शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

जिल्हा बँकेतील आमच्या रकमा परत करा!

By admin | Updated: May 29, 2014 02:38 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या रकमा परत करण्याच्या मागणीला घेऊन बुधवारी ठेवीदारांनी ..

वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या रकमा परत करण्याच्या मागणीला घेऊन बुधवारी ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आवारात ठिय्या आंदोलन सुरु केले. दरम्यान, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे व जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्त्वातील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांची भेट घेतली. यावेळी निवेदन सादर करीत जोपर्यंत शासनाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरुच होते.

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाच्या मार्फत आर्थिक मदत देवून जिल्हा बँकेचे महाराष्ट्र सहकारी बँकेत विलीनीकरण करा व एक लाखावरील रकमेच्या थकबाकीदार कर्जदारांची सक्तीने वसुली करण्याचे आदेश जिल्हा बँकेतील प्रशासनाला देवून अडचणीत सापडलेल्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, स्थानिक आमदार व जिल्हाधिकार्‍यांना वारंवार निवेदने सादर करुन पाठपुरावा केला होता. दरम्यान मध्यवर्ती बँकेला कुलूपही ठोकले होते. याबाबत मात्र शासन स्तरावर कोणत्याही हालचाली झाल्या नसल्यामुळे इशार्‍यानुसार सदर आंदोलनाला सुरुवात केल्याचे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले आहे. जोपर्यंत शासनस्तरावरुन जिल्हा बँकेबाबत निर्णय येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा आंदोलकांनी पवित्रा घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

आंदोलनस्थळ गाठण्यासाठी नवे फंडे

आंदोलनस्थळाला चोहोबाजूंनी पोलिसांनी घेरले होते. काहीजण सकाळीच पोहचले. मात्र उशिराने आलेल्या आंदोलकांना अडविल्याने ते काम असल्याचे सांगून थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून पोहचले.

पोलीस आणि ठेवीदार आमने-सामने

शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकार्‍यांकडे जावू न दिल्यामुळे आंदोलक ठेवीदार आणि पोलीस आमने-सामने आले होते. अखेर ठाणेदार बुराडे आणि काही आंदोलकांनी सामंजस्य दाखविल्याने तणाव शांत झाला.

२ लाख ४0 हजार २२५ खातेदार

रिझर्व बँकेने जिल्हा बँकेचे आर्थिक व्यवहार गोठविल्यामुळे ठेवीदारांमध्ये रकमा बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात २ लाख ४0 हजार २२५ खातेदार आहे.

३४३ कोटी ३९ लाख ३८ हजार अडकले

जिल्हा बँकेतील जिल्ह्यातील खातेदारांच्या रकमा विड्रॉल होत नसल्यामुळे मागील दोन-तीन वर्षांपासून जिल्हा बँकेत ३४३ कोटी ३९ लाख ३८ हजार रुपये अडकले असल्यामुळे खातेदार चिंतेत आहे.