शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

युवकांचे कचऱ्याने ‘जेब भरो’

By admin | Updated: July 10, 2017 00:55 IST

शहरातील वाढती अस्वच्छता आणि साठलेले कचऱ्याचे ढीग हे आजाराला निमंत्रण देणारे ठरत आले.

युवा परिवर्तनचा सहभाग : स्वच्छता आंदोलनाचा आठवा टप्पालोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील वाढती अस्वच्छता आणि साठलेले कचऱ्याचे ढीग हे आजाराला निमंत्रण देणारे ठरत आले. युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेच्यावतीने शहरातील प्रभागात प्रत्येक शनिवार व रविवारी स्वच्छता आंदोलन केले जाते. याच आंदोलनात प्रभाग क्रमांक आठ मध्ये स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खिशात कचरा भरून घेत जेब भरो आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध नोंदविला.यावेळी प्रभागातील नागरिकांनी कार्यकर्त्यांकडे अस्वच्छता व त्यामुळे होणाऱ्या दुर्गंधी व वाढत्या रोगराईकडे नगरपालिकेचे होणारे दुर्लक्ष याबाबत समस्या मांडल्या. पालिकेने स्वच्छता अभियान राबविले मात्र ते वरवरचे होते, अशा शब्दात तीव्र रोष व्यक्त केला. प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत पावडे चौक, गोंड प्लॉट, पठाण यांच्या घराजवळील परिसर, सराफ गॅस एजन्सी व परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद साधला. प्रभागात कुठेच कचरा पेट्या ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे कचरा रस्त्यावर टाकावा लागतो. काही ठिकाणी तर कचरा फेकायला जागा नाही. नाल्या वेळेवर साफ होत नाही. लोकप्रतिनिधी समस्या सांगितल्यावर दुर्लक्ष करतात. काम पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात येते. हा प्रभाग एकप्रकारे डम्पींग झोन झाल्यासारखा आहे. येथे कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा वाजला आहे. नाल्या सफाई केल्यावर बाहेर काढलेला कचरा कित्येक दिवस नाल्यांच्या बाजुला पडून असतो, याकडे लक्ष देण्याची मागणी केली. आंदोलनात निहाल पांडे, पलाश उमाटे, प्रगती देशकर, प्रिती घंगाळ, जयंती मिश्रा, अक्षय बाळसराफ, सोनू दाते, सौरभ माकोडे, शैलेश पंचेश्वर, धरम शेंडे, आकाश हातागळे आदींचा सहभाग होता. स्वच्छता कराचा निषेधप्रभागातील वाढत्या कचऱ्याचे प्रमाण पाहता नागरिकंनी स्वच्छता कर का भरावा, असा प्रश्न उपस्थित केला. दुर्गंधी, अस्वच्छता यामुळे डासांची उत्पत्ती होते. ही बाब रोगराईला निमंत्रण देत आहे. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. लोकप्रतिनिधी नागरिकांच्या व्यथा ऐकायला तयार नाही, अशी व्यथा यावेळी मांडली.