शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सेलूच्या पहिल्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीचे चित्र अस्पष्टच

By admin | Updated: November 20, 2015 02:32 IST

येथील नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. ३० नोव्हेंबरला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे.

भाजपची अफलातून खेळी : दप्तरी गटाकडे सातच सदस्यप्रफुल्ल लुंगे सेलूयेथील नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. ३० नोव्हेंबरला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. मात्र नगराध्यक्षपदासाठी आवश्यक असलेल्या नऊ सदस्यांचा आकडा एकाही पक्षाकडे नसल्यामुळे सेलूचा पहिला नगराध्यक्ष कोण होईल, याबाबतची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेस, भाजप आणि दप्तरी गटाने जिल्हाधिकाऱ्याकडे गटांची नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक ६ सदस्यसंख्या असलेल्या शैलेंद्र दप्तरी गटाने अपक्ष अनिल देवतारे यांना सोबत घेऊन सात सदस्यीय गटाची नोंदणी केली. भाजपकडे तीन सदस्य असूनही अपक्ष सदस्य शैला शब्बीर अली सय्यद यांच्या नावाने चार जणांच्या गटाची नोंदणी केली. भाजपने अपक्ष सदस्याच्या नावाने नोंदणी का केली, असा सवाल सर्वांना बुचकाळ््यात टाकत आहे. सदर अपक्ष सदस्य या शेखर शेंडे गटाच्या असल्याचे बोलले जात आहे. अपक्ष गटाच्या नावाने भाजप नगराध्यक्षपदासाठी भाजपातून बंडखोरी करून सहा जागांसह निवडून आलेल्या दप्तरी गटाला सहकार्य करतील आणि गुपचूप सत्तेत सहभागी होतील, अशीही चर्चा आहे. अन्यथा भाजपही नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरतील, हेही नाकारता येत नाही. अपक्ष शेंडे गटाच्या सैय्यद यांच्या नावावर गटाची नोंदणी केल्याच्या वृत्ताला भाजपची काही नेते मंडळी दुजोराही देत आहे. नगर पंचायत अध्यक्षाच्या निवडणुकीत सत्तेचे समीकरण नेमके कसे राहील, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दप्तरी गटाला सत्ता स्थापन्यासाठी पुन्हा दोन सदस्यांची गरज असून गटांच्या नोंदणीनंतर हा मार्ग धूसर झाला आहे. बसपाचा एकमेव सदस्य अलिप्तच आहे. या निवडणुकीत जनतेने त्रिशंकु कौल दिलेला आहे. यामुळे १७ सदस्य संख्या असलेल्या सेलू नगर पंचायतीमध्ये सत्ता कुणाची हा प्रश्न सुरुवातीपासून रहस्यमय बनला आहे. कॉँग्रेस (जयस्वाल गट) - ५, दप्तरी गट - ६, भाजपा - ३, बसपा- १ व अपक्ष-२ असे सदस्य निवडून आल्यामुळे सत्तेचे समीकरण जुळविण्याचा खटाटोप सुरू आहे.सत्तेचे असेही समीकरणभाजपच्या तीन सदस्यांसह अपक्ष सदस्य शैला सय्यद यांच्या नावाने स्थापन झालेल्या चार सदस्यीय नव्या गटाने दप्परी गटाशी हात मिळविणी केली तरी सत्तेचे समीकरण जूळून येणे शक्य आहे. दुसरीकडे काँग्रेसचे पाच आणि दप्तरी गटाचे सात असेही नवे समीकरण जुळून आल्यास सत्तेचा मार्ग मोकळा होऊ शकतो.वरील दोन्ही शक्यता धुसर झाल्यास काँग्रेस, दप्तरी गट व भाजपचा सय्यद गट स्वतंत्ररित्या ही निवडणूक लढण्याची शक्यताही नाकारता येत नाही आहे.