शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

आणेवारीची फेरतपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:22 IST

जिल्ह्यातील सर्व गावांच्या आणेवारीची फेरतपासणी करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा तसेच प्रशासनाने जाहीर केलेली गावांची ५० टक्क्याच्यावरची पैसेवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉँग्रेसची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : जिल्ह्यातील सर्व गावांच्या आणेवारीची फेरतपासणी करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा तसेच प्रशासनाने जाहीर केलेली गावांची ५० टक्क्याच्यावरची पैसेवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना शनिवारी यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुधारीत पैसेवारीचा अहवाल सादर केला आहे. त्यात सर्व गावांची आणेवारी ५१ ते ६० टक्के दाखविली आहे. जिल्ह्यात ६०७ गावांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. ६१ ते ७० टक्के आणेवारी दाखविलेली ६८६ गावे आहे. ७१ ते ८० टक्के पैसेवारी दाखविलेली गावे ४५ असून ती समुद्रपूर तालुक्यातील आहे. वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यासह १९ मंडळात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु सरकारने अलीकडे घोषित केलेल्या खरीप पिकाच्या सुधारीत आणेवारी जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० टक्क्याच्या आत नसल्याचे जाहीर केले आहे. हा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या भावनांशी मांडलेला खेळ आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार शासनाकडून केला जात आहे. खरीप हंगामात अनेक शेतकºयांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट आले. कापसाचा व सोयाबीनचा उतारा घटला. अशा परिस्थितीत शेतकºयांना दिलासा देण्याऐवजी शासन आणेवारी खोटी दाखवून पळवाटा शोधत असल्याचे या निवेदनात तिमांडे यांनी म्हटले आहे. यात हिंगणघाट तालुक्यात १८७, समुद्रपूर २१९, सेलू १६६, वर्धा १५४, देवळी १४९, आर्वी २०७, आष्टी १३६, कारंजा तालुक्यातील १२० गावांची आणेवारी शासनाला पाठविली आहे.