शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करा

By admin | Updated: June 28, 2015 02:36 IST

मुलींवरील अत्याचाराच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार त्यांच्या जीवनातला आनंद हिरावता येत नाही.

विनयभंग प्रकरण : मुलींचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपा- महिलांचे साकडेवर्धा : मुलींवरील अत्याचाराच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार त्यांच्या जीवनातला आनंद हिरावता येत नाही. बोरधरण व इतर ठिकाणी मुलींना पोलिसांकडूनच त्रास दिला जात असल्याचे प्रकरण उजेडात येत आहे. तेव्हा खाकी वर्दीचा गैरवापर करणाऱ्यांना आरोपींना संरक्षण न देता सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी शनिवारी सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्यावतीने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात युवक-युवती फिरावयास गेले असता तेथे गस्तीवरील पोलिसांकडून एकटीला आड नेऊन तुझे मेडीकल करतो म्हणून अश्लील चाळे करणे, विनयभंग, बलात्कार करणे हे प्रकार सुरू आहे. तिच्या मित्राच्या वाहनाचा प्लग काढून घेणे, मोबाईल घेणे, दहशतीने कायद्याचा खोटा वापर करुन गप्प बसविणे, शारीरिक, मानसिक त्रास देण्याचे प्रकार सुरू आहे. बदनामीपोटी ही युवा मंडळीही हा अत्याचार निमुटपणे सहन करतात. याचाच फायदा वासनांध अधिकारी घेत असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून केला आहे. याला बळी पडलेल्या मुलींमध्ये कमालीची दहशत आहे, असे नमूद करुन या कृत्याचा निषेधही नोंदविला आहे. शिष्टमंडळात प्रा. नूतन माळवी, शारदा थुटे, सविता घोडे, प्रतिभा भुजाडे, पुष्पा जीवने, कल्पना कापुरे, चेतना सवाई, मीरा इंगोले, सुचिता इंगोले, तायडे, जिजा बोरकर, शालिनी पाटील, सुनीता शंभरकर, सुनील सावध, किशोर बकाले, सिंधु वागहे, सुमन तिरपुडे, नंदकुमार वानखेडे उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)आरोपींवर कठोर कारवाई करा-रामदास तडसबोरधरण येथील विनयभंग प्रकरणी तपासात दोषी आढळलेले उपनिरीक्षक राजू चौधरी व त्याला मदत करणारा वाहन चालक नीलेश मेश्राम यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, असे निर्देश खा. रामदास तडस यांनी पोलीस अधीक्षकांना एका पत्राद्वारे दिले आहेत. या प्रकरणामुळे पोलीस खात्याच्या कामकाजाविषयी चुकीचा संदेश जात आहे. तसेच जनतेत पोलीस विभागाविषयी अविश्वासाची भावना वाढत आहे. ही बाब पोलीस खात्याच्या बदनामीचे कारण ठरत आहे. याआधीसुद्धा असे प्रकार या दोघांनी केले आहेत. त्याचीसुद्धा चौकशी व्हावी, असेही पत्रात नमूद आहे. यासोबतच सदर प्रकरणातील तपासाच्या प्रगतीविषयी कळवावे, जेणेकरुन शासनाची (पोलीस विभागाची) बाजू समाधानकारक मांडू शकेल, असेही पत्रात शेवटी अधोरेखित केले आहे.