शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

धाम नदीपात्राला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:48 IST

येथील धाम नदीपात्रातील प्रदूषणाने यावर्षी कळस गाठला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जन झाल्याने गाळ साचून पाण्याचा प्रवाह अवरूद्ध झाला आहे. परिणामी, पाणी पूर्णपणे दूषित झालेले आहे. प्रदूषणामुळे धाम नदीचा श्वास गुदमरू लागला आहे.

ठळक मुद्देमूर्ती विसर्जनाने गाळ साचला : रासायनिक रंगांनी पाणी दूषित

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : येथील धाम नदीपात्रातील प्रदूषणाने यावर्षी कळस गाठला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जन झाल्याने गाळ साचून पाण्याचा प्रवाह अवरूद्ध झाला आहे. परिणामी, पाणी पूर्णपणे दूषित झालेले आहे. प्रदूषणामुळे धाम नदीचा श्वास गुदमरू लागला आहे.या समस्येवर जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना न झाल्यास नागरिकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यात जिल्हा प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला कोणताही रस नसल्याचे चित्र दिसत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून नदीपात्रात मूर्तीचा गाळ आणि तणस पडून असल्याने ते जागीच सडले. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी सुटली आहे. धाम नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. त्यामुळे नदीपात्र पूर्णत: दूषित झाले आहे. पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. अनेक मूर्ती पाण्यात बुडत नसल्याने त्या तशाच अवस्थेत पडून आहेत. या वर्षी एकाच ठिकाणी मूर्ती विसर्जन झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने नदीपात्रात पाणी नाही.दरवर्षी वाहते पाणी राहत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळ साचत नव्हता. मात्र आता डोहातील पाण्यात पूर्णपणे गाळा जमा झाला आहे. याच नदीपात्रातून पवनार येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा होतो. या अशुद्ध पाण्यामुळे रोगराई पसरण्यास सुरूवात झाली आहे. मात्र असे असले तरी यावर कोणतीही उपाययोजना करण्यास स्थानिक ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने सुरूवात केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.