शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 13, 2017 01:08 IST

पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त पक्षाच्यावतीने पक्षविस्तार योजनेंतर्गत शिवार संवाद अभियान राबविले जात आहे.

समीर कुणावार यांचे प्रतिपादन : भाजयुमोच्या जनसंवाद यात्रेचा समारोपलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : पंडित दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त पक्षाच्यावतीने पक्षविस्तार योजनेंतर्गत शिवार संवाद अभियान राबविले जात आहे. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्याचा माझा प्रयत्न आहे, असे मत आ. सुमीर कुणावार यांनी व्यक्त केले.भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने ९ ते ११ जून दरम्यान हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजपा सरचिटणीस किशोर दिघे यांच्या मार्गदर्शनात तीन दिवसीय जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. येथील पक्ष कार्यालयात संवाद यात्रेचा समारोप कण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजपा सरचिटणीस किशोर दिघे, अविनाश देव, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अंकुश ठाकूर, बिसमील्ला खान, शहराध्यक्ष सुभाष कुंटेवार, समुदपूर पं.स. सभापती कांचन मडकाम, योगेश फुसे, आकाश पोहाणे, संजय डेहणे, कुलधरीया आदी उपस्थित होते.आ. कुणावार पुढे म्हणाले की, शेतकरी आंदोलनाची दखल घेणारे ना. फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहे. शेतकरी कर्जमाफी ऐतिहासिक निर्णय आहे. काँग्रेसने ५० वर्षांत जे केले नाही, ते युती शासनाने अडीच वर्षांत करून दाखविले. वाघमारे यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून ‘सबका साथ, सबका विकास’ हेच शासनाचे ध्येय आहे. भाजपा जनतेसाठी राजकारण करीत आहे, असे सांगितले. दिघे यांनी तीन दिवसीय संवाद यात्रेची सविस्तर माहिती दिली. विविध गावांत शेतकऱ्यांशी संवाद साधून समाधान करण्यात आले. शासनाबाबत विरोधकांनी गैरसमज निर्माण केले; पण शासनावर शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे, असे संवाद यात्रेतून दिसून आल्याचे सांगण्यात आले. प्रास्ताविक अंकुश ठाकूर, संचालन अरुण गोटेकार यांनी केले तर आभार कुंटेवार यांनी मानले. संवाद यात्रेत सोनू गवळी, दिनेश वर्मा, स्वप्नील येंडे, सौरभ पांडे, राहुल सोरटे, निलेश पोणले, अंकुश खुरपडे, विइू बेनीवार, कविश्वर इंगोले, कवी भट, सुनील जवादे व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.