शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या सर्वेक्षणात छायाचित्र ठरतेय अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:25 IST

आॅनलाईन लोकमतवर्धा : पेरा अधिक झाल्याने कापसाचे उत्पन्न बºयापैकी होईल, अशी अपेक्षा होती; पण बोंडअळी, गुलाबी अळीने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरविले. परिणामी सर्वस्तरातून आंदोलने होत आहे. यामुळे शासनाने शेतपिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले; पण यासाठी कालावधी अत्यल्प देण्यात आला. यातील पाच दिवस निघून गेले असून आता पाचच दिवसांत सर्वेक्षण करावयाचे ...

ठळक मुद्देकालावधी अत्यल्प : कृषी विभागाच्या हातात पाच दिवस

आॅनलाईन लोकमतवर्धा : पेरा अधिक झाल्याने कापसाचे उत्पन्न बºयापैकी होईल, अशी अपेक्षा होती; पण बोंडअळी, गुलाबी अळीने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरविले. परिणामी सर्वस्तरातून आंदोलने होत आहे. यामुळे शासनाने शेतपिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले; पण यासाठी कालावधी अत्यल्प देण्यात आला. यातील पाच दिवस निघून गेले असून आता पाचच दिवसांत सर्वेक्षण करावयाचे आहे. यातही जीपीएसयुक्त छायाचित्र पाठवायचे असल्याने तो सर्वेक्षणातील अडथळा ठरू लागला आहे.मागील वर्षीपेक्षा यंदा कपाशीचा पेरा अधिक झाला. सोयाबीन उत्पन्न देत नसल्याने कपाशीवर शेतकºयांची भिस्त होती; पण बीटी कपाशीवरही बोंडअडीचा प्रादुर्भाव झाला. उत्पादन घटल्याने शेतकरी निराश झाले होते. बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा कंपन्या करतात; पण यावर्षी मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. गुलाबी बोंडअळीसोबतच बोंडामध्ये अन्य अळ्या असल्याने संपूर्ण शेतातील कपाशी उद्ध्वस्त होत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच वर्धा जिल्ह्यातही कपाशीवर बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. बोंडअळीमुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. प्रारंभी कपाशीला फारशी बोंडे नव्हती. त्यानंतर बोंडामध्ये अळीने शिरकाव करीत पीक खराब केल्याने शेतकºयांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.कपाशीतील बोंड अळीमुळे नुकसान झाल्याची प्रकरणे पूढे येत आहेत. शिवाय धान उत्पादक जिल्ह्यांत धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावाने धानाचे नुकसान झाले. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी सर्वस्तरातून करण्यात येत आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत या दोन्ही पिकांवरील झालेल्या कीड हल्ल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी त्वरित पंचनामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकसानीचे पंचनामे दहा दिवसांच्या आत करावे, असे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. सोबतच नुकसानीच्या दाव्याची ग्राह्यता पडताळण्याकरिता पंचनामे करताना नुकसानग्रस्त शेतीचे जीपीएस इनबिल्ड मोबाईल अ‍ॅपच्या साह्याने छायाचित्र काढण्यात यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. नुकसान ठरविण्यासाठी पिकाची सातबाऱ्यावर नोंद आवश्यक आहे. पंचनामे झाल्यानंतर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांबाबत बाधित शेतकºयांना मदत देण्यास्तव सविस्तर अहवाल शासनाला सादर करावेत, असे आदेश अधिकाºयांना देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने काही प्रमाणात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांपासून अर्ज भरून घेतले जात आहेत; पण जीपीएस इनबिल्ड छायाचित्राची अट घातल्याने हे काम वेळेत पूर्ण कसे होणार, हा प्रश्नच आहे. कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित नसेल, त्यावेळी काय करणार, ग्रामीण भागात मोबाईलला कव्हरेज मिळत नाही. मग, ही यंत्रणा कितपत योग्य ठरेल, आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.आता केवळ पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. या पाच दिवसांत मोबाईलमध्ये फोटो काढून शासनाला अहवाल सादर करावे लागणार आहेत. ही कामे कशी पूर्ण होणार, खरोखर नुकसानग्रस्तांचे अहवाल पोहोचून मदत मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.मदतीसाठी खटाटोप की, केवळ देखावा?राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार दहा दिवसांत सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ७ ढियेंबा रोजी शासनाचे आदेश निर्गमित झाले. ९ व १० डिसेंबर रोजी सुटी होती आणि पुन्हा एक रविवार येणार आहे. यामुळे चार ते पाच दिवसच मिळणार आहे. मग, हा खटाटोप खरोखर मदत मिळावी म्हणून केला जातोय की, केवळ देखावा निर्माण केला जात आहे, असा प्रश्न संतप्त शेतकरी उपस्थित करीत आहेत.अधिवेशनाच्या कामात अधिकारी, कर्मचारी व्यस्त असतात. अशावेळी अत्यल्प कालावधीत प्रत्येक शेतात पोहोचणे शक्य होणार आहे काय, कृषी विभागाकडे तेवढी यंत्रणा कार्यरत आहे काय, आदी बाबी तपासणेही गरजेचे झाले आहे.