शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत १६६ शेतकऱ्यांना स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

महाराष्ट्रात सत्तापालट होताच महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जाच्या खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असेलली व परतफेड न झालेली २ लाखांपर्यतची रक्कम माफ करण्यात येणार आहे. या कर्जमुक्तीचा लाभ जास्तीत जास्त शेतकºयांना मिळावा याकरिता जिल्हानिहाय खातेधारकांची माहिती मागविण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२ लाख ४८ हजार खातेधारक : प्रायोगिक तत्त्वावर लोणी, येणगावची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यातून आतापर्यंत जवळपास ६० हजार खातेधारकांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. डाटा अपलोड करण्याचे काम सुरु असून आज राज्य शासनाने प्रायोगिक तत्त्वावर निवडक जिल्ह्याच्या प्रत्येकी दोन गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यात वर्धा जिल्ह्याच्या दोन गावांतील १६६ शेतकऱ्यांच्या समावेश आहे.महाराष्ट्रात सत्तापालट होताच महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जाच्या खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असेलली व परतफेड न झालेली २ लाखांपर्यतची रक्कम माफ करण्यात येणार आहे. या कर्जमुक्तीचा लाभ जास्तीत जास्त शेतकºयांना मिळावा याकरिता जिल्हानिहाय खातेधारकांची माहिती मागविण्यात आली आहे.त्यानुसार वर्धा जिल्ह्यात २ लाख ४८ हजार खातेधारक असून आतापर्यंत ६० हजार खातेधारकांची सर्व माहिती गोळा करुन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. शासनाने आज प्रायोगित तत्त्वावर पहिली यादी जाहीर करण्यात आली.याकरिता देवळी तालुक्यातील लोणी व कारंजा (घाडगे) तालुक्यातील येणगाव येथील १६६ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शेतकºयांना आता प्रमाणिकरण करुन घ्यावे लागणार आहे. यासाठी महसूल विभाग आणि बँकेचे कर्मचारी कामाला लागले आहे. त्यामध्ये काही त्रुट्या असल्यास दुरुस्ती करण्यात येणार आहे.९९ शेतकऱ्यांची झाली ओळखपरेडपहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आले आहेत. त्या शेतकऱ्यांना आता आधार कार्ड, बँक पासबूक, यादीत नमुद असलेला मोबाईल क्रमांक, यादीत नावासमोर असलेला विशिष्ट क्रमांक लिहून जवळच्या आपले सरकार केंद्र, बँक शाखा किंवा स्वस्त धान्य दुकानावर आपले प्रमाणिकरण करायचे आहे. आतापर्यंत पहिल्या यादीतील १६६ शेतकऱ्यांपैकर ९९ शेतकºयांनी प्रमाणिकरण केले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे येत्या दोन ते तीन दिवसात प्रमाणिकरण केले जाणार आहे.२८ फेब्रुवारीनंतर दुसरी यादी होणार जाहीरपहिली यादी ही प्रायोगिक तत्त्वावर जाहीर केली असून यात काय अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी किती कालावधी लागतो याचा अभ्यास केला जाणार आहे.पहिल्या यादीतील शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण झाल्यानंतर लगेच २८ फेबु्रवारीला दुसरी यादी जाहीर होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत नवीन हगामापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन पुढील शेतीकरिता पीककर्ज घेणे सुलभ व्हावे, या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.