शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच केली पोलिसांनी अटक

By admin | Updated: March 12, 2016 02:32 IST

दुसरी गंभीर बाब म्हणजे, त्या महिलेच्या विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी सकाळी ११.३० वाजता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

वर्धा : दुसरी गंभीर बाब म्हणजे, त्या महिलेच्या विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी सकाळी ११.३० वाजता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र सायंकाळी ७ वाजता पोलीस निरीक्षक विजय मगर यांनी एफआयआरवर स्वाक्षरी करण्याच्या नावावर पोलीस ठाण्यात बोलाविले. आणि तिथेच ७.१५ वाजता सेवाग्राम पोलिसांनी आपल्याला अटक केली. वास्तविक, त्या महिलेने आपल्याविरुद्ध सायंकाळी ७ वाजता तक्रार दिल्यानंतर रात्री ८.३० वाजता सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा नोंद केला. आणि अटक ९.५० वाजता दाखविली. मग एफआयआर दाखल होण्यापूर्वीच आपल्याला अटक करण्यामागचे कारण काय. आपण सराईत गुन्हेगार असतो, तर हे समजण्यासारखे होते, असा आरोपही भेंडे यांनी केला. एमसीआरनंतर कारागृहात रवानगी झाली. रक्तदाब वाढताच सामान्य रुग्णालयात नेले. तेथे एका राजकीय नेत्याचा फोन आला आणि डॉक्टरांची सुटी करण्यासाठी धडपड सुरु झाली. रक्तदाब वाढला होता. सेवाग्राम येथेही त्या राजकीय नेत्यांच्या फोनवरून रात्री १२.३० वाजता सुटी देऊन कारागृहात हलविण्यात आले. दोन दिवसांनी सामान्य रुग्णालयातून गोळ्या देऊन परत पाठविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजकीय दबाब आणत असल्याचे सांगितले, असा आरोपही भेंंडे यांनी यावेळी केला. ज्या महिलेने आरोप केला तिने दुसऱ्याच दिवशी आपली तक्रार परत घेण्यासाठी अर्ज केला. न्यायालयात अ‍ॅफिडेव्हीट लिहून दिले. मात्र काही राजकीय मंडळींनी कोणतीही संधी दवडली नाही. यामुळे डोक्यात आत्महत्येचे विचार येत होते. कुटुंबीय त्रस्त होते. अशातच मुलीने एक चिठ्ठी कारागृहात पाठविली. त्या चिठ्ठीतून तिने जगण्याचे बळ दिले, आणि आत्महत्येचा विचार सोडून दिला, हा भावनिक प्रसंगही भेंडेंनी सांगितला. जि. प. सदस्य मंदा चौधरी, बंडू झोटिंग, सविता भालकर, प्रमोद वर्भे, प्रविण काटकर, अतुल तिमांडे, प्रवीण पाल, भास्कर वर्भे, प्रिया उगेमुगे, हेमंत मंगरूळकर आणि जयवंत साव आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)