शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
5
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
6
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
7
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
8
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
9
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
10
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
11
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
12
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
13
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
14
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
15
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
16
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
17
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
18
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
19
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

बोंडअळीच्या सर्वेक्षणात छायाचित्र ठरतेय अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:25 IST

आॅनलाईन लोकमतवर्धा : पेरा अधिक झाल्याने कापसाचे उत्पन्न बºयापैकी होईल, अशी अपेक्षा होती; पण बोंडअळी, गुलाबी अळीने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरविले. परिणामी सर्वस्तरातून आंदोलने होत आहे. यामुळे शासनाने शेतपिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले; पण यासाठी कालावधी अत्यल्प देण्यात आला. यातील पाच दिवस निघून गेले असून आता पाचच दिवसांत सर्वेक्षण करावयाचे ...

ठळक मुद्देकालावधी अत्यल्प : कृषी विभागाच्या हातात पाच दिवस

आॅनलाईन लोकमतवर्धा : पेरा अधिक झाल्याने कापसाचे उत्पन्न बºयापैकी होईल, अशी अपेक्षा होती; पण बोंडअळी, गुलाबी अळीने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरविले. परिणामी सर्वस्तरातून आंदोलने होत आहे. यामुळे शासनाने शेतपिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले; पण यासाठी कालावधी अत्यल्प देण्यात आला. यातील पाच दिवस निघून गेले असून आता पाचच दिवसांत सर्वेक्षण करावयाचे आहे. यातही जीपीएसयुक्त छायाचित्र पाठवायचे असल्याने तो सर्वेक्षणातील अडथळा ठरू लागला आहे.मागील वर्षीपेक्षा यंदा कपाशीचा पेरा अधिक झाला. सोयाबीन उत्पन्न देत नसल्याने कपाशीवर शेतकºयांची भिस्त होती; पण बीटी कपाशीवरही बोंडअडीचा प्रादुर्भाव झाला. उत्पादन घटल्याने शेतकरी निराश झाले होते. बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा कंपन्या करतात; पण यावर्षी मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. गुलाबी बोंडअळीसोबतच बोंडामध्ये अन्य अळ्या असल्याने संपूर्ण शेतातील कपाशी उद्ध्वस्त होत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच वर्धा जिल्ह्यातही कपाशीवर बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. बोंडअळीमुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. प्रारंभी कपाशीला फारशी बोंडे नव्हती. त्यानंतर बोंडामध्ये अळीने शिरकाव करीत पीक खराब केल्याने शेतकºयांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.कपाशीतील बोंड अळीमुळे नुकसान झाल्याची प्रकरणे पूढे येत आहेत. शिवाय धान उत्पादक जिल्ह्यांत धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावाने धानाचे नुकसान झाले. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी सर्वस्तरातून करण्यात येत आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत या दोन्ही पिकांवरील झालेल्या कीड हल्ल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी त्वरित पंचनामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकसानीचे पंचनामे दहा दिवसांच्या आत करावे, असे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. सोबतच नुकसानीच्या दाव्याची ग्राह्यता पडताळण्याकरिता पंचनामे करताना नुकसानग्रस्त शेतीचे जीपीएस इनबिल्ड मोबाईल अ‍ॅपच्या साह्याने छायाचित्र काढण्यात यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. नुकसान ठरविण्यासाठी पिकाची सातबाऱ्यावर नोंद आवश्यक आहे. पंचनामे झाल्यानंतर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांबाबत बाधित शेतकºयांना मदत देण्यास्तव सविस्तर अहवाल शासनाला सादर करावेत, असे आदेश अधिकाºयांना देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने काही प्रमाणात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांपासून अर्ज भरून घेतले जात आहेत; पण जीपीएस इनबिल्ड छायाचित्राची अट घातल्याने हे काम वेळेत पूर्ण कसे होणार, हा प्रश्नच आहे. कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित नसेल, त्यावेळी काय करणार, ग्रामीण भागात मोबाईलला कव्हरेज मिळत नाही. मग, ही यंत्रणा कितपत योग्य ठरेल, आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.आता केवळ पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. या पाच दिवसांत मोबाईलमध्ये फोटो काढून शासनाला अहवाल सादर करावे लागणार आहेत. ही कामे कशी पूर्ण होणार, खरोखर नुकसानग्रस्तांचे अहवाल पोहोचून मदत मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.मदतीसाठी खटाटोप की, केवळ देखावा?राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार दहा दिवसांत सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ७ ढियेंबा रोजी शासनाचे आदेश निर्गमित झाले. ९ व १० डिसेंबर रोजी सुटी होती आणि पुन्हा एक रविवार येणार आहे. यामुळे चार ते पाच दिवसच मिळणार आहे. मग, हा खटाटोप खरोखर मदत मिळावी म्हणून केला जातोय की, केवळ देखावा निर्माण केला जात आहे, असा प्रश्न संतप्त शेतकरी उपस्थित करीत आहेत.अधिवेशनाच्या कामात अधिकारी, कर्मचारी व्यस्त असतात. अशावेळी अत्यल्प कालावधीत प्रत्येक शेतात पोहोचणे शक्य होणार आहे काय, कृषी विभागाकडे तेवढी यंत्रणा कार्यरत आहे काय, आदी बाबी तपासणेही गरजेचे झाले आहे.