शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

चोरीच्या वाहनांवर पोलिसांचा वॉच

By admin | Updated: May 21, 2016 02:11 IST

गत काही दिवसात शहरात दुचाकी वाहने चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या धर्तीवर वर्धा शहर ठाण्याच्यावतीने आरती चौक परिसरात नाकाबंदी करीत वाहन तपासणी मोहीम राबविली.

शहर पोलिसांची नाकाबंदी : वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने मोहीमवर्धा : गत काही दिवसात शहरात दुचाकी वाहने चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या धर्तीवर वर्धा शहर ठाण्याच्यावतीने आरती चौक परिसरात नाकाबंदी करीत वाहन तपासणी मोहीम राबविली. चोरीच्या वाहनांचा सुगावा लागावा यासाठी सदर मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.या काही वर्षात जिल्ह्यात वाहनाची संख्या अनेक पटीने वाढली आहे. तसेच वर्धा शहरातून नागपूर, यवतमाळ आदी जिल्ह्यात दुचाकीने नियमित ये-जा करीत असलेल्यांनी संख्याही बरीच आहे. विशेष म्हणजे या काही महिन्यात दुचाकी वाहने चोरीस जात असल्याच्या अनेक घटना शहर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आल्या आहे. यातील बऱ्याच दुचाकी या दारूची वाहतूक करण्यासाठी वापरात येत असल्याचेही वास्तव पुढे येत आहे. दुचाकी जप्त केल्यावर बरेचदा ती चोरीची असल्याचे निदर्शनास येते. तसेच शहरातही इतरत्र वाहने चोरी जात असल्याचे सत्र सुरू झाले आहे. या सर्वांवर आळा घालण्यासाठी वर्धा शहर पोलिसांच्या वतीने शुक्रवारी आरती चौक परिसरात वाहन तपासणी मोहीम नाकाबंदी करून राबविण्यात आली. यामध्ये वाहन अडवून कागदपत्रे वाहनांचे नंबर आदींची तपासणी करण्यात आली. दिवसभर ही मोहीम सुरू असल्याने नागरिकांना ही मनस्ताप केला. या मोहीमेत शेकडो गाड्यांची तपासणी केली.(शहर प्रतिनिधी) आरोपीच्या अटकेसाठी नाकाबंदी ?अमरावतीतून दुचाकी चोरी प्रकरणातील कुख्यात आरोपी फरार झाला.तो नागपुरातील आहे. तो वर्धा मार्गे पळून जाऊू नये, यासाठी वर्धा शहर पोलिसांनी आरती चौकात ही नाकाबंदी केली असल्याची माहिती पोलीस सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. शहरचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी दुचाकी चोरांवर पाळत सुरु असल्याचे सांगून दुजोरा दिला.