शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच केली पोलिसांनी अटक

By admin | Updated: March 12, 2016 02:32 IST

दुसरी गंभीर बाब म्हणजे, त्या महिलेच्या विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी सकाळी ११.३० वाजता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

वर्धा : दुसरी गंभीर बाब म्हणजे, त्या महिलेच्या विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी सकाळी ११.३० वाजता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र सायंकाळी ७ वाजता पोलीस निरीक्षक विजय मगर यांनी एफआयआरवर स्वाक्षरी करण्याच्या नावावर पोलीस ठाण्यात बोलाविले. आणि तिथेच ७.१५ वाजता सेवाग्राम पोलिसांनी आपल्याला अटक केली. वास्तविक, त्या महिलेने आपल्याविरुद्ध सायंकाळी ७ वाजता तक्रार दिल्यानंतर रात्री ८.३० वाजता सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा नोंद केला. आणि अटक ९.५० वाजता दाखविली. मग एफआयआर दाखल होण्यापूर्वीच आपल्याला अटक करण्यामागचे कारण काय. आपण सराईत गुन्हेगार असतो, तर हे समजण्यासारखे होते, असा आरोपही भेंडे यांनी केला. एमसीआरनंतर कारागृहात रवानगी झाली. रक्तदाब वाढताच सामान्य रुग्णालयात नेले. तेथे एका राजकीय नेत्याचा फोन आला आणि डॉक्टरांची सुटी करण्यासाठी धडपड सुरु झाली. रक्तदाब वाढला होता. सेवाग्राम येथेही त्या राजकीय नेत्यांच्या फोनवरून रात्री १२.३० वाजता सुटी देऊन कारागृहात हलविण्यात आले. दोन दिवसांनी सामान्य रुग्णालयातून गोळ्या देऊन परत पाठविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजकीय दबाब आणत असल्याचे सांगितले, असा आरोपही भेंंडे यांनी यावेळी केला. ज्या महिलेने आरोप केला तिने दुसऱ्याच दिवशी आपली तक्रार परत घेण्यासाठी अर्ज केला. न्यायालयात अ‍ॅफिडेव्हीट लिहून दिले. मात्र काही राजकीय मंडळींनी कोणतीही संधी दवडली नाही. यामुळे डोक्यात आत्महत्येचे विचार येत होते. कुटुंबीय त्रस्त होते. अशातच मुलीने एक चिठ्ठी कारागृहात पाठविली. त्या चिठ्ठीतून तिने जगण्याचे बळ दिले, आणि आत्महत्येचा विचार सोडून दिला, हा भावनिक प्रसंगही भेंडेंनी सांगितला. जि. प. सदस्य मंदा चौधरी, बंडू झोटिंग, सविता भालकर, प्रमोद वर्भे, प्रविण काटकर, अतुल तिमांडे, प्रवीण पाल, भास्कर वर्भे, प्रिया उगेमुगे, हेमंत मंगरूळकर आणि जयवंत साव आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)