शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

सुरक्षित वाहतुकीसाठी दंडाचा दणका

By admin | Updated: August 19, 2016 02:07 IST

कायदा असतानाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण कमी नाही. त्यावर आळा बसविण्याकरिता

रूपेश खैरी वर्धा कायदा असतानाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण कमी नाही. त्यावर आळा बसविण्याकरिता शासनाकडून वाहतूक नियमात काही बदल करून त्यात होणाऱ्या दंडात मोठी वाढ केली आहे. वाढीव दंडाची घोषणा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यास वेळ लागतो, असे म्हणत असतानाच वाढीव दंडाचा हा नियम सर्वत्र तात्काळ अंमलात आणण्याच्या सूचना धडकल्या. १६ आॅगस्टपासून सर्वत्र नवे नियम लागू झाले आहेत. नव्या नियमांमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. वाहनावर असलेल्या क्रमांकातून काही विशेष शब्द तयार करून नियमाचे उल्लंघण करणाऱ्यांवर वाहतूक नियमाच्या कलम २३५ (२) अन्वये कारवाई करून शंभर रुपयांचा दंड देण्यात येत होता. यामुळे अनेकजण या कलमाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले. यात एकाच वाहनावर अनेकवेळा कार्यवाही करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्यावतीने सांगण्यात आले. अशा कारवाईवरही त्याच्यावर या वाहन चालकावर कुठलाही परिणाम पडला नसल्याचे दिसून आले. आता दंडाची रक्कम वाढल्यास त्याचा काही परिणाम होईल का, याकडे लक्ष लागले आहे. या व्यतिरिक्त वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्याला पहिले १०० रुपये दंड होता त्यात वाढ होवून तो आता २०० रुपये झाला तर ट्रिपल सिट जाणाऱ्यांना आतापर्यंत १०० रुपये दंड होता तो वाढवून २०० रुपये करण्यात आला आहे. तर रस्त्याने शर्यत लावून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना आता ३०० ऐवजी २००० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. या व्यरिरिक्त वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर दुप्पट दंडाची कार्यवाही करण्यात येणार आहे.