शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पिपरी (मेघे) ग्रा.पं. घेते नियमबाह्यपणे इमला कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:33 IST

नजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे; पण ते अतिक्रमण झटपट काढण्यासाठी वनविभागाच्यावतीने प्रभावी पाऊल उचलण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे.

ठळक मुद्देकारलाचे अतिक्रमण : वीजसह नळजोडणीचा आदेश कुणाचा?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे; पण ते अतिक्रमण झटपट काढण्यासाठी वनविभागाच्यावतीने प्रभावी पाऊल उचलण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. शिवाय पिपरी (मेघे) ग्रा.पं. प्रशासन वन (संवर्धन) अधिनियम १९८० च्या कलम २ ला बगल देत सदर अतिक्रमण धारकांकडून इमला कर वसूल करीत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून पक्के घर बांधण्यात आले आहेत. तसेच सदर घरांना वीज आणि नळ जोडणीही देण्यात आली आहे. परंतु, सदर जोडणीसाठीचा आदेश कुठल्या अधिकाऱ्याने दिला, हेच सध्या न उलगडणारे कोड ठरत आहे.प्राप्त माहितीनुसार, मौजा कारला येथील सर्वे क्रमांक ९८ आराजी ३.६४ हेक्टर, सर्वे क्रमांक ९९ आराजी ७.९२ हेक्टर व सर्वे क्रमांक ०.७२ हेक्टर ही जागा महसूल विभागाने काही वर्षांपूर्वी वनविभागाकडे वळती केली. त्याची नोंद महसूल विभागाने झुडपी जंगल म्हणून घेतली आहे. मात्र, जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरानजीकच्या याच वनविभागाच्या सुमारे ३० एकर जमिनीवर रामा राजू बागडे, महेंद्र मरजीवे, प्रेमिला प्रल्हाद उईके, सरिता रमेश उईके, लोकराम बाबुलाल बागडे, अनिता गजानन बास्टेकर, अर्चना राजेंद्र लाखे, हेमंत वडसकर, प्रकाश गव्हारकर, प्रल्हाद गणपत उईके व आणखी ५८ च्यावर व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. पूर्वी या जागेवर झुडपी जंगल होते. परंतु, त्या परिसरातील अतिक्रमण धारकांसह काही अवैध वृक्ष कत्तल करणाऱ्यांनी सध्या येथील डेरेदार वृक्षही तोडल्याचे दिसून येते. शिवाय अनेकांनी अतिक्रमण करून पक्के घर बांधले आहेत. अतिक्रमण केलेल्या जागेवरील घरांना विद्युत पुरवठा करता येत नाही. शिवाय नळ जोडणीही देता येत नाही. मात्र, कारला येथील सदर वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमण धारकांच्या घरी महावितरणकडून विद्युत जोडणी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने नळजोडणी देण्यात आली आहे. सदर प्रकार वनविभाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात पुढे आला आहे. वन (संवर्धन) अधिनियम १९८० च्या कलम २ नुसार वनविभागाची जागा इतर वानीकी कामासाठी विनापरवानगी वापरता येत नाही; पण त्याला बगल दिली जात असल्याचे दिसून येते.आष्टीतील ‘ते’ प्रकरण भोवले होते तहसीलदारांनाआष्टी परिसरातील वनविभागाच्या एका जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांना विद्युत व नळ जोडणी देण्यासंदर्भात आदेश निर्गमित करणे चांगलेच भोवले होते. हा संपूर्ण प्रकार सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी घडला होता. तर कारला येथे कुणाच्या आदेशान्वये विद्युत आणि नळ जोडणी देण्यात आली असा प्रश्न वनविभागाच्या कर्मचाºयांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण