शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आणेवारीची फेरतपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:22 IST

जिल्ह्यातील सर्व गावांच्या आणेवारीची फेरतपासणी करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा तसेच प्रशासनाने जाहीर केलेली गावांची ५० टक्क्याच्यावरची पैसेवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉँग्रेसची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : जिल्ह्यातील सर्व गावांच्या आणेवारीची फेरतपासणी करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा तसेच प्रशासनाने जाहीर केलेली गावांची ५० टक्क्याच्यावरची पैसेवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना शनिवारी यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुधारीत पैसेवारीचा अहवाल सादर केला आहे. त्यात सर्व गावांची आणेवारी ५१ ते ६० टक्के दाखविली आहे. जिल्ह्यात ६०७ गावांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. ६१ ते ७० टक्के आणेवारी दाखविलेली ६८६ गावे आहे. ७१ ते ८० टक्के पैसेवारी दाखविलेली गावे ४५ असून ती समुद्रपूर तालुक्यातील आहे. वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यासह १९ मंडळात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु सरकारने अलीकडे घोषित केलेल्या खरीप पिकाच्या सुधारीत आणेवारी जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० टक्क्याच्या आत नसल्याचे जाहीर केले आहे. हा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या भावनांशी मांडलेला खेळ आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार शासनाकडून केला जात आहे. खरीप हंगामात अनेक शेतकºयांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट आले. कापसाचा व सोयाबीनचा उतारा घटला. अशा परिस्थितीत शेतकºयांना दिलासा देण्याऐवजी शासन आणेवारी खोटी दाखवून पळवाटा शोधत असल्याचे या निवेदनात तिमांडे यांनी म्हटले आहे. यात हिंगणघाट तालुक्यात १८७, समुद्रपूर २१९, सेलू १६६, वर्धा १५४, देवळी १४९, आर्वी २०७, आष्टी १३६, कारंजा तालुक्यातील १२० गावांची आणेवारी शासनाला पाठविली आहे.