शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उबदा ते मांगली रस्त्याची दैना

By admin | Updated: January 28, 2017 01:08 IST

नजीकच्या मांगली या गावात जाणाऱ्या रस्त्याची सध्या दैनावस्था झाली असून सदर प्रकारामुळे

ग्रामस्थांना नाहक त्रास : माहिती देऊनही संबंधितांचे दुर्लक्ष हिंगणघाट : नजीकच्या मांगली या गावात जाणाऱ्या रस्त्याची सध्या दैनावस्था झाली असून सदर प्रकारामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरूस्तीकरिता संबंधीतांना वेळोवेळी माहिती देण्यात आली. परंतु, तेही याकडे दुर्लक्ष करीत आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे. नजीकचे मांगली हे गाव समुद्रपूर तालुक्यात येत असून ५०० लोकवस्तीचे हे गाव आहे. स्वातंत्र काळापासून या गावातील नागरिक रस्त्याच्या समस्येने त्रस्त आहे. मांगली या गावात जाण्याकरिता राष्ट्रीय महामार्गा सात वरील उबदा या गावाजवळून रस्ता आहे. उबदा येथून मांगली या गावाचे २.२५ कि.मी. अंतर आहे. या रस्याचे खडीकरण १५ वषापूर्वी झाले. तसेच त्यातील केवळ ५०० मीटरचे डांबरीकरण झालेले आहे. मांगली येथील ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांना ये-जा करण्याकरिता हाच रस्त्या असून तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.परंतू, तत्कालीन करण्यात आलेले रस्त्याचे खडीकरण सध्या पूर्णपणे उखडले आहे. परिणामी, या रस्त्याने पायी जाणाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना तारेवरची कसरत करूनच पुढील प्रवास करावा लागतो. मांगली येथील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी हिंगणघाट, समुद्रपूर व उबदा येथे याच दैनावस्था झालेल्या रस्त्याने प्रवास करून शाळा गाठतात. तर शेतकऱ्यांनाही शेतात जाण्यासाठी याच खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढावा लागत आहे. वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांची समस्या निकाली निघावी म्हणून संबंधीतांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली. परंतु, तेही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने समस्या अद्यापही कायम आहे. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे मांगली येथील ग्रामस्त मेटाकुटीस आले आहे. परिसरातील लोकप्रतिनिधी व संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी जातीने लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी) आंदोलनाचा इशारा ४उबदा-मांगली रस्त्याच्या दैनावस्थेमुळे वाहनचालकांसह ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहे. सदर रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शंकर आडे, गणपत नवघरे, शंकर खडसे, अशोक उईके, विनोद राऊत, महेश राऊत, भास्कर हिवरकर, रमेश हिवरकर, रमेश वैद्य, गजानन पिसुड्डे, प्रभाकर बैलमारे, गणपत डहाके, आशीष मसराम, रवी सिडाम आदींनी उपविभागीय महसूल अधिकारी स्मिता पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.