शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

पुलगाव-आर्वी-वरूड-आमला रेल्वे मिशनकरिता जनआंदोलन

By admin | Updated: August 10, 2016 00:33 IST

पुलगावपासून आर्वीपर्यंत ३५ कि़मी. नॅरोगेज रेल्वे असून आर्वी ते वरूड ६० कि.मी. जोडल्यास संपूर्ण परिसरातील....

शहीदभूमीत रणनिती ठरविण्यासाठी पार पडली सभा आष्टी (शहीद): पुलगावपासून आर्वीपर्यंत ३५ कि़मी. नॅरोगेज रेल्वे असून आर्वी ते वरूड ६० कि.मी. जोडल्यास संपूर्ण परिसरातील जवळपास १० लाख जनतेच्या अर्थव्यवस्था व राहणीमानावर चांगला परिणाम होईल. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यास मदत होणार असल्याचे म्हणत पुलगाव-आर्वी-वरूड-आमला १०० कि़मी. रेल्वे मिशन म्हणून येत्या स्वातंत्र्यदिनापासून शहीद भूमीतून हे जनआंदोलन उभारणार असल्याची माहिती येथील शहीद स्मारकात आयोजित सभेत उपस्थित मान्यवरांनी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मीरा येणुरकर, रेल्वे मिशनचे प्रा. प्रशांत सव्वालाखे, डॉ. रिपल राणे, साखरे, बाबाराव डाहाके, नगरपंचायत बांधकाम सभापती जयश्री मोकद्दम यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी अतिथींनी सविस्तर मार्गदर्शन केले. ब्रिटीशांनी १९१६ ला आर्वी परिसरातील कापूस व लोणी इंग्लडच्या मँचेस्टर येथे पाठविण्यासाठी रेल्वे सुरू केली होती. मग ती बंद का करण्यात आली, असा सवालही यावेळी करण्यात आला. यासाठी गावापासून दिल्लीपर्यंत लढा देण्याची गरज व्यक्त केली. भरत वणझारा यांनी भूमिका मांडताना सांगितले की, यवतमाळला माजी खासदार विजय दर्डा यांच्या अथक परिश्रमातून यवतमाळ रेल्वे मार्गाचा प्रश्न सुटला. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव हे रामटेकचे खासदार होते म्हणून नरखेड रेल्वेलाईन झाली. याच धर्तीवर खा. रामदास तडस यांनी या रेल्वे मार्गाकरिता संसदेमध्ये आवाज उठविला आहे. त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी जलआंदोलनात सर्वपक्षीय पुढकाराची गरज आहे. त्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी अशोक विजयकर, कमलाकर निंभोरकर, डॉ. राजेंद्र निखरा यांनी नियोजन संबंधी मार्गदर्शन केले. गौरव जाजू, डॉ. रिपल राणे यांनी पुलगाव-आर्वी-वरूड-आमला रेल्वे जनआंदोलन संविधानिक शांततामय वातावरणात करण्याबाबत भूमिका मांडली. सभेचे आयोजन अ‍ॅड. मनीष ठोंबरे, आवेश खान, निरज भार्गव यांनी केले होते. संचालन सुरेश काळपांडे यांनी केले तर आभार ठोंबरे यांनी मानले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)