शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

उबदा ते मांगली रस्त्याची दैना

By admin | Updated: January 28, 2017 01:08 IST

नजीकच्या मांगली या गावात जाणाऱ्या रस्त्याची सध्या दैनावस्था झाली असून सदर प्रकारामुळे

ग्रामस्थांना नाहक त्रास : माहिती देऊनही संबंधितांचे दुर्लक्ष हिंगणघाट : नजीकच्या मांगली या गावात जाणाऱ्या रस्त्याची सध्या दैनावस्था झाली असून सदर प्रकारामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरूस्तीकरिता संबंधीतांना वेळोवेळी माहिती देण्यात आली. परंतु, तेही याकडे दुर्लक्ष करीत आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे. नजीकचे मांगली हे गाव समुद्रपूर तालुक्यात येत असून ५०० लोकवस्तीचे हे गाव आहे. स्वातंत्र काळापासून या गावातील नागरिक रस्त्याच्या समस्येने त्रस्त आहे. मांगली या गावात जाण्याकरिता राष्ट्रीय महामार्गा सात वरील उबदा या गावाजवळून रस्ता आहे. उबदा येथून मांगली या गावाचे २.२५ कि.मी. अंतर आहे. या रस्याचे खडीकरण १५ वषापूर्वी झाले. तसेच त्यातील केवळ ५०० मीटरचे डांबरीकरण झालेले आहे. मांगली येथील ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांना ये-जा करण्याकरिता हाच रस्त्या असून तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.परंतू, तत्कालीन करण्यात आलेले रस्त्याचे खडीकरण सध्या पूर्णपणे उखडले आहे. परिणामी, या रस्त्याने पायी जाणाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना तारेवरची कसरत करूनच पुढील प्रवास करावा लागतो. मांगली येथील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी हिंगणघाट, समुद्रपूर व उबदा येथे याच दैनावस्था झालेल्या रस्त्याने प्रवास करून शाळा गाठतात. तर शेतकऱ्यांनाही शेतात जाण्यासाठी याच खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढावा लागत आहे. वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांची समस्या निकाली निघावी म्हणून संबंधीतांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली. परंतु, तेही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने समस्या अद्यापही कायम आहे. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे मांगली येथील ग्रामस्त मेटाकुटीस आले आहे. परिसरातील लोकप्रतिनिधी व संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी जातीने लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी) आंदोलनाचा इशारा ४उबदा-मांगली रस्त्याच्या दैनावस्थेमुळे वाहनचालकांसह ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहे. सदर रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शंकर आडे, गणपत नवघरे, शंकर खडसे, अशोक उईके, विनोद राऊत, महेश राऊत, भास्कर हिवरकर, रमेश हिवरकर, रमेश वैद्य, गजानन पिसुड्डे, प्रभाकर बैलमारे, गणपत डहाके, आशीष मसराम, रवी सिडाम आदींनी उपविभागीय महसूल अधिकारी स्मिता पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.