शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

माझिया जीवा सोसवेना झळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:20 IST

जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून आणखी काही दिवस ही लाट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने कळविले आहे. मागील आठवडाभरापासून वर्ध्याचा पारा ४६ अंशावर राहात असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी वर्ध्याचे तापमान ४५.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

ठळक मुद्देउष्णतामानामुळे जनजीवन विस्कळीत : बाजारपेठ व प्रमुख रस्त्यांवर अघोषित संचारबंदी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून आणखी काही दिवस ही लाट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने कळविले आहे. मागील आठवडाभरापासून वर्ध्याचा पारा ४६ अंशावर राहात असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी वर्ध्याचे तापमान ४५.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.यंदाच्या उन्हाळ्यातील मे महिना हा सर्वाधिक उष्ण राहिला. जिल्ह्याचे तापमान ४६.७ अंशापर्यंत गेले होते. मागील पंधरा दिवसांपासून तापमानात सातत्याने चढउतार सुरू आहे. त्यामुळे नागरिक होरपळून निघत आहेत. उन्हामुळे नागरिकांना तापाचे आजार होत असून शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचारासाठी गर्दी करीत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने आणखी दोन तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी डोक्याला रुमाल बांधून व गॉगल्स लावूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.जिल्ह्यात यावेळी दुष्काळी परिस्थिती आहे. शहरासह सर्वच तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शासनाच्यावतीने उपाययोजना केवळ कागदावरच राबविल्या जात असल्याचे चित्र आहे. वर्धा शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरात खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. मात्र तो अपुरा पडत आहे. नळाद्वारे पाच-सहा दिवसांआड कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. विंधन विहिरी-कूपनलिकांचा कोरड पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामीण भागातही पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. जिल्ह्यात केवळ आष्टी तालुक्यातच प्रशासनाद्वारे टँकरद्वारे टँकरने पाणी पुरवठा होत असून पाण्यासाठी उन्हात रांगा लागत आहेत.उष्माघात होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावाढत्या तापमानामुळे सध्या उष्माघाताची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऊन लागल्यामुळे रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत. तापाचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. उष्माघात होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. ऊन लागल्यास वेळीच उपचार करावा. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उष्णतामान कायम राहणार असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे, काम करणे टाळावे असे डॉ. सचिन पावडे यांनी सांगितले.जिल्ह्यात उष्माघाताचे तीन बळीवर्धा जिल्ह्यात यंदा उष्णतामान अधिक आहे. मे अखेरीस पाऱ्याचा प्रवास ४६ अंश सेल्सिअसवरच राहिला. प्रखर उष्णतामानामुळे शहरासह गावखेड्यातील जनजीवन प्रभावित झाले आहे. शहरातील प्रमुख रस्ते दुपारच्या सुमारास निर्मनुष्य होतात. बाजारपेठेतही शुकशुकाट असतो. जिल्ह्यातील विविध भागात उष्माघाताने मागील ४८ तासांत तीन जणांचा मृत्यू झाला. यात वर्धा व समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथील प्रत्येकी एक आणि आष्टी (शहीद) तालुक्यातील तळेगाव श्यामजीपंत येथील एक अशा तिघांचा समावेश आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून उष्माघाताने मृत्यू झालाच नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Temperatureतापमान