शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

राजकीय कस पणाला

By admin | Updated: June 27, 2015 02:46 IST

जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असली तरी विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ बघता भाजपाला ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही.

वर्धा : जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असली तरी विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ बघता भाजपाला ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही.त्यातही वर्धा व देवळी बाजार समित्यांमध्ये भाजपाने प्रत्येकी १५ जागांवरच आपले उमेदवार उभे केले आहे. एका बाजुने खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, विजय मुडे दुसऱ्या बाजुने माजी राज्यमंत्री आ. रणजित कांबळे व सहकार नेते म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यात अप्रत्यक्ष सामना रंगणार आहे. हेच चित्र सेलू बाजार समितीमध्येही बघायला मिळणार आहे. आर्वी व आष्टी-कारंजा बाजार समितीच्या निवडणुकीत पारंपरिक विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने येतील. आ. अमर काळे आणि माजी आमदार दादाराव केचे आपापल्या आघाडीची सूत्रे हलवीत आहे. येथे भाजपचा मित्रपक्ष शिवसेना व स्थानिक अभद्र मित्र काँग्रेससोबत असल्यामुळे सामना नव्या वळणावर आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपची लाट होती. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर यात घसरण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतरच्या काळात वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निमित्ताने भाजपची लाट ओसरली वा कायम आहे. हे बघायला मिळणार आहे. तर आपले अस्तित्व कायम टिकविण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांचीही कसोटी लागणार आहे. लोकसभा आणि विधानसभेतील यश बघता निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठापणाला लागणार आहे. या निवडणुकीतील मतदार ग्रामीण भागातील असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीची ही रंगीत तालीमच ठरणार आहे.