शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

योजना बंद; पण चळवळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

कविवर्य विंदा करंदीकर यांच्या ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याचे घेत जावे...घेता-घेता घेणाऱ्याने, देणाऱ्याचे हातच घ्यावे’ या दोन ओळींनी निसर्गाने आतापर्यंत केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची मनोवृत्ती निर्माण होते. विकासाच्या झंझावातात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता मानवजातीला भरभरून देणाऱ्या निसर्गावरच संक्रांत आली.

ठळक मुद्देअविरत वृक्षारोपणाने दाटतेय हिरवळ । वर्धेकरांचे पाऊल पडतेय पुढे

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्ध्याला चळवळीची परंपरा लाभली असून ती आजही कायम आहे. निसर्गाचा समतोल राखण्याच्यादृष्टीने दरवर्षी शासनाकडून वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे वर्धेकरांच्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन चळवळीला आणखीनच बळ मिळाले. मात्र, राज्यकर्त्यांचा खांदेपालट झाल्यानंतर शासनाने वृक्षारोपणाची योजना गुंडाळली. तरीही वर्ध्यात सामाजिक संघटना आणि निसर्गप्रेमींचा वृक्षलागवडीचा ध्यास कायम असल्याने शहरासह लगतचा परिसर हिरवागार होत आहे.कविवर्य विंदा करंदीकर यांच्या ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याचे घेत जावे...घेता-घेता घेणाऱ्याने, देणाऱ्याचे हातच घ्यावे’ या दोन ओळींनी निसर्गाने आतापर्यंत केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची मनोवृत्ती निर्माण होते. विकासाच्या झंझावातात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता मानवजातीला भरभरून देणाऱ्या निसर्गावरच संक्रांत आली. पशु-पक्ष्यांसह मानवालाही जीवन असह्य व्हायला लागल्याने वर्ध्यामध्ये सर्वप्रथम निसर्ग सेवा समितीने वृक्ष लागवड व संगोपनासाठी पुढाकार घेतला. सोबतच इतरही सेवाभावी संस्था आणि निसर्गप्रेमींनी पुढाकार घेत वृक्षारोपणाची चळवळ गतिमान केली. याच दरम्यान शासनाने शतकोटी, १३ कोटी आणि ३३ कोटी वृक्षलागवड मोहीम हाती घेतली.शासकीय योजना असल्याने जिल्ह्यातील वृक्षारोपण आणि संवर्धनाची आकडेवारी शासनदरबारी कागदोपत्रीच फाईलबंद झाली. सर्वच नाही पण, काही वृक्ष जगले असले तरीही त्यापेक्षा सेवाभावी संस्था आणि निसर्गप्रेमींच्या चळवळीतून उभ्या राहिलेल्या वृक्षांची संख्या कित्येक पटीने अधिक आहे. त्यामुळेच आता वृक्षलागवडीची योजना बंद झाली तरीही नियमित वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची धडपड वर्ध्यात अविरत सुरूच असल्याने शहरातील रस्त्यालगतचा परिसर, टेकड्या व उद्याने हिरवेगार झाले आहेत.निसर्ग संदेश देणारी निसर्ग सेवा समितीनिसर्ग सेवा समितीने चळवळीचे ‘रोपण’ केल्याने त्याचा आता ‘वटवृक्ष’ झाला आहे. एक फोन केल्याबरोबर रोप व ट्रीगार्डसह सर्व व्यवस्था घरपोच करून देण्याची सुविधा निसर्ग सेवा समितीने उपलब्ध करून दिल्याने याला वर्धेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी आयटीआयजवळील टेकडीवर दहा एकर परिसरात निसर्ग हिल्स, ऑक्सिजन पार्क तयार केला असून या ठिकाणी लोकसहभाग व श्रमदानातून १५ हजारांवर वृक्षरोपांची लागवड केली आहे. यामध्ये शंभर प्रजातीचे विविध दीर्घजीवी वृक्ष लावण्यात आले आहेत. ‘घन-वन’अंतर्गत ८०० वृक्षांची लागवड केली आहे. शासकीय विश्रामगृह ते नालवाडी चौक आणि दादाजी धुनिवाले चौक ते आर्वी नाका या प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड केल्याने या परिसरामधील सौंदर्यात भर पडली आहे.खडकाळ टेकडीवर हिरवळ फुलविणारे ‘व्हीजेएम’मनुष्याच्या निरोगी आरोग्यासाठी धडपडणारे डॉक्टरांचे हात निसर्गाच्या आरोग्यासाठीही पुढे आल्याने वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने लोकसहभाग व श्रमदानातून ओसाड माळरानावर हिरवळ दाटली आहे. पिपरी परिसरातील हनुमान टेकडीवर ‘व्हीजेएम’च्या माध्यमातून विविध प्रजातीच्या १८ हजार ५०० वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपनही केले आहे. याही परिसराला ‘ऑक्सिजन पार्क’ असे नाव दिले असून येथे सुरुवातीला १३ हजार रोपे लावली होती. त्यांचे गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये बहारदार वृक्ष तयार झाले आहे. तसेच ‘मियावाकी’ वनामध्ये मागीलवर्षी साडेपाच हजार वृक्षांची लागवड केली होती. त्यामध्ये यावर्षी जुलै महिन्यात आणखी १ हजार ७०० झाडांची भर पडली आहे.दरवर्षीप्रमाणे ५ जून ते ३१ जुलैपर्यंत वृक्षलावगडीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत लोकसहभाग व श्रमदानातून ऑक्सिजन पार्क निसर्ग हिल येथे १ हजार वृक्षांची लागवड केली आहे. तसेच शहरातील विविध मार्गावरही वृक्ष लावले असून येत्या ३१ ऑगस्टपर्यंत मियावाकी प्रकल्पात दोन हजार वृक्ष रोप लावण्याचा संकल्प आहे. या कार्यात वर्धेकरांसह निसर्गप्रेमींची साथ मिळत आहे.मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष, निसर्ग सेवा समिती, वर्धा

टॅग्स :government schemeसरकारी योजना