शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

पालिकेच्या हलगर्जीने प्लास्टिकबंदीचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: November 14, 2015 02:18 IST

प्लास्टिक निर्मूलनार्थ शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. तसेच ५० मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांकडे

प्लास्टिक पिशव्यांचा खच : बंदीनंतर सर्रास वापरवर्धा : प्लास्टिक निर्मूलनार्थ शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. तसेच ५० मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांकडे आढळल्यास दंड ठोठावला जातो. पर्यावरणाचे संवर्धन आणि प्लास्टिक पिशव्यांमुळे कचरा विघटनाची निर्माण होणारी समस्या यावर तोडगा म्हणून हा कारवाईचा बडगा आहे. असे असले तरी शहरातील सर्व प्रमुख चौक, गटारे, सार्वजनिक स्थळे येथे प्लास्टिक पिशव्यांचा कचरा आढळतो. यावरून प्लास्टिक पिशव्या बंदीचा बट्ट्याबोळ पाहायला मिळतो.दिवाळीच्या दिवसात प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यावसायिकाकडून या नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला नियमात न बसणाऱ्या प्लास्टिक थैल्या देण्यात येत असल्याचे दिसून आले. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. शहरातील काही विक्रेत्यांकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या. त्यांच्यावर पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. तसेच प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. मात्र यानंतरही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा खच पहायला मिळतो. त्यामुळे या थातुरमातूर कारवाईने फारसा फरक पडलेला दिसत नाही. प्लास्टिक पिशव्या वापरावरील बंदीची तुलनेने कडक अंमलबजावणी होत नसल्याचे प्रत्ययास येते.पर्यावरणाला हानीकारक असलेल्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्याने त्यामुळे प्रदूषणात भर पडते. शिवाय कचरा व्यवस्थापन करताना प्लास्टिक पिशाव्यांच्या स्वरूपाने मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. याकरिता राज्यभर ही बंदी लागू केली असून दंडात्मक कारवाईचे प्रावधान करण्यात आले. या कायद्याची अंमलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणा यात कसूर करीत असल्याचे वारंवार उघडकीस येते. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)