शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 13, 2017 01:08 IST

पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त पक्षाच्यावतीने पक्षविस्तार योजनेंतर्गत शिवार संवाद अभियान राबविले जात आहे.

समीर कुणावार यांचे प्रतिपादन : भाजयुमोच्या जनसंवाद यात्रेचा समारोपलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त पक्षाच्यावतीने पक्षविस्तार योजनेंतर्गत शिवार संवाद अभियान राबविले जात आहे. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्याचा माझा प्रयत्न आहे, असे मत आ. सुमीर कुणावार यांनी व्यक्त केले.भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने ९ ते ११ जून दरम्यान हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजपा सरचिटणीस किशोर दिघे यांच्या मार्गदर्शनात तीन दिवसीय जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. येथील पक्ष कार्यालयात संवाद यात्रेचा समारोप कण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजपा सरचिटणीस किशोर दिघे, अविनाश देव, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अंकुश ठाकूर, बिसमील्ला खान, शहराध्यक्ष सुभाष कुंटेवार, समुदपूर पं.स. सभापती कांचन मडकाम, योगेश फुसे, आकाश पोहाणे, संजय डेहणे, कुलधरीया आदी उपस्थित होते.आ. कुणावार पुढे म्हणाले की, शेतकरी आंदोलनाची दखल घेणारे ना. फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहे. शेतकरी कर्जमाफी ऐतिहासिक निर्णय आहे. काँग्रेसने ५० वर्षांत जे केले नाही, ते युती शासनाने अडीच वर्षांत करून दाखविले. वाघमारे यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून ‘सबका साथ, सबका विकास’ हेच शासनाचे ध्येय आहे. भाजपा जनतेसाठी राजकारण करीत आहे, असे सांगितले. दिघे यांनी तीन दिवसीय संवाद यात्रेची सविस्तर माहिती दिली. विविध गावांत शेतकऱ्यांशी संवाद साधून समाधान करण्यात आले. शासनाबाबत विरोधकांनी गैरसमज निर्माण केले; पण शासनावर शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे, असे संवाद यात्रेतून दिसून आल्याचे सांगण्यात आले. प्रास्ताविक अंकुश ठाकूर, संचालन अरुण गोटेकार यांनी केले तर आभार कुंटेवार यांनी मानले. संवाद यात्रेत सोनू गवळी, दिनेश वर्मा, स्वप्नील येंडे, सौरभ पांडे, राहुल सोरटे, निलेश पोणले, अंकुश खुरपडे, विइू बेनीवार, कविश्वर इंगोले, कवी भट, सुनील जवादे व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.