पिकांपासून फारकत घेत फळबागेकडे वळलेल्या युवा शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. उत्पन्न हातात येण्याची वेळ आली असताना पोपटांनी डाळींबातील गरे खात झाडाला टरफल ठेवले. या प्रकारामुळे युवा शेतकरी हतबल झाला आहे. हिंगणी येथील अजय डेकाटे या युवकाने अभियांत्रिकी पदविका घेतल्यानंतर शेतीतून अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी नाविन्यपूर्ण शेती करण्याचे ठरविले. यासाठी त्याने डाळींबाची फळबाग २०१३ मध्ये लावली. येथून तीन वर्षांनी हातात उत्पन्न येईल, ही अपेक्षा होती. फळबाग फुलली. तीन एकरांत ८०० डाळींबाची झाडे लावली. त्या प्रत्येक झाडाला ७० ते ७५ डाळींब लागले. एका डाळींबाचे वजन ७०० ते ८०० ग्रॅम होते. आजचा बाजारभाव पाहता एक डाळींब ८० ते ९० रुपयांत विकले गेले असते; पण ऐन डाळींब तोडणीची वेळ आली आणि पोपटाच्या थव्यांनी या डाळींब बागेवर बस्तान बसविले. या पोपटांनी शेतकऱ्याला मिळणाऱ्या १५ ते १७ लाखांच्या उत्पन्नावर घाला घातला. डाळींबातील गरे फक्त केली अन टरफले झाडाला ठेवली. नापिकी व कर्जबाजारीपणापासून मुक्तता मिळावी म्हणून निवडलेला मार्गही खडतर झाल्याचे दुख: उराशी बाळगून शासकीय यंत्रणेकडे मदतीसाठी धाव घेतली. वनविभाग, जिल्हाधिकारी, कृषी विभागाला निवेदन दिली. गत आठ दिवसांपासून हा युवा शेतकरी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहे. ही फळबाग स्व-खर्चाने लावलेली असल्याने पहिल्याच उत्पन्नाच्या आशेवर पोपटांनी पाणी फेरले. या शेतकऱ्याच्या पाठोपाठ अनेक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहे. कृषी विभाग तसेच मनरेगातून अनेकांनी फळबागा लावल्या; पण अशी संकटे आल्यास फळाचे संगोपण व रक्षण कसे करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे शासनाने या शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)