शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

विहिरीत टाकले विषारी द्रव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 12:35 IST

गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत कुणीतरी अज्ञात इसमाने टाकलेल्या विषारी द्रव्यामुळे मासोळ्यांचा मृत्यू झाला. आजनडोह येथे हा प्रकार उघड झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्याने नळाद्वारे पाणी सोडले नसल्याने मोठा अनर्थ टळला

ठळक मुद्देनागरिकांत दहशत मासोळ्यांचा मृत्यू झाल्याने घटना उघड

आॅनलाईन लोकमतवर्धा : गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत कुणीतरी अज्ञात इसमाने टाकलेल्या विषारी द्रव्यामुळे मासोळ्यांचा मृत्यू झाला. आजनडोह येथे हा प्रकार उघड झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्याने नळाद्वारे पाणी सोडले नसल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र या प्रकारामुळे गावकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे तातडीने लक्ष देत पाण्याचे निर्जंतुकीकरण करून नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लावावी अशी मागणी होत आहे.नळाला येणाऱ्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने महिलांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. महिलांना विहिरीवरून किंवा मिळेल तेथून पाणी डोक्यावरून आणावे लागत आहे. त्यामुळे महिलांना या सणासुदीच्या दिवसात पाणी आंघोळी, स्वयंपाक या गोष्टीचा विचार करावा लागत असून याकडे तातडीने लक्ष देवून पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा व पाण्याचे परिक्षण करावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे.येथील नळयोजनेची विहीर गावापासून अर्ध्या किलोमिटर अंतरावर नदीलगत आहे. या विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा होतो. या विहिरीवरून पाणी सोडण्याचे काम गुणवंता वाढवे नामक व्यक्ती काम करीत आहे. रोज सकाळी विहिरीवर जात व्यवस्थित पाणी सोडण्याचे काम सुरू होते. तो नित्याप्रमाणे सकाळी विहिरीवर पाणी सोडण्याकरिता गेला असता पाण्यावर मासोळ्या, बेडूक मृतावस्थेत तरंगताना दिसल्या. त्यामुळे त्याने पाणी न सोडता संबंधित सरपंच व उपसरपंचांना प्रकाराची माहिती देताच त्याने पाणी सोडण्यास मनाई केली.नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात आला. या प्रकरणाची दखल घेत सचिव देशमुख, सरपंच व उपसरपंचांनी कारंजा पोलिसात सदर प्रकाराची तक्रार दाखल केली आहे. पाण्याची तपासणी करण्याकरिता आरोग्य निरीक्षकांना पाचारण करून नमुने दिलेले आहेत.पाणी सोडणाऱ्याने विहिरीत न बघताच पाणी सोडले असते तर त्या गावात आज लहानमुले, माणसांना काय झाले असते हे सांगणे कठीणच आहे. असे हे कृत्य करणाऱ्याला काय म्हणावे हे अवघड आहे. तरी गावकऱ्यांनी यापुढे सर्तकता बाळगत ग्रामपंचायतला सहकार्य करावे.- एस.आर. देशमुख, सचिव ग्रामपंचायत, कन्नमवारग्राम