शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकांची कामे जलदगतीने करा

By admin | Updated: July 9, 2015 02:15 IST

शहरातील सामान्यांना शिधापत्रिकांसाठी कित्येक महिने चकरा माराव्या लागत आहे.

दलाल हटवा : आम आदमी पार्टीची तक्रारहिंगणघाट : शहरातील सामान्यांना शिधापत्रिकांसाठी कित्येक महिने चकरा माराव्या लागत आहे. उलट दलालामार्फत गेल्यास हेच काम जलद होते, अशी तक्रार आम आदमी पक्षाने केली आहे. ही व्यवस्था दलालरहित करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे.तहसील कार्यालयात दलालांचा शिरकाव झाल्याने व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहे. नवीन शिधापत्रिका बनविण्यासाठी वा नाव कमी-अधिक करण्यासाठी अनेकदा चकरा माराव्या लागतात. याबाबतच्या तक्रारी लक्षात घेत सामान्यांची कामे वेळेत व्हावीे, यासाठी आम आदमी पक्षाने पुढाकार घेऊन येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले. सामान्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केरोसीन गरजेचे असते. सध्या पावसाळा असल्याने केरोसीनची गरज आणखी वाढते. जीवनावश्यक रॉकेल शासनमान्य विक्रेत्याकडून रेशनकार्डवर मिळते. यासाठी नागरिकांना रेशनकार्ड मिळणे गरजेचे आहे. शिधापत्रिका बनविण्यासाठी पुरवठा विभागात पाच-दहा चकरा माराव्या लागतात. शेवटी कंटाळून नागरिक दलालामार्फत जातात आणि तेव्ही जलद काम होते, हा अनुभव आहे. शासकीय नियमावलीनुसार रेशनकार्डसाठी अर्ज दिल्यानंतर सहा दिवसांत कार्ड मिळायला पाहिजे; पण तसे होत नाही. पुरवठा विभागात शिल्लक १०० ते १५० अर्जांवर त्वरित कारवाई करून निकाली काढावी व तेथील व्यवस्था अधिक सक्षम करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.राजीव गांधी जीवनदायी योजनेत राशनकार्ड आवश्यक केल्याने गरजू रुग्णांचा जीव वाचविण्यासाठीही त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना मनोज रूपारेल प्रमोद जुमडे, अखिल धाबर्डे, संदेश थुल, सलमान रंगरेज, नरेंद्र चुंबडे, नरेंद्र पांढरे, राजू अरगले, मेंढे, अजय देवढे, भारत पवार व पदाधिकारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)