शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

पाली भाषेला संघ लोकसेवा आयोगात स्थान द्या

By admin | Updated: February 22, 2016 02:21 IST

पाली ही देशातील महत्त्वाची भाषा आहे. पूर्वी सर्वच साहित्य पाली भाषेत होते; पण संविधान आणि संघ लोकसेवा आयोगातून हीच भाषा वगळण्यात आली आहे. ....

पत्रपरिषद : न्यायालयाच्या आदेशावर अंमल करण्याची मागणीवर्धा : पाली ही देशातील महत्त्वाची भाषा आहे. पूर्वी सर्वच साहित्य पाली भाषेत होते; पण संविधान आणि संघ लोकसेवा आयोगातून हीच भाषा वगळण्यात आली आहे. पाली भाषेला युपीएससीमध्ये पुन्हा स्थान द्यावे. याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशावर सहा महिन्यांत अंमलबजावणी करावी, अशी मागणी नालंदा बुद्ध विहार, तथागत संघ व प्रबुद्ध नागरिक संघाने केली. याबाबत नालंदा बुद्ध विहारात पत्रकार परिषद घेण्यात आली. पाली भाषा १९८१ ते २०१३ पर्यंत संघ लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होती; पण २०१३ मध्ये ती काढून टाकण्यात आली. यामुळे पाली भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. संविधानातही पूर्वी १४ भाषा होत्या. यानंतर २१, ७१ आणि ९२ व्या संशोधनानंतर एकूण २२ भाषांना मान्यता प्रदान करण्यात आली. यात शेजारी हिंदू राष्ट्र असलेल्या नेपाली भाषेला स्थान देण्यात आले; पण पाली भाषेचा विचार करण्यात आलेला नाही. संविधानाचाच आधार घेत संघ लोकसेवा आयोगानेही ही भाषा अभ्यासक्रमातून बाद केली. याबाबत पाली भाषा विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र खांडेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर १२ फेबु्रवारी २०१६ रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संघ लोकसेवा आयोगाला पाली भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे आदेश दिले. युपीएससीने २०१६ चा अभ्यासक्रम तयार झालेला असल्याने २०१७ च्या सत्रामध्ये पाली भाषेला स्थान देण्याचे मान्य केले. उच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या आत आदेशावर अंमल करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय शासनाने पुन्हा एकदा संशोधन करून संविधानात पाली भाषेचा समावेश करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात भाषेचा अंतर्भाव करण्याची तरतूद केली आहे. त्या तरतुदीच्या आधारे पालीला मान्यताप्राप्त भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत राष्ट्रपती व पंतप्रधानांना ८०० लोकांच्या सह्यांचे निवेदन पाठविण्यात आले व त्यांचेही उत्तर मिळाल्याचे सांगण्यात आले. पत्र परिषदेला निवृत्त राज्य उत्पादन शुल्क अधिकारी सुधीर भगत, मीरा गोटेकर, नालंदा बुद्ध विहार, तथागत संघ व प्रबुद्ध नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)