शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करा

By admin | Updated: June 28, 2015 02:36 IST

मुलींवरील अत्याचाराच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार त्यांच्या जीवनातला आनंद हिरावता येत नाही.

विनयभंग प्रकरण : मुलींचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपा- महिलांचे साकडेवर्धा : मुलींवरील अत्याचाराच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार त्यांच्या जीवनातला आनंद हिरावता येत नाही. बोरधरण व इतर ठिकाणी मुलींना पोलिसांकडूनच त्रास दिला जात असल्याचे प्रकरण उजेडात येत आहे. तेव्हा खाकी वर्दीचा गैरवापर करणाऱ्यांना आरोपींना संरक्षण न देता सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी शनिवारी सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्यावतीने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात युवक-युवती फिरावयास गेले असता तेथे गस्तीवरील पोलिसांकडून एकटीला आड नेऊन तुझे मेडीकल करतो म्हणून अश्लील चाळे करणे, विनयभंग, बलात्कार करणे हे प्रकार सुरू आहे. तिच्या मित्राच्या वाहनाचा प्लग काढून घेणे, मोबाईल घेणे, दहशतीने कायद्याचा खोटा वापर करुन गप्प बसविणे, शारीरिक, मानसिक त्रास देण्याचे प्रकार सुरू आहे. बदनामीपोटी ही युवा मंडळीही हा अत्याचार निमुटपणे सहन करतात. याचाच फायदा वासनांध अधिकारी घेत असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून केला आहे. याला बळी पडलेल्या मुलींमध्ये कमालीची दहशत आहे, असे नमूद करुन या कृत्याचा निषेधही नोंदविला आहे. शिष्टमंडळात प्रा. नूतन माळवी, शारदा थुटे, सविता घोडे, प्रतिभा भुजाडे, पुष्पा जीवने, कल्पना कापुरे, चेतना सवाई, मीरा इंगोले, सुचिता इंगोले, तायडे, जिजा बोरकर, शालिनी पाटील, सुनीता शंभरकर, सुनील सावध, किशोर बकाले, सिंधु वागहे, सुमन तिरपुडे, नंदकुमार वानखेडे उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)आरोपींवर कठोर कारवाई करा-रामदास तडसबोरधरण येथील विनयभंग प्रकरणी तपासात दोषी आढळलेले उपनिरीक्षक राजू चौधरी व त्याला मदत करणारा वाहन चालक नीलेश मेश्राम यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, असे निर्देश खा. रामदास तडस यांनी पोलीस अधीक्षकांना एका पत्राद्वारे दिले आहेत. या प्रकरणामुळे पोलीस खात्याच्या कामकाजाविषयी चुकीचा संदेश जात आहे. तसेच जनतेत पोलीस विभागाविषयी अविश्वासाची भावना वाढत आहे. ही बाब पोलीस खात्याच्या बदनामीचे कारण ठरत आहे. याआधीसुद्धा असे प्रकार या दोघांनी केले आहेत. त्याचीसुद्धा चौकशी व्हावी, असेही पत्रात नमूद आहे. यासोबतच सदर प्रकरणातील तपासाच्या प्रगतीविषयी कळवावे, जेणेकरुन शासनाची (पोलीस विभागाची) बाजू समाधानकारक मांडू शकेल, असेही पत्रात शेवटी अधोरेखित केले आहे.