शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

जिल्हा बँकेतील आमच्या रकमा परत करा!

By admin | Updated: May 29, 2014 02:38 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या रकमा परत करण्याच्या मागणीला घेऊन बुधवारी ठेवीदारांनी ..

वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या रकमा परत करण्याच्या मागणीला घेऊन बुधवारी ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आवारात ठिय्या आंदोलन सुरु केले. दरम्यान, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे व जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्त्वातील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांची भेट घेतली. यावेळी निवेदन सादर करीत जोपर्यंत शासनाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरुच होते.

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाच्या मार्फत आर्थिक मदत देवून जिल्हा बँकेचे महाराष्ट्र सहकारी बँकेत विलीनीकरण करा व एक लाखावरील रकमेच्या थकबाकीदार कर्जदारांची सक्तीने वसुली करण्याचे आदेश जिल्हा बँकेतील प्रशासनाला देवून अडचणीत सापडलेल्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, स्थानिक आमदार व जिल्हाधिकार्‍यांना वारंवार निवेदने सादर करुन पाठपुरावा केला होता. दरम्यान मध्यवर्ती बँकेला कुलूपही ठोकले होते. याबाबत मात्र शासन स्तरावर कोणत्याही हालचाली झाल्या नसल्यामुळे इशार्‍यानुसार सदर आंदोलनाला सुरुवात केल्याचे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले आहे. जोपर्यंत शासनस्तरावरुन जिल्हा बँकेबाबत निर्णय येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा आंदोलकांनी पवित्रा घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

आंदोलनस्थळ गाठण्यासाठी नवे फंडे

आंदोलनस्थळाला चोहोबाजूंनी पोलिसांनी घेरले होते. काहीजण सकाळीच पोहचले. मात्र उशिराने आलेल्या आंदोलकांना अडविल्याने ते काम असल्याचे सांगून थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून पोहचले.

पोलीस आणि ठेवीदार आमने-सामने

शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकार्‍यांकडे जावू न दिल्यामुळे आंदोलक ठेवीदार आणि पोलीस आमने-सामने आले होते. अखेर ठाणेदार बुराडे आणि काही आंदोलकांनी सामंजस्य दाखविल्याने तणाव शांत झाला.

२ लाख ४0 हजार २२५ खातेदार

रिझर्व बँकेने जिल्हा बँकेचे आर्थिक व्यवहार गोठविल्यामुळे ठेवीदारांमध्ये रकमा बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात २ लाख ४0 हजार २२५ खातेदार आहे.

३४३ कोटी ३९ लाख ३८ हजार अडकले

जिल्हा बँकेतील जिल्ह्यातील खातेदारांच्या रकमा विड्रॉल होत नसल्यामुळे मागील दोन-तीन वर्षांपासून जिल्हा बँकेत ३४३ कोटी ३९ लाख ३८ हजार रुपये अडकले असल्यामुळे खातेदार चिंतेत आहे.