शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महापुरूषांच्या तत्वज्ञानाचा विसर पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:07 IST

फुले, शाहु, आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या जगण्या व्यतिरिक्त आपण जगत आहो. त्यांच्या विचारापासून दूर जात आहे. ज्या फुल्यांनी शेतकºयांच्या बाजूने आसुड उगारला त्या तत्त्वज्ञानाचा आपणाला विसर पडला आहे.

ठळक मुद्देश्रीपाद भालचंद्र जोशी : श्यामसुंदर अग्रवाल स्मृती व्याख्यानमाला कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : फुले, शाहु, आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या जगण्या व्यतिरिक्त आपण जगत आहो. त्यांच्या विचारापासून दूर जात आहे. ज्या फुल्यांनी शेतकºयांच्या बाजूने आसुड उगारला त्या तत्त्वज्ञानाचा आपणाला विसर पडला आहे. कालपर्यंत भारत हा नायक होता. जगाला विचार देणारा देश म्हणून याकडे पाहिले जात होते;पण आज तो विचार पूर्णत: मेला आहे. एका झेंड्याच्या प्रक्रियेमुळे हा विचार नष्ट होवू पाहत आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.स्थानिक श्यामसुंदर अग्रवाल स्मृती व्याख्यानमालेत ते ‘आपल्या भोवतालचे जग’ या विषयावर मार्गदर्शन६ करताना बोलत होते. अग्रवाल धर्मशाळेत आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप दाते, डॉ. विलास देशपांडे व संजय इंगळे तिगावकर यांची उपस्थिती होती.डॉ. श्रीपाद जोशी पुढे म्हणाले, ईश्वराची तादात्तय, परमात्मा, देव या सर्व आपण तयार केलेल्या कल्पना आहेत. दिवसेंदिवस अध्यात्माचे बाजारीकरण होत आहे. यातूनच अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. तर्काने व बुद्धीने विचार करण्याची तयारी नसल्याने तसेच वैचारिक व सांस्कृतिक जडणघडणाअभावी हे सर्व घडत आहे. ग्रामीण भागाने संस्कृतीचे जतन केले;पण शहरीकरणामुळे तेही नासत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गत ३४ वर्षांपासून लोकशिक्षणाचे कार्य या व्याख्यानमालेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. श्यामसुंदर अग्रवाल याचा सामाजिक वारसा पुढे रेटण्यासाठी प्रयत्न होत आहे. विचार आणि विवेकाच्या आधारावर समस्त समाज व्यवस्थेत बदल होणे अपेक्षित आहे, असे विचार खासदार तडस यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी शहरातून प्रथम आलेल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात ऋतुका राजेंद्र भोयर व स्रेहा आनंद लाडेकर यांचा समावेश होता. जनता हायस्कूलच्या उपमुख्याध्यापका वनिता मदनकर यांनी कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक प्राचार्य राहुल चोपडा यांनी केले. संचालन महेश अग्रवाल यांनी केले तर आभार मोहनलाल अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला प्रकाश चंद्र कांकरीया, दाऊदास टावरी, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, हाजी अब्दुल हमीद, शरद नाईक महाराज, पुरूषोत्तम टावरी, मधु अग्रवाल, सुरजमल जैन, नगरसेवक नंदू वैद्य, हरिष ओझा, श्याम बासू, दिपक अग्रवाल, सोपान लोखंडे, नरेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती.