शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित वाहतुकीसाठी दंडाचा दणका

By admin | Updated: August 19, 2016 02:07 IST

कायदा असतानाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण कमी नाही. त्यावर आळा बसविण्याकरिता

रूपेश खैरी वर्धा कायदा असतानाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण कमी नाही. त्यावर आळा बसविण्याकरिता शासनाकडून वाहतूक नियमात काही बदल करून त्यात होणाऱ्या दंडात मोठी वाढ केली आहे. वाढीव दंडाची घोषणा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यास वेळ लागतो, असे म्हणत असतानाच वाढीव दंडाचा हा नियम सर्वत्र तात्काळ अंमलात आणण्याच्या सूचना धडकल्या. १६ आॅगस्टपासून सर्वत्र नवे नियम लागू झाले आहेत. नव्या नियमांमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. वाहनावर असलेल्या क्रमांकातून काही विशेष शब्द तयार करून नियमाचे उल्लंघण करणाऱ्यांवर वाहतूक नियमाच्या कलम २३५ (२) अन्वये कारवाई करून शंभर रुपयांचा दंड देण्यात येत होता. यामुळे अनेकजण या कलमाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले. यात एकाच वाहनावर अनेकवेळा कार्यवाही करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्यावतीने सांगण्यात आले. अशा कारवाईवरही त्याच्यावर या वाहन चालकावर कुठलाही परिणाम पडला नसल्याचे दिसून आले. आता दंडाची रक्कम वाढल्यास त्याचा काही परिणाम होईल का, याकडे लक्ष लागले आहे. या व्यतिरिक्त वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्याला पहिले १०० रुपये दंड होता त्यात वाढ होवून तो आता २०० रुपये झाला तर ट्रिपल सिट जाणाऱ्यांना आतापर्यंत १०० रुपये दंड होता तो वाढवून २०० रुपये करण्यात आला आहे. तर रस्त्याने शर्यत लावून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना आता ३०० ऐवजी २००० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. या व्यरिरिक्त वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर दुप्पट दंडाची कार्यवाही करण्यात येणार आहे.