शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या हलगर्जीने प्लास्टिकबंदीचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: November 14, 2015 02:18 IST

प्लास्टिक निर्मूलनार्थ शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. तसेच ५० मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांकडे

प्लास्टिक पिशव्यांचा खच : बंदीनंतर सर्रास वापरवर्धा : प्लास्टिक निर्मूलनार्थ शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. तसेच ५० मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांकडे आढळल्यास दंड ठोठावला जातो. पर्यावरणाचे संवर्धन आणि प्लास्टिक पिशव्यांमुळे कचरा विघटनाची निर्माण होणारी समस्या यावर तोडगा म्हणून हा कारवाईचा बडगा आहे. असे असले तरी शहरातील सर्व प्रमुख चौक, गटारे, सार्वजनिक स्थळे येथे प्लास्टिक पिशव्यांचा कचरा आढळतो. यावरून प्लास्टिक पिशव्या बंदीचा बट्ट्याबोळ पाहायला मिळतो.दिवाळीच्या दिवसात प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यावसायिकाकडून या नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला नियमात न बसणाऱ्या प्लास्टिक थैल्या देण्यात येत असल्याचे दिसून आले. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. शहरातील काही विक्रेत्यांकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या. त्यांच्यावर पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. तसेच प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. मात्र यानंतरही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा खच पहायला मिळतो. त्यामुळे या थातुरमातूर कारवाईने फारसा फरक पडलेला दिसत नाही. प्लास्टिक पिशव्या वापरावरील बंदीची तुलनेने कडक अंमलबजावणी होत नसल्याचे प्रत्ययास येते.पर्यावरणाला हानीकारक असलेल्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्याने त्यामुळे प्रदूषणात भर पडते. शिवाय कचरा व्यवस्थापन करताना प्लास्टिक पिशाव्यांच्या स्वरूपाने मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. याकरिता राज्यभर ही बंदी लागू केली असून दंडात्मक कारवाईचे प्रावधान करण्यात आले. या कायद्याची अंमलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणा यात कसूर करीत असल्याचे वारंवार उघडकीस येते. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)