शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत ऐनवेळी पोलीस पाटलांच्या मुलाखती रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:14 IST

जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता लेखी परीक्षा झाल्या. त्याची यादी गुरुवारी जाहीर झाली. यानंतर शुक्रवारी मुलाखती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्देउमेदवारांची ताटकळ : हिंगणघाटात पुढची तारीख

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता लेखी परीक्षा झाल्या. त्याची यादी गुरुवारी जाहीर झाली. यानंतर शुक्रवारी मुलाखती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र वर्धेत ऐन वेळेवर मुलाखती रद्द करण्यात आल्याने चांगलाच गोंधळ माजला. तर हिंगणघाट येथेही मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या.वर्धेत होणाऱ्या मुलाखती पारदर्शक व्हाव्या, यात कुण्या दलालाचा हस्तक्षेप होवू नये असे म्हणत या मुलाखती वेळेवर रद्द करण्यात आल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. तर हिंगणघाट उपविभागात आजंती येथील पोटनिवडणूक असल्याने मुलाखती रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ऐन वेळेवर मुलाखती रद्दचा निर्णय घेण्यात आल्याने मुलाखतीला आलेल्या उमेदवारांची चांगलीच धावपळ झाली. वर्धा आणि हिंगणघाट उपविभागात या मुलाखती आता ९ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.निर्धारित वेळेनुसार आज वर्धा उपविभागात मुलाखत असल्याने वर्धा विभागातील १७५ विद्यार्थी सकाळीच हजर झाले. वर्धेत एकूण १९० जागा असून याकरिता ७७७ उमेदवार पात्र ठरले आहे. त्यांच्या मुलाखती आजपासून होणार होत्या. मात्र उपविभागीय कार्यालयातील आदेश पाहताच उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी अनेक महिला तर आपल्या चिमुकल्यांना घेऊन रखरखत्या उन्हात आल्या होत्या. ऐन वेळेवर मुलाखत रद्द झाल्याचे कळताच त्यांची चांगलीच निराशा झाली आणि त्यांना परत जावे लागले. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ पाहायला मिळाला.याबाबत उपविभागीय अधिकारी यांना विचारले असता त्यांनी पारदर्शक प्रक्रिया पार पडावी व कोणताच राजकीय हस्तक्षेप होऊ नये या दृष्टीने मुलाखती पुढे ढकलण्यात आले असल्याचे सांगितले. सोबतच एमपीएससी पॅटर्ननुसार मुलाखत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.वर्धेत होणार टोकन पद्धतीतून मुलाखतीवर्धेत येत्या ९ तारखेला होणाऱ्या मुलाखती टोकन पद्धतीने होणार आहे. यात मुलाखत घेणाºयाला उमेदवाराचे नाव माहीत राहणार नाही. यामुळे घोळ होण्याची शक्यता राहणार नाही. घेतलेला निर्णय पारदर्शक पद्धतीने मुलाखती होण्याकरिता योग्य असला तरी वेळेवर प्रक्रिया रद्द झाल्याने उमेदवारांची झाली. उमेदवारांना याची पूर्वसूचना दिली असती तर हा प्रकार घडला नसता. यामुळे मुलाखतीकरिता आलेल्यांची तारांबळ उडाली.आर्वीत झाल्या मुलाखतीशासनाच्या कार्यक्रमानुसार ६ एप्रिलपासून मुलाखती होणार होत्या. त्यानुसार आज आर्वी येथे मुलाखती पार पडल्या. येथे १३० जागांकरिता मुलाखती होत आहे. यात ५४७ उमेदवारांच्या मुलाखती होत आहे. आज पहिल्या दिवशी ९४ उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू होती.