शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

वर्धेत ऐनवेळी पोलीस पाटलांच्या मुलाखती रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:14 IST

जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता लेखी परीक्षा झाल्या. त्याची यादी गुरुवारी जाहीर झाली. यानंतर शुक्रवारी मुलाखती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्देउमेदवारांची ताटकळ : हिंगणघाटात पुढची तारीख

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता लेखी परीक्षा झाल्या. त्याची यादी गुरुवारी जाहीर झाली. यानंतर शुक्रवारी मुलाखती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र वर्धेत ऐन वेळेवर मुलाखती रद्द करण्यात आल्याने चांगलाच गोंधळ माजला. तर हिंगणघाट येथेही मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या.वर्धेत होणाऱ्या मुलाखती पारदर्शक व्हाव्या, यात कुण्या दलालाचा हस्तक्षेप होवू नये असे म्हणत या मुलाखती वेळेवर रद्द करण्यात आल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. तर हिंगणघाट उपविभागात आजंती येथील पोटनिवडणूक असल्याने मुलाखती रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ऐन वेळेवर मुलाखती रद्दचा निर्णय घेण्यात आल्याने मुलाखतीला आलेल्या उमेदवारांची चांगलीच धावपळ झाली. वर्धा आणि हिंगणघाट उपविभागात या मुलाखती आता ९ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.निर्धारित वेळेनुसार आज वर्धा उपविभागात मुलाखत असल्याने वर्धा विभागातील १७५ विद्यार्थी सकाळीच हजर झाले. वर्धेत एकूण १९० जागा असून याकरिता ७७७ उमेदवार पात्र ठरले आहे. त्यांच्या मुलाखती आजपासून होणार होत्या. मात्र उपविभागीय कार्यालयातील आदेश पाहताच उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी अनेक महिला तर आपल्या चिमुकल्यांना घेऊन रखरखत्या उन्हात आल्या होत्या. ऐन वेळेवर मुलाखत रद्द झाल्याचे कळताच त्यांची चांगलीच निराशा झाली आणि त्यांना परत जावे लागले. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ पाहायला मिळाला.याबाबत उपविभागीय अधिकारी यांना विचारले असता त्यांनी पारदर्शक प्रक्रिया पार पडावी व कोणताच राजकीय हस्तक्षेप होऊ नये या दृष्टीने मुलाखती पुढे ढकलण्यात आले असल्याचे सांगितले. सोबतच एमपीएससी पॅटर्ननुसार मुलाखत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.वर्धेत होणार टोकन पद्धतीतून मुलाखतीवर्धेत येत्या ९ तारखेला होणाऱ्या मुलाखती टोकन पद्धतीने होणार आहे. यात मुलाखत घेणाºयाला उमेदवाराचे नाव माहीत राहणार नाही. यामुळे घोळ होण्याची शक्यता राहणार नाही. घेतलेला निर्णय पारदर्शक पद्धतीने मुलाखती होण्याकरिता योग्य असला तरी वेळेवर प्रक्रिया रद्द झाल्याने उमेदवारांची झाली. उमेदवारांना याची पूर्वसूचना दिली असती तर हा प्रकार घडला नसता. यामुळे मुलाखतीकरिता आलेल्यांची तारांबळ उडाली.आर्वीत झाल्या मुलाखतीशासनाच्या कार्यक्रमानुसार ६ एप्रिलपासून मुलाखती होणार होत्या. त्यानुसार आज आर्वी येथे मुलाखती पार पडल्या. येथे १३० जागांकरिता मुलाखती होत आहे. यात ५४७ उमेदवारांच्या मुलाखती होत आहे. आज पहिल्या दिवशी ९४ उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू होती.