शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 13, 2017 01:08 IST

पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त पक्षाच्यावतीने पक्षविस्तार योजनेंतर्गत शिवार संवाद अभियान राबविले जात आहे.

समीर कुणावार यांचे प्रतिपादन : भाजयुमोच्या जनसंवाद यात्रेचा समारोपलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त पक्षाच्यावतीने पक्षविस्तार योजनेंतर्गत शिवार संवाद अभियान राबविले जात आहे. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्याचा माझा प्रयत्न आहे, असे मत आ. सुमीर कुणावार यांनी व्यक्त केले.भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने ९ ते ११ जून दरम्यान हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजपा सरचिटणीस किशोर दिघे यांच्या मार्गदर्शनात तीन दिवसीय जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. येथील पक्ष कार्यालयात संवाद यात्रेचा समारोप कण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजपा सरचिटणीस किशोर दिघे, अविनाश देव, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अंकुश ठाकूर, बिसमील्ला खान, शहराध्यक्ष सुभाष कुंटेवार, समुदपूर पं.स. सभापती कांचन मडकाम, योगेश फुसे, आकाश पोहाणे, संजय डेहणे, कुलधरीया आदी उपस्थित होते.आ. कुणावार पुढे म्हणाले की, शेतकरी आंदोलनाची दखल घेणारे ना. फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहे. शेतकरी कर्जमाफी ऐतिहासिक निर्णय आहे. काँग्रेसने ५० वर्षांत जे केले नाही, ते युती शासनाने अडीच वर्षांत करून दाखविले. वाघमारे यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून ‘सबका साथ, सबका विकास’ हेच शासनाचे ध्येय आहे. भाजपा जनतेसाठी राजकारण करीत आहे, असे सांगितले. दिघे यांनी तीन दिवसीय संवाद यात्रेची सविस्तर माहिती दिली. विविध गावांत शेतकऱ्यांशी संवाद साधून समाधान करण्यात आले. शासनाबाबत विरोधकांनी गैरसमज निर्माण केले; पण शासनावर शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे, असे संवाद यात्रेतून दिसून आल्याचे सांगण्यात आले. प्रास्ताविक अंकुश ठाकूर, संचालन अरुण गोटेकार यांनी केले तर आभार कुंटेवार यांनी मानले. संवाद यात्रेत सोनू गवळी, दिनेश वर्मा, स्वप्नील येंडे, सौरभ पांडे, राहुल सोरटे, निलेश पोणले, अंकुश खुरपडे, विइू बेनीवार, कविश्वर इंगोले, कवी भट, सुनील जवादे व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.