शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पाझर तलावाला दुरुस्तीचे वेध

By admin | Updated: May 16, 2016 02:18 IST

वनविभागाच्या आकोली बिटामध्ये निर्मित पाझर तलावाची गत कित्येक वर्षांत देखभाल दुरूस्ती न केल्याने तलावात गाळ साचला आहे.

खात्याखोरी परिसर : भिंतीची दुरुस्ती व खोलीकरण गरजेचेआकोली : वनविभागाच्या आकोली बिटामध्ये निर्मित पाझर तलावाची गत कित्येक वर्षांत देखभाल दुरूस्ती न केल्याने तलावात गाळ साचला आहे. एका बाजूने भिंतीला मोठे भगदाड पडल्यामुळे तलावात पाणी संचय होत नाही. यामुळे गुरे, वन्यप्राणी, पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. खात्याखोरी परिसरातील जंगलात तीनही बाजूने टेकड्या असलेल्या ठिकाणी वनविभागाने पाझर तलावाची निर्मिती केली. त्याला आता कित्येक वर्षे लोटली. जंगलात चरायला येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील गुरांची तहान भागावी, जंगलातील वन्यप्राणी व पक्ष्यांची तृष्णा तृप्ती होऊन झिरपलेल्या पाण्यामुळे झाडे हिरविगार दिसावी, हा हेतू पूढे ठेवून पाझर तलाव बांधण्यात आला; पण गत कित्येक वर्षांपासून सदर तलावाकडे वन व कृषी विभागाचे दुर्लक्ष झाले. परिणामी, तलावात मोठमोठी काटेरी झुडपे वाढली. गाळ साचला. यामुळे तलाव उथळ झाला. सदर तलावाच्या भिंतीच्या एका बाजूने अतिरिक्त पाणी वाहून जाण्याकरिता नाली काढण्यात आली होती; पण आता नालीचे रूपांतर नाल्यात झाले असून मोठे भगदाड पडले. पावसाचे पाणी तलावात साचण्याऐवजी वाहून जाते. तलावात साठा होत नाही. पूर्वी एप्रिल, मे च्या शेवटपर्यंत तलावाला पाणी राहत होते. यामुळे गुरांसह वन्यप्राण्यांची तृष्णातृप्ती होत होती; पण आता पावसाळा संपताच तलाव कोरडा होतो. यामुळे जंगली श्वापदांना शेत शिवारात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. राज्यभर जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे; पण प्रशासनाला या पाझर तलावाचा विसर पडला आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)दुरुस्ती केल्यास प्राप्त होईल गतवैभवसदर पाझर जंगलाच्या त्रिकोणात असून पावसाळ्यात येथील दृश्य मनमोहक असते. हिवाळ्यात परिसरातील दोन-तीन गावच्या गोधणाचा मुक्काम येथेच असतो. त्यामुळे आणखीच खुलून दिसतो. वनविभागाने पाझर तलावाची दुरुस्ती केल्यास परिसराला गतवैभव प्राप्त होऊ शकते; पण अद्याप कुणाचेही याकडे लक्ष नसल्याचेच दिसून येत आहे. पाझर तलाव गाळाने बुजल्याने आकोली बिटातील वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधात शेत शिवारासह गावांकडे यावे लागते. यात शेतकरी व त्यांच्या गुरांना धोका होता. वन व कृषी विभागाने जलयुक्त शिवार अभियानात या तलावाचे खोलीकरण करीत पुनरूज्जीवन करणे गरजेचे आहे.