शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
4
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
5
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
6
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
7
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
8
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
9
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
11
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
12
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
13
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
14
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
15
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
16
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
17
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
18
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
19
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
20
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

पोलीसच देतात दारूविक्रीला प्रोत्साहन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:56 IST

गांधी जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बिनबोभाटपणे विक्री आणि वाहतूक केली जाते. पोलीस प्रशासनच या अवैध व्यवसायाला अभय देत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वर्धा जिल्ह्यात १९७५ ला दारूबंदी झाली. प्रारंभीच्या काळात दारूबंदीकरिता प्रभावी अंमलबजावणी झाली.

ठळक मुद्देनागरिक, दारूविक्रेत्यांचा आरोप : बंदीची शक्यता धूसरच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांधी जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बिनबोभाटपणे विक्री आणि वाहतूक केली जाते. पोलीस प्रशासनच या अवैध व्यवसायाला अभय देत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.वर्धा जिल्ह्यात १९७५ ला दारूबंदी झाली. प्रारंभीच्या काळात दारूबंदीकरिता प्रभावी अंमलबजावणी झाली. मात्र नंतर हा व्यवसाय चांगलाच फोफावला. वर्धा शहरातील जिल्ह्यातील २ हजारावर तरुण, महिला आणि नागरिकांचे हात या व्यवसायात गुंतले आहेत. एकट्या वर्धा शहरात दारूचे हजारावर अड्डे आहेत.शास्त्री चौक परिसर, इंदिरानगर, कृष्णनगर, इतवारा, सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), वायगाव (निपाणी), महादेवपुरा, कानगाव, अल्लीपूर, धोत्रा यासह अन्य परिसरात परमिट रूमप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हे सर्वच अवैध बार कित्येक वर्षांपासून राजसरोसपणे सुरू आहेत. येथील परिस्थिती पाहिल्यावर जिल्ह्यात दारूबंदी आहे, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. महिन्याकाठी आम्ही पोलिसांना मोठी देण देतो, या जोरावरच आमचे व्यवसाय बिनदिक्कतपणे चालतात, असे दारूविक्रेत्यांच्या गोटातूनच बोलले जाते. या बारशिवाय शहरातील बॅचलर रोड, आर्वी रोड, बसस्थानक रोड, रेल्वेस्थानक मार्गावरील पानठेले आणि खाणावळींमध्ये दारू रिचविण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे सायंकाळनंतर दारूरंगी रंगणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. नागपूर मार्गालगतचे अनेक हॉटेल्सनीही गार्डन बारचे रूप धारण केले आहे. रात्री उशिरापर्यंत येथे मद्य रिचविणाऱ्यांची गर्दी असते.दारूविक्री आणि रिचविण्याची ठिकाणे ठाऊक आहेत. मात्र, कारवाई केली जात नाही. महामार्गावर अन्य ठिकाणी कार-दुचाकीसह दारूसाठा जप्त करून कारवाईचा देखावा केला जातो. यामुळे हा व्यवसाय मोठे जाळे विणताना दिसत आहे. वर्ध्यात दररोज एसटी, आलिशान गाडी, रेल्वेगाड्या आदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूसाठा दाखल होतो. मात्र यात केवळ ‘अर्थ’कारण दडले असल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कुठेही दारू‘बंदी’च मिळते. पोलिसांची काही पथके दुचाकीने रात्री गस्त घालताना दिसतात, ती केवळ वसुलीसाठी, असेही अनेक वॉर्डांतील नागरिकांनी लोकमतला सांगितले.शहरालगतच्या पारधी बेड्यांवर संबंधित पोलीस ठाण्याकडून नित्याने वॉश आउट मोहीम राबविली जाते. मात्र, ठोस कारवाईच होत नसल्याने हे धंदे पुन्हा ‘जैसे थे’ सुरू होतात. पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी लोखंडी ड्रमच्या मोठ्या संख्येसोबत फोटो सेशन करून नामानिराळे होतात.पोलिसांचेच अभय असल्याने जिल्ह्यात दारूबंदी धूसरच असल्याचा आरोपही नागरिकांतून केला जात आहे. पोलीस अधीक्षकांनी धडक मोहीम राबवून या अवैध व्यवसायाला पायबंद घालावा, अी मागणी जनमानसातून होत आहे.व्यक्तिगत वसुलीशहर व रामनगर ठाण्याची डीबी पथके आहेत. या पथकातील अनेक कर्मचारी सायंकाळनंतर शहरातील विविध दारू गुत्थ्यांवर व्यक्तिगत वसुली करताना दिसतात. इंदिरानगर, कृष्णनगर आदी भागात दररोजच पोलीस दोन-दोनच्या जोडीने येऊन पैसे घेऊन जातात, असे त्या-त्या परिसरातीलच नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदी