शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आणेवारीची फेरतपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:22 IST

जिल्ह्यातील सर्व गावांच्या आणेवारीची फेरतपासणी करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा तसेच प्रशासनाने जाहीर केलेली गावांची ५० टक्क्याच्यावरची पैसेवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉँग्रेसची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : जिल्ह्यातील सर्व गावांच्या आणेवारीची फेरतपासणी करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा तसेच प्रशासनाने जाहीर केलेली गावांची ५० टक्क्याच्यावरची पैसेवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना शनिवारी यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुधारीत पैसेवारीचा अहवाल सादर केला आहे. त्यात सर्व गावांची आणेवारी ५१ ते ६० टक्के दाखविली आहे. जिल्ह्यात ६०७ गावांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. ६१ ते ७० टक्के आणेवारी दाखविलेली ६८६ गावे आहे. ७१ ते ८० टक्के पैसेवारी दाखविलेली गावे ४५ असून ती समुद्रपूर तालुक्यातील आहे. वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यासह १९ मंडळात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु सरकारने अलीकडे घोषित केलेल्या खरीप पिकाच्या सुधारीत आणेवारी जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० टक्क्याच्या आत नसल्याचे जाहीर केले आहे. हा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या भावनांशी मांडलेला खेळ आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार शासनाकडून केला जात आहे. खरीप हंगामात अनेक शेतकºयांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट आले. कापसाचा व सोयाबीनचा उतारा घटला. अशा परिस्थितीत शेतकºयांना दिलासा देण्याऐवजी शासन आणेवारी खोटी दाखवून पळवाटा शोधत असल्याचे या निवेदनात तिमांडे यांनी म्हटले आहे. यात हिंगणघाट तालुक्यात १८७, समुद्रपूर २१९, सेलू १६६, वर्धा १५४, देवळी १४९, आर्वी २०७, आष्टी १३६, कारंजा तालुक्यातील १२० गावांची आणेवारी शासनाला पाठविली आहे.