शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

योजना बंद; पण चळवळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

कविवर्य विंदा करंदीकर यांच्या ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याचे घेत जावे...घेता-घेता घेणाऱ्याने, देणाऱ्याचे हातच घ्यावे’ या दोन ओळींनी निसर्गाने आतापर्यंत केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची मनोवृत्ती निर्माण होते. विकासाच्या झंझावातात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता मानवजातीला भरभरून देणाऱ्या निसर्गावरच संक्रांत आली.

ठळक मुद्देअविरत वृक्षारोपणाने दाटतेय हिरवळ । वर्धेकरांचे पाऊल पडतेय पुढे

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्ध्याला चळवळीची परंपरा लाभली असून ती आजही कायम आहे. निसर्गाचा समतोल राखण्याच्यादृष्टीने दरवर्षी शासनाकडून वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे वर्धेकरांच्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन चळवळीला आणखीनच बळ मिळाले. मात्र, राज्यकर्त्यांचा खांदेपालट झाल्यानंतर शासनाने वृक्षारोपणाची योजना गुंडाळली. तरीही वर्ध्यात सामाजिक संघटना आणि निसर्गप्रेमींचा वृक्षलागवडीचा ध्यास कायम असल्याने शहरासह लगतचा परिसर हिरवागार होत आहे.कविवर्य विंदा करंदीकर यांच्या ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याचे घेत जावे...घेता-घेता घेणाऱ्याने, देणाऱ्याचे हातच घ्यावे’ या दोन ओळींनी निसर्गाने आतापर्यंत केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची मनोवृत्ती निर्माण होते. विकासाच्या झंझावातात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता मानवजातीला भरभरून देणाऱ्या निसर्गावरच संक्रांत आली. पशु-पक्ष्यांसह मानवालाही जीवन असह्य व्हायला लागल्याने वर्ध्यामध्ये सर्वप्रथम निसर्ग सेवा समितीने वृक्ष लागवड व संगोपनासाठी पुढाकार घेतला. सोबतच इतरही सेवाभावी संस्था आणि निसर्गप्रेमींनी पुढाकार घेत वृक्षारोपणाची चळवळ गतिमान केली. याच दरम्यान शासनाने शतकोटी, १३ कोटी आणि ३३ कोटी वृक्षलागवड मोहीम हाती घेतली.शासकीय योजना असल्याने जिल्ह्यातील वृक्षारोपण आणि संवर्धनाची आकडेवारी शासनदरबारी कागदोपत्रीच फाईलबंद झाली. सर्वच नाही पण, काही वृक्ष जगले असले तरीही त्यापेक्षा सेवाभावी संस्था आणि निसर्गप्रेमींच्या चळवळीतून उभ्या राहिलेल्या वृक्षांची संख्या कित्येक पटीने अधिक आहे. त्यामुळेच आता वृक्षलागवडीची योजना बंद झाली तरीही नियमित वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची धडपड वर्ध्यात अविरत सुरूच असल्याने शहरातील रस्त्यालगतचा परिसर, टेकड्या व उद्याने हिरवेगार झाले आहेत.निसर्ग संदेश देणारी निसर्ग सेवा समितीनिसर्ग सेवा समितीने चळवळीचे ‘रोपण’ केल्याने त्याचा आता ‘वटवृक्ष’ झाला आहे. एक फोन केल्याबरोबर रोप व ट्रीगार्डसह सर्व व्यवस्था घरपोच करून देण्याची सुविधा निसर्ग सेवा समितीने उपलब्ध करून दिल्याने याला वर्धेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी आयटीआयजवळील टेकडीवर दहा एकर परिसरात निसर्ग हिल्स, ऑक्सिजन पार्क तयार केला असून या ठिकाणी लोकसहभाग व श्रमदानातून १५ हजारांवर वृक्षरोपांची लागवड केली आहे. यामध्ये शंभर प्रजातीचे विविध दीर्घजीवी वृक्ष लावण्यात आले आहेत. ‘घन-वन’अंतर्गत ८०० वृक्षांची लागवड केली आहे. शासकीय विश्रामगृह ते नालवाडी चौक आणि दादाजी धुनिवाले चौक ते आर्वी नाका या प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड केल्याने या परिसरामधील सौंदर्यात भर पडली आहे.खडकाळ टेकडीवर हिरवळ फुलविणारे ‘व्हीजेएम’मनुष्याच्या निरोगी आरोग्यासाठी धडपडणारे डॉक्टरांचे हात निसर्गाच्या आरोग्यासाठीही पुढे आल्याने वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने लोकसहभाग व श्रमदानातून ओसाड माळरानावर हिरवळ दाटली आहे. पिपरी परिसरातील हनुमान टेकडीवर ‘व्हीजेएम’च्या माध्यमातून विविध प्रजातीच्या १८ हजार ५०० वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपनही केले आहे. याही परिसराला ‘ऑक्सिजन पार्क’ असे नाव दिले असून येथे सुरुवातीला १३ हजार रोपे लावली होती. त्यांचे गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये बहारदार वृक्ष तयार झाले आहे. तसेच ‘मियावाकी’ वनामध्ये मागीलवर्षी साडेपाच हजार वृक्षांची लागवड केली होती. त्यामध्ये यावर्षी जुलै महिन्यात आणखी १ हजार ७०० झाडांची भर पडली आहे.दरवर्षीप्रमाणे ५ जून ते ३१ जुलैपर्यंत वृक्षलावगडीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत लोकसहभाग व श्रमदानातून ऑक्सिजन पार्क निसर्ग हिल येथे १ हजार वृक्षांची लागवड केली आहे. तसेच शहरातील विविध मार्गावरही वृक्ष लावले असून येत्या ३१ ऑगस्टपर्यंत मियावाकी प्रकल्पात दोन हजार वृक्ष रोप लावण्याचा संकल्प आहे. या कार्यात वर्धेकरांसह निसर्गप्रेमींची साथ मिळत आहे.मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष, निसर्ग सेवा समिती, वर्धा

टॅग्स :government schemeसरकारी योजना