शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

पाच वर्षांत 29,01738 वृक्षरोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

शासनाच्या हरितम्‌, शतकोटी, ३३ कोटी वृक्षलागवड व अन्य योजनांच्या नावाखाली जिल्ह्यात  पावसाळ्याच्या प्रारंभापासून वृक्षलागवड केली जाते. याचे वनविभाग, सामाजिक वनीकरण व अन्य विभागांना उद्दिष्ट दिले जाते. मात्र, कागदावरच अनेक ठिकाणी उद्दिष्टपूर्ती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लावलेली वृक्षांची सद्यस्थिती काय, संगोपनाची जबाबदारी कुणाची हे प्रश्नही अनुत्तरित आहेत. एकीकडे वृक्षलागवडीचे दावे केले जात असतानाच दुसरीकडे विकासकामांत अडसर ठरत असल्याच्या कारणावरून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडही केली जात आहे. 

ठळक मुद्देजगलीत किती, सद्यस्थिती काय? : संशोधनाचा विषय

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात मागील पाच वर्षांत २९ लाखांवर वृक्षलागवड करण्यात आली.  मात्र, यातील किती वृक्षरोपटी जगलीत, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. दरवर्षी जिल्ह्याला लाखावर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. मात्र, शासकीय यंत्रणा निम्मेही उद्दिष्ट गाठू शकले नसल्याचे वास्तव आहे. शासनाच्या हरितम्‌, शतकोटी, ३३ कोटी वृक्षलागवड व अन्य योजनांच्या नावाखाली जिल्ह्यात  पावसाळ्याच्या प्रारंभापासून वृक्षलागवड केली जाते. याचे वनविभाग, सामाजिक वनीकरण व अन्य विभागांना उद्दिष्ट दिले जाते. मात्र, कागदावरच अनेक ठिकाणी उद्दिष्टपूर्ती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लावलेली वृक्षांची सद्यस्थिती काय, संगोपनाची जबाबदारी कुणाची हे प्रश्नही अनुत्तरित आहेत. एकीकडे वृक्षलागवडीचे दावे केले जात असतानाच दुसरीकडे विकासकामांत अडसर ठरत असल्याच्या कारणावरून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडही केली जात आहे. मागील पाच वर्षांत पाच हजारांवर वृक्षांची तोड करण्यात आली. वृक्षलागवडीच्या ८ ते १० टक्के तोडही केली जात असल्याची वास्तविक स्थिती आहे. २०१६ या वर्षात जिल्ह्याला ७ लाख ४० हजार  इतके वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. ४ लाख ९९ हजार २ इतकी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. २०१७ या वर्षात ५ लाख ६४ हजार ८७७, २०१८ या वर्षात २६ लाख ७१ हजार इतके वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. ६ लाख ६० हजार ४३१, २०१९ मध्ये ५७ लाख ६२ हजार २०० इतके उद्दिष्ट होते. १० लाख ५५ हजार ९२९ इतकी वृक्षलागवड झाली. तर चालू वर्षात म्हणजेच २०२० मध्ये १ लाख २१ हजार ४९९ वृक्षरोपांची लागवड करण्यात आल्याचे शासकीय आकडेवारीतून दिसून येते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आल्याचे दावेही केले जात आहेत. मात्र, लावलेल्या या रोपांची आज स्थिती काय, किती जगलीत याची आकडेवारी मात्र, संबंधित विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या वृक्षलागवडीचे ऑडिट करणार तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग