शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी जागा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 22:13 IST

आष्टी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात यावी या मागणीकरिता युवा स्वाभिमान पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी तळेगाव श्यामजीपंत येथे नागपूर -मुंबई महामार्गावर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देतळेगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्यामजीपंत) : आष्टी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात यावी या मागणीकरिता युवा स्वाभिमान पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी तळेगाव श्यामजीपंत येथे नागपूर -मुंबई महामार्गावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, लहुजी शक्ती सेना, मानवहित लोकशाही पक्ष, राष्ट्रीय लहू शक्ती बहुजन रयत परिषद, भिम टायगर सेना आम आदमी पाटी आदींनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी प्रचंड नारेबाजी करण्यात आली.ये आझादी झुठी है देश की जनता भुकी है , अण्णा भाऊ साठे यांचा पुतळ्याच्या जागेचा प्रश्न निकाली निघालाच पाहिजे, आष्टी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या प्रकरणात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही झालीच पाहिजे असे नारे देण्यात आले. या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उळाली व काही काळ महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. मागील ४० वर्षांपासून अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आष्टी येथे वनविभाग कार्यालयाजवळ उभा करण्यात आला आहे. परंतु शासन प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक वर्षापासून अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा खितपत पडलेला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सौंदर्र्यीकरण व्हावं यासाठी मातंग समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून या प्रश्नाला निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आंदोलनाच्यावेळी दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष विनय इंगळे, भिम टायगरचे दर्पण टोकसे, बहुजन रयत परिषदेचे दिगंबर सेनेसर, राष्ट्रीय लहू शक्तीचे सुधाकर वाघमारे, मानवहीतचे ईश्वर गायकवाड, रणजित पोटफोडे रामकृष्ण गायकवाड, नितीन तायवाडे आपचे ऋषभ निस्ताने उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अन्यथा शासनाविरूध्द तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विविध संघटनांच्यावतीने देण्यात आला. आंदोलनाच्या वेळी कमलेश चिंधेकर, सिद्धार्थ कळंबे, राहुल विरेकर, संजय कांबळे, नानाभाऊ बोभाटे, अरुण लांडगे, बबन गायकवाड, राहुल प्रधान, गोपाल गिरडकर, मंगेश लांडगे, प्रेम खंडाळकर, अजय गायकवाड, अनिल कांबळे, रमेश राऊत, मंगेश प्रधान, देवरावजी प्रधान, सचिन प्रधान, शेखर तिरडे, आशिष अवचार, प्रभाकर लांडगे, सुधाकर लांडगे, रवींद्र वानखेडे, संजय पोटफोडे, बबलू धानोरकर आदीसह मातंग समाज कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.