शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

राजकीय कस पणाला

By admin | Updated: June 27, 2015 02:46 IST

जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असली तरी विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ बघता भाजपाला ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही.

वर्धा : जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असली तरी विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ बघता भाजपाला ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही.त्यातही वर्धा व देवळी बाजार समित्यांमध्ये भाजपाने प्रत्येकी १५ जागांवरच आपले उमेदवार उभे केले आहे. एका बाजुने खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, विजय मुडे दुसऱ्या बाजुने माजी राज्यमंत्री आ. रणजित कांबळे व सहकार नेते म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यात अप्रत्यक्ष सामना रंगणार आहे. हेच चित्र सेलू बाजार समितीमध्येही बघायला मिळणार आहे. आर्वी व आष्टी-कारंजा बाजार समितीच्या निवडणुकीत पारंपरिक विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने येतील. आ. अमर काळे आणि माजी आमदार दादाराव केचे आपापल्या आघाडीची सूत्रे हलवीत आहे. येथे भाजपचा मित्रपक्ष शिवसेना व स्थानिक अभद्र मित्र काँग्रेससोबत असल्यामुळे सामना नव्या वळणावर आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपची लाट होती. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर यात घसरण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतरच्या काळात वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निमित्ताने भाजपची लाट ओसरली वा कायम आहे. हे बघायला मिळणार आहे. तर आपले अस्तित्व कायम टिकविण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांचीही कसोटी लागणार आहे. लोकसभा आणि विधानसभेतील यश बघता निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठापणाला लागणार आहे. या निवडणुकीतील मतदार ग्रामीण भागातील असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीची ही रंगीत तालीमच ठरणार आहे.