शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पिपरी (मेघे) ग्रा.पं. घेते नियमबाह्यपणे इमला कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:33 IST

नजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे; पण ते अतिक्रमण झटपट काढण्यासाठी वनविभागाच्यावतीने प्रभावी पाऊल उचलण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे.

ठळक मुद्देकारलाचे अतिक्रमण : वीजसह नळजोडणीचा आदेश कुणाचा?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे; पण ते अतिक्रमण झटपट काढण्यासाठी वनविभागाच्यावतीने प्रभावी पाऊल उचलण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. शिवाय पिपरी (मेघे) ग्रा.पं. प्रशासन वन (संवर्धन) अधिनियम १९८० च्या कलम २ ला बगल देत सदर अतिक्रमण धारकांकडून इमला कर वसूल करीत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून पक्के घर बांधण्यात आले आहेत. तसेच सदर घरांना वीज आणि नळ जोडणीही देण्यात आली आहे. परंतु, सदर जोडणीसाठीचा आदेश कुठल्या अधिकाऱ्याने दिला, हेच सध्या न उलगडणारे कोड ठरत आहे.प्राप्त माहितीनुसार, मौजा कारला येथील सर्वे क्रमांक ९८ आराजी ३.६४ हेक्टर, सर्वे क्रमांक ९९ आराजी ७.९२ हेक्टर व सर्वे क्रमांक ०.७२ हेक्टर ही जागा महसूल विभागाने काही वर्षांपूर्वी वनविभागाकडे वळती केली. त्याची नोंद महसूल विभागाने झुडपी जंगल म्हणून घेतली आहे. मात्र, जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरानजीकच्या याच वनविभागाच्या सुमारे ३० एकर जमिनीवर रामा राजू बागडे, महेंद्र मरजीवे, प्रेमिला प्रल्हाद उईके, सरिता रमेश उईके, लोकराम बाबुलाल बागडे, अनिता गजानन बास्टेकर, अर्चना राजेंद्र लाखे, हेमंत वडसकर, प्रकाश गव्हारकर, प्रल्हाद गणपत उईके व आणखी ५८ च्यावर व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. पूर्वी या जागेवर झुडपी जंगल होते. परंतु, त्या परिसरातील अतिक्रमण धारकांसह काही अवैध वृक्ष कत्तल करणाऱ्यांनी सध्या येथील डेरेदार वृक्षही तोडल्याचे दिसून येते. शिवाय अनेकांनी अतिक्रमण करून पक्के घर बांधले आहेत. अतिक्रमण केलेल्या जागेवरील घरांना विद्युत पुरवठा करता येत नाही. शिवाय नळ जोडणीही देता येत नाही. मात्र, कारला येथील सदर वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमण धारकांच्या घरी महावितरणकडून विद्युत जोडणी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने नळजोडणी देण्यात आली आहे. सदर प्रकार वनविभाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात पुढे आला आहे. वन (संवर्धन) अधिनियम १९८० च्या कलम २ नुसार वनविभागाची जागा इतर वानीकी कामासाठी विनापरवानगी वापरता येत नाही; पण त्याला बगल दिली जात असल्याचे दिसून येते.आष्टीतील ‘ते’ प्रकरण भोवले होते तहसीलदारांनाआष्टी परिसरातील वनविभागाच्या एका जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांना विद्युत व नळ जोडणी देण्यासंदर्भात आदेश निर्गमित करणे चांगलेच भोवले होते. हा संपूर्ण प्रकार सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी घडला होता. तर कारला येथे कुणाच्या आदेशान्वये विद्युत आणि नळ जोडणी देण्यात आली असा प्रश्न वनविभागाच्या कर्मचाºयांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण