शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

विहिरीत टाकले विषारी द्रव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 12:35 IST

गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत कुणीतरी अज्ञात इसमाने टाकलेल्या विषारी द्रव्यामुळे मासोळ्यांचा मृत्यू झाला. आजनडोह येथे हा प्रकार उघड झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्याने नळाद्वारे पाणी सोडले नसल्याने मोठा अनर्थ टळला

ठळक मुद्देनागरिकांत दहशत मासोळ्यांचा मृत्यू झाल्याने घटना उघड

आॅनलाईन लोकमतवर्धा : गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत कुणीतरी अज्ञात इसमाने टाकलेल्या विषारी द्रव्यामुळे मासोळ्यांचा मृत्यू झाला. आजनडोह येथे हा प्रकार उघड झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्याने नळाद्वारे पाणी सोडले नसल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र या प्रकारामुळे गावकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे तातडीने लक्ष देत पाण्याचे निर्जंतुकीकरण करून नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लावावी अशी मागणी होत आहे.नळाला येणाऱ्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने महिलांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. महिलांना विहिरीवरून किंवा मिळेल तेथून पाणी डोक्यावरून आणावे लागत आहे. त्यामुळे महिलांना या सणासुदीच्या दिवसात पाणी आंघोळी, स्वयंपाक या गोष्टीचा विचार करावा लागत असून याकडे तातडीने लक्ष देवून पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा व पाण्याचे परिक्षण करावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे.येथील नळयोजनेची विहीर गावापासून अर्ध्या किलोमिटर अंतरावर नदीलगत आहे. या विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा होतो. या विहिरीवरून पाणी सोडण्याचे काम गुणवंता वाढवे नामक व्यक्ती काम करीत आहे. रोज सकाळी विहिरीवर जात व्यवस्थित पाणी सोडण्याचे काम सुरू होते. तो नित्याप्रमाणे सकाळी विहिरीवर पाणी सोडण्याकरिता गेला असता पाण्यावर मासोळ्या, बेडूक मृतावस्थेत तरंगताना दिसल्या. त्यामुळे त्याने पाणी न सोडता संबंधित सरपंच व उपसरपंचांना प्रकाराची माहिती देताच त्याने पाणी सोडण्यास मनाई केली.नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात आला. या प्रकरणाची दखल घेत सचिव देशमुख, सरपंच व उपसरपंचांनी कारंजा पोलिसात सदर प्रकाराची तक्रार दाखल केली आहे. पाण्याची तपासणी करण्याकरिता आरोग्य निरीक्षकांना पाचारण करून नमुने दिलेले आहेत.पाणी सोडणाऱ्याने विहिरीत न बघताच पाणी सोडले असते तर त्या गावात आज लहानमुले, माणसांना काय झाले असते हे सांगणे कठीणच आहे. असे हे कृत्य करणाऱ्याला काय म्हणावे हे अवघड आहे. तरी गावकऱ्यांनी यापुढे सर्तकता बाळगत ग्रामपंचायतला सहकार्य करावे.- एस.आर. देशमुख, सचिव ग्रामपंचायत, कन्नमवारग्राम