शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ देणार

By admin | Updated: March 19, 2016 02:05 IST

शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा कायम राहावा, तसेच शेतकऱ्यांना उत्पादित धान्य व्यापाऱ्यांमार्फत बाजारपेठेत न

वर्धा : शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा कायम राहावा, तसेच शेतकऱ्यांना उत्पादित धान्य व्यापाऱ्यांमार्फत बाजारपेठेत न आणता थेट ग्राहकांना शेतातील उत्पादित माल सहज व सुलभपणे योग्य भावात मिळावा, यासाठी एमगिरी परिसरात शेतमाल विक्रीसाठी कायमस्वरुपी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही खा. रामदास तडस यांनी दिली. एमगिरी परिसरात कृषी व पणन विभाग तसेच आत्मामार्फत आयोजित धान्य महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी खा. तडस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आशुतोष सलील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून एमगिरीेचे संचालक डॉ. प्रफुल्ल काळे, आत्माचे प्रकल्प संचालक दीपक पटेल, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, कृषीतज्ज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, प्रदीप धवने उपस्थित होते.धान्य महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहचता येते व ग्राहकांनाही बाजारभावापेक्षा कमी दराने व शेतात उत्पादित केलेला शेतमाल उपलब्ध होतो. शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ व भाव मिळत आहे. एमगिरी परिसरात राज्यातील पहिली शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बाजारपेठ बांधण्यासाठी आवश्यक असणारा निधी खासदार निधीतून अथवा जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, तसेच उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव न मिळाल्यामुळे धान्य बाजार ही संकल्पना जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात राबविण्याचा मानस आहे. शेतकरी ते ग्राहक असे कायम नाते निर्माण करून ग्राहकांना नियमिंत धान्य पुरवठा करण्यासाठी बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचेही ते यावेळी म्हणाले. एमगिरीचे संचालक प्रफुल्ल काळे यांनी बाराही महिने शेतकऱ्यांना विक्रीची कायम व्यवस्था असावी, यादृष्टीने जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून शेतकऱ्यांना या पुढे कुणालाही कमिशन न देता, आपला माल विकता यावा यासाठी बाजारपेठ ही संकल्पना राबविण्याची सूचना यावेळी केली. प्रारंभी आत्म्याचे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी धान्य महोत्सव आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. या महोत्सवामध्ये पवनी भंडारा येथील केशर, चिन्नोर आदी तांदूळ तसेच शेतकरी बचत गटाने तयार केलेले तूरडाळ, गहू, चणा, हळद, मिरची तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे विविध फळ व भाजीपाला खाद्यपदार्थ हे या धान्य महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे संचालन विलास दवणे यांनी केले तर आभार पंकज सावरकर यांनी मानले. यावेळी तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड, जनार्दन झाडे तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व संघाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा धान्य महोत्सव २० मार्च पर्यंत आयोजित आहे. येथे विविध ठिकाणाहून शेतकरी सहभागी झाले आहेत.(प्रतिनिधी)शेतकरी गटांचे ४२ स्टॉल ४धान्य महोत्सवात शेतकरी गटाच्या ४२ स्टॉलवरून धान्याची विक्री सुरू आहे. यात भंडाऱ्याच्या केशर, चिन्नोर तांदळाला तर वर्धेच्या तूर डाळीला अधिक मागणी असल्याचे दिसून आले आहे. या महोत्सवात शेतकरी उत्पादक गटातर्फे फळ व भाजीपालाही उपलब्ध करण्यात आला आहे.