शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

‘त्या’ पाझर तलावाला दुरुस्तीचे वेध

By admin | Updated: May 16, 2016 02:18 IST

वनविभागाच्या आकोली बिटामध्ये निर्मित पाझर तलावाची गत कित्येक वर्षांत देखभाल दुरूस्ती न केल्याने तलावात गाळ साचला आहे.

खात्याखोरी परिसर : भिंतीची दुरुस्ती व खोलीकरण गरजेचेआकोली : वनविभागाच्या आकोली बिटामध्ये निर्मित पाझर तलावाची गत कित्येक वर्षांत देखभाल दुरूस्ती न केल्याने तलावात गाळ साचला आहे. एका बाजूने भिंतीला मोठे भगदाड पडल्यामुळे तलावात पाणी संचय होत नाही. यामुळे गुरे, वन्यप्राणी, पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. खात्याखोरी परिसरातील जंगलात तीनही बाजूने टेकड्या असलेल्या ठिकाणी वनविभागाने पाझर तलावाची निर्मिती केली. त्याला आता कित्येक वर्षे लोटली. जंगलात चरायला येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील गुरांची तहान भागावी, जंगलातील वन्यप्राणी व पक्ष्यांची तृष्णा तृप्ती होऊन झिरपलेल्या पाण्यामुळे झाडे हिरविगार दिसावी, हा हेतू पूढे ठेवून पाझर तलाव बांधण्यात आला; पण गत कित्येक वर्षांपासून सदर तलावाकडे वन व कृषी विभागाचे दुर्लक्ष झाले. परिणामी, तलावात मोठमोठी काटेरी झुडपे वाढली. गाळ साचला. यामुळे तलाव उथळ झाला. सदर तलावाच्या भिंतीच्या एका बाजूने अतिरिक्त पाणी वाहून जाण्याकरिता नाली काढण्यात आली होती; पण आता नालीचे रूपांतर नाल्यात झाले असून मोठे भगदाड पडले. पावसाचे पाणी तलावात साचण्याऐवजी वाहून जाते. तलावात साठा होत नाही. पूर्वी एप्रिल, मे च्या शेवटपर्यंत तलावाला पाणी राहत होते. यामुळे गुरांसह वन्यप्राण्यांची तृष्णातृप्ती होत होती; पण आता पावसाळा संपताच तलाव कोरडा होतो. यामुळे जंगली श्वापदांना शेत शिवारात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. राज्यभर जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे; पण प्रशासनाला या पाझर तलावाचा विसर पडला आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)दुरुस्ती केल्यास प्राप्त होईल गतवैभवसदर पाझर जंगलाच्या त्रिकोणात असून पावसाळ्यात येथील दृश्य मनमोहक असते. हिवाळ्यात परिसरातील दोन-तीन गावच्या गोधणाचा मुक्काम येथेच असतो. त्यामुळे आणखीच खुलून दिसतो. वनविभागाने पाझर तलावाची दुरुस्ती केल्यास परिसराला गतवैभव प्राप्त होऊ शकते; पण अद्याप कुणाचेही याकडे लक्ष नसल्याचेच दिसून येत आहे. पाझर तलाव गाळाने बुजल्याने आकोली बिटातील वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधात शेत शिवारासह गावांकडे यावे लागते. यात शेतकरी व त्यांच्या गुरांना धोका होता. वन व कृषी विभागाने जलयुक्त शिवार अभियानात या तलावाचे खोलीकरण करीत पुनरूज्जीवन करणे गरजेचे आहे.