शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

पुलगाव-आर्वी-वरूड-आमला रेल्वे मिशनकरिता जनआंदोलन

By admin | Updated: August 10, 2016 00:33 IST

पुलगावपासून आर्वीपर्यंत ३५ कि़मी. नॅरोगेज रेल्वे असून आर्वी ते वरूड ६० कि.मी. जोडल्यास संपूर्ण परिसरातील....

शहीदभूमीत रणनिती ठरविण्यासाठी पार पडली सभा आष्टी (शहीद): पुलगावपासून आर्वीपर्यंत ३५ कि़मी. नॅरोगेज रेल्वे असून आर्वी ते वरूड ६० कि.मी. जोडल्यास संपूर्ण परिसरातील जवळपास १० लाख जनतेच्या अर्थव्यवस्था व राहणीमानावर चांगला परिणाम होईल. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यास मदत होणार असल्याचे म्हणत पुलगाव-आर्वी-वरूड-आमला १०० कि़मी. रेल्वे मिशन म्हणून येत्या स्वातंत्र्यदिनापासून शहीद भूमीतून हे जनआंदोलन उभारणार असल्याची माहिती येथील शहीद स्मारकात आयोजित सभेत उपस्थित मान्यवरांनी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मीरा येणुरकर, रेल्वे मिशनचे प्रा. प्रशांत सव्वालाखे, डॉ. रिपल राणे, साखरे, बाबाराव डाहाके, नगरपंचायत बांधकाम सभापती जयश्री मोकद्दम यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी अतिथींनी सविस्तर मार्गदर्शन केले. ब्रिटीशांनी १९१६ ला आर्वी परिसरातील कापूस व लोणी इंग्लडच्या मँचेस्टर येथे पाठविण्यासाठी रेल्वे सुरू केली होती. मग ती बंद का करण्यात आली, असा सवालही यावेळी करण्यात आला. यासाठी गावापासून दिल्लीपर्यंत लढा देण्याची गरज व्यक्त केली. भरत वणझारा यांनी भूमिका मांडताना सांगितले की, यवतमाळला माजी खासदार विजय दर्डा यांच्या अथक परिश्रमातून यवतमाळ रेल्वे मार्गाचा प्रश्न सुटला. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव हे रामटेकचे खासदार होते म्हणून नरखेड रेल्वेलाईन झाली. याच धर्तीवर खा. रामदास तडस यांनी या रेल्वे मार्गाकरिता संसदेमध्ये आवाज उठविला आहे. त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी जलआंदोलनात सर्वपक्षीय पुढकाराची गरज आहे. त्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी अशोक विजयकर, कमलाकर निंभोरकर, डॉ. राजेंद्र निखरा यांनी नियोजन संबंधी मार्गदर्शन केले. गौरव जाजू, डॉ. रिपल राणे यांनी पुलगाव-आर्वी-वरूड-आमला रेल्वे जनआंदोलन संविधानिक शांततामय वातावरणात करण्याबाबत भूमिका मांडली. सभेचे आयोजन अ‍ॅड. मनीष ठोंबरे, आवेश खान, निरज भार्गव यांनी केले होते. संचालन सुरेश काळपांडे यांनी केले तर आभार ठोंबरे यांनी मानले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)