शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

विहिरीत टाकले विषारी द्रव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 12:35 IST

गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत कुणीतरी अज्ञात इसमाने टाकलेल्या विषारी द्रव्यामुळे मासोळ्यांचा मृत्यू झाला. आजनडोह येथे हा प्रकार उघड झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्याने नळाद्वारे पाणी सोडले नसल्याने मोठा अनर्थ टळला

ठळक मुद्देनागरिकांत दहशत मासोळ्यांचा मृत्यू झाल्याने घटना उघड

आॅनलाईन लोकमतवर्धा : गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत कुणीतरी अज्ञात इसमाने टाकलेल्या विषारी द्रव्यामुळे मासोळ्यांचा मृत्यू झाला. आजनडोह येथे हा प्रकार उघड झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्याने नळाद्वारे पाणी सोडले नसल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र या प्रकारामुळे गावकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे तातडीने लक्ष देत पाण्याचे निर्जंतुकीकरण करून नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लावावी अशी मागणी होत आहे.नळाला येणाऱ्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने महिलांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. महिलांना विहिरीवरून किंवा मिळेल तेथून पाणी डोक्यावरून आणावे लागत आहे. त्यामुळे महिलांना या सणासुदीच्या दिवसात पाणी आंघोळी, स्वयंपाक या गोष्टीचा विचार करावा लागत असून याकडे तातडीने लक्ष देवून पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा व पाण्याचे परिक्षण करावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे.येथील नळयोजनेची विहीर गावापासून अर्ध्या किलोमिटर अंतरावर नदीलगत आहे. या विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा होतो. या विहिरीवरून पाणी सोडण्याचे काम गुणवंता वाढवे नामक व्यक्ती काम करीत आहे. रोज सकाळी विहिरीवर जात व्यवस्थित पाणी सोडण्याचे काम सुरू होते. तो नित्याप्रमाणे सकाळी विहिरीवर पाणी सोडण्याकरिता गेला असता पाण्यावर मासोळ्या, बेडूक मृतावस्थेत तरंगताना दिसल्या. त्यामुळे त्याने पाणी न सोडता संबंधित सरपंच व उपसरपंचांना प्रकाराची माहिती देताच त्याने पाणी सोडण्यास मनाई केली.नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात आला. या प्रकरणाची दखल घेत सचिव देशमुख, सरपंच व उपसरपंचांनी कारंजा पोलिसात सदर प्रकाराची तक्रार दाखल केली आहे. पाण्याची तपासणी करण्याकरिता आरोग्य निरीक्षकांना पाचारण करून नमुने दिलेले आहेत.पाणी सोडणाऱ्याने विहिरीत न बघताच पाणी सोडले असते तर त्या गावात आज लहानमुले, माणसांना काय झाले असते हे सांगणे कठीणच आहे. असे हे कृत्य करणाऱ्याला काय म्हणावे हे अवघड आहे. तरी गावकऱ्यांनी यापुढे सर्तकता बाळगत ग्रामपंचायतला सहकार्य करावे.- एस.आर. देशमुख, सचिव ग्रामपंचायत, कन्नमवारग्राम