शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत 29,01738 वृक्षरोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

शासनाच्या हरितम्‌, शतकोटी, ३३ कोटी वृक्षलागवड व अन्य योजनांच्या नावाखाली जिल्ह्यात  पावसाळ्याच्या प्रारंभापासून वृक्षलागवड केली जाते. याचे वनविभाग, सामाजिक वनीकरण व अन्य विभागांना उद्दिष्ट दिले जाते. मात्र, कागदावरच अनेक ठिकाणी उद्दिष्टपूर्ती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लावलेली वृक्षांची सद्यस्थिती काय, संगोपनाची जबाबदारी कुणाची हे प्रश्नही अनुत्तरित आहेत. एकीकडे वृक्षलागवडीचे दावे केले जात असतानाच दुसरीकडे विकासकामांत अडसर ठरत असल्याच्या कारणावरून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडही केली जात आहे. 

ठळक मुद्देजगलीत किती, सद्यस्थिती काय? : संशोधनाचा विषय

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात मागील पाच वर्षांत २९ लाखांवर वृक्षलागवड करण्यात आली.  मात्र, यातील किती वृक्षरोपटी जगलीत, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. दरवर्षी जिल्ह्याला लाखावर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. मात्र, शासकीय यंत्रणा निम्मेही उद्दिष्ट गाठू शकले नसल्याचे वास्तव आहे. शासनाच्या हरितम्‌, शतकोटी, ३३ कोटी वृक्षलागवड व अन्य योजनांच्या नावाखाली जिल्ह्यात  पावसाळ्याच्या प्रारंभापासून वृक्षलागवड केली जाते. याचे वनविभाग, सामाजिक वनीकरण व अन्य विभागांना उद्दिष्ट दिले जाते. मात्र, कागदावरच अनेक ठिकाणी उद्दिष्टपूर्ती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लावलेली वृक्षांची सद्यस्थिती काय, संगोपनाची जबाबदारी कुणाची हे प्रश्नही अनुत्तरित आहेत. एकीकडे वृक्षलागवडीचे दावे केले जात असतानाच दुसरीकडे विकासकामांत अडसर ठरत असल्याच्या कारणावरून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडही केली जात आहे. मागील पाच वर्षांत पाच हजारांवर वृक्षांची तोड करण्यात आली. वृक्षलागवडीच्या ८ ते १० टक्के तोडही केली जात असल्याची वास्तविक स्थिती आहे. २०१६ या वर्षात जिल्ह्याला ७ लाख ४० हजार  इतके वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. ४ लाख ९९ हजार २ इतकी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. २०१७ या वर्षात ५ लाख ६४ हजार ८७७, २०१८ या वर्षात २६ लाख ७१ हजार इतके वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. ६ लाख ६० हजार ४३१, २०१९ मध्ये ५७ लाख ६२ हजार २०० इतके उद्दिष्ट होते. १० लाख ५५ हजार ९२९ इतकी वृक्षलागवड झाली. तर चालू वर्षात म्हणजेच २०२० मध्ये १ लाख २१ हजार ४९९ वृक्षरोपांची लागवड करण्यात आल्याचे शासकीय आकडेवारीतून दिसून येते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आल्याचे दावेही केले जात आहेत. मात्र, लावलेल्या या रोपांची आज स्थिती काय, किती जगलीत याची आकडेवारी मात्र, संबंधित विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या वृक्षलागवडीचे ऑडिट करणार तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग