शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पोलीसच देतात दारूविक्रीला प्रोत्साहन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:56 IST

गांधी जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बिनबोभाटपणे विक्री आणि वाहतूक केली जाते. पोलीस प्रशासनच या अवैध व्यवसायाला अभय देत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वर्धा जिल्ह्यात १९७५ ला दारूबंदी झाली. प्रारंभीच्या काळात दारूबंदीकरिता प्रभावी अंमलबजावणी झाली.

ठळक मुद्देनागरिक, दारूविक्रेत्यांचा आरोप : बंदीची शक्यता धूसरच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांधी जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बिनबोभाटपणे विक्री आणि वाहतूक केली जाते. पोलीस प्रशासनच या अवैध व्यवसायाला अभय देत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.वर्धा जिल्ह्यात १९७५ ला दारूबंदी झाली. प्रारंभीच्या काळात दारूबंदीकरिता प्रभावी अंमलबजावणी झाली. मात्र नंतर हा व्यवसाय चांगलाच फोफावला. वर्धा शहरातील जिल्ह्यातील २ हजारावर तरुण, महिला आणि नागरिकांचे हात या व्यवसायात गुंतले आहेत. एकट्या वर्धा शहरात दारूचे हजारावर अड्डे आहेत.शास्त्री चौक परिसर, इंदिरानगर, कृष्णनगर, इतवारा, सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), वायगाव (निपाणी), महादेवपुरा, कानगाव, अल्लीपूर, धोत्रा यासह अन्य परिसरात परमिट रूमप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हे सर्वच अवैध बार कित्येक वर्षांपासून राजसरोसपणे सुरू आहेत. येथील परिस्थिती पाहिल्यावर जिल्ह्यात दारूबंदी आहे, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. महिन्याकाठी आम्ही पोलिसांना मोठी देण देतो, या जोरावरच आमचे व्यवसाय बिनदिक्कतपणे चालतात, असे दारूविक्रेत्यांच्या गोटातूनच बोलले जाते. या बारशिवाय शहरातील बॅचलर रोड, आर्वी रोड, बसस्थानक रोड, रेल्वेस्थानक मार्गावरील पानठेले आणि खाणावळींमध्ये दारू रिचविण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे सायंकाळनंतर दारूरंगी रंगणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. नागपूर मार्गालगतचे अनेक हॉटेल्सनीही गार्डन बारचे रूप धारण केले आहे. रात्री उशिरापर्यंत येथे मद्य रिचविणाऱ्यांची गर्दी असते.दारूविक्री आणि रिचविण्याची ठिकाणे ठाऊक आहेत. मात्र, कारवाई केली जात नाही. महामार्गावर अन्य ठिकाणी कार-दुचाकीसह दारूसाठा जप्त करून कारवाईचा देखावा केला जातो. यामुळे हा व्यवसाय मोठे जाळे विणताना दिसत आहे. वर्ध्यात दररोज एसटी, आलिशान गाडी, रेल्वेगाड्या आदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूसाठा दाखल होतो. मात्र यात केवळ ‘अर्थ’कारण दडले असल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कुठेही दारू‘बंदी’च मिळते. पोलिसांची काही पथके दुचाकीने रात्री गस्त घालताना दिसतात, ती केवळ वसुलीसाठी, असेही अनेक वॉर्डांतील नागरिकांनी लोकमतला सांगितले.शहरालगतच्या पारधी बेड्यांवर संबंधित पोलीस ठाण्याकडून नित्याने वॉश आउट मोहीम राबविली जाते. मात्र, ठोस कारवाईच होत नसल्याने हे धंदे पुन्हा ‘जैसे थे’ सुरू होतात. पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी लोखंडी ड्रमच्या मोठ्या संख्येसोबत फोटो सेशन करून नामानिराळे होतात.पोलिसांचेच अभय असल्याने जिल्ह्यात दारूबंदी धूसरच असल्याचा आरोपही नागरिकांतून केला जात आहे. पोलीस अधीक्षकांनी धडक मोहीम राबवून या अवैध व्यवसायाला पायबंद घालावा, अी मागणी जनमानसातून होत आहे.व्यक्तिगत वसुलीशहर व रामनगर ठाण्याची डीबी पथके आहेत. या पथकातील अनेक कर्मचारी सायंकाळनंतर शहरातील विविध दारू गुत्थ्यांवर व्यक्तिगत वसुली करताना दिसतात. इंदिरानगर, कृष्णनगर आदी भागात दररोजच पोलीस दोन-दोनच्या जोडीने येऊन पैसे घेऊन जातात, असे त्या-त्या परिसरातीलच नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदी