शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

रस्त्यावर कांदे विक्रेत्यांना नियम डावलून दंड

By admin | Updated: May 24, 2017 00:45 IST

शहरात रस्त्यावर जागा मिळेल तिथे कांदे विकणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत. यात कोण व्यापारी व कोण शेतकरी

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रताप : गवगवा होताच दंडाची रक्कम केली परत लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरात रस्त्यावर जागा मिळेल तिथे कांदे विकणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत. यात कोण व्यापारी व कोण शेतकरी हा मुद्दा गौण असला तरी यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याची ओरड झाली. यामुळे बाजार समितीच्या एका कर्मचाऱ्याने कुठलीही चौकशी न करता नियमांना डावलून रस्त्यावर कांदे विकणाऱ्यांना थेट दंड ठोठावला. या प्रकरणाचा गवगवा होताच बाजार समितीच्यावतीने झालेल्या प्रकारावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करीत दंड केलेल्यांना त्यांची रक्कम परत केली. वर्धा शहरातच नाही तर जिल्ह्यातील इतर भागातही रस्त्यावर गाडी उभी करून कांदे विकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हे विक्रेते शेतकरी आहेत अथवा व्यापारी याची कुठलीही शहानाशी होत नाही. त्यांच्याकडून अत्यल्प दरात कांदा मिळत असल्याने नागरिकांकडून त्याची खरेदी होत आहे. याचा त्रास बाजार समितीतील काही व्यापाऱ्यांना झाल्याने त्यांनी बाजार समितीत जात ओरड केली. यावर कुठलीही चौकशी न करता एका कर्मचाऱ्याने थेट कांदा विक्रीचे ठिकाण गाठत विक्री करणाऱ्यांना दंडा ठोठावला. याची माहिती बाजार समितीच्या सचिवांना कळताच त्यांनी हा प्रकार नियमाला डावलून असल्याचे म्हणताच सदर कर्मचारी बाजार समितीत परत आला. त्याने दंड ठोठावलेल्या कांदा विक्रेत्यांकडून घेतलेली रक्कम त्यांना परत केली. आतापर्यंत दोन विक्रेते दंडाची रक्कम परत घेवून गेल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली आहे. दंडाची रक्कम परत करण्यात आली असली तरी झालेला प्रकार हा चिंताजनकच असल्याची ओरड होत आहे. याकडे बाजार समितीच्या सभापतींनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. दोघांना केली रक्कम परत बाजार समितीच्या कर्मचाऱ्याकडून केलेल्या दंडाची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. यानुसार दोघांनी बाजार समितीशी संपर्क साधात दंडाची रक्कम परत घेतली. या दोघांकडे सातबारा आणि पेरीपत्रक असल्याने ते शेतकरी असल्याचे समोर आहे. शेतकऱ्यांकडून त्याचे उत्पादन त्याच्या मर्जीच्या दराने विकल्या जात असल्याने व्यापाऱ्यांत चांगलीच खळबळ माजल्याचे दिसून येत आहे. यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. झालेला प्रकार कानावर आला. प्रारंभी याची कल्पना असती तर वेळीच यावर प्रतिबंध लावण्यात आला असता. मात्र प्रकार घडल्यावर माहिती मिळाल्याने दंड म्हणून वसूल केलेली रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. दंडासंबंधीची माहिती सचिवांना अधिक आहे. - श्याम कार्लेकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा नियमानुसार बाजारात कुठेही भाजी विक्री करणाऱ्यांना दंड करण्याचा अधिकार बाजार समितीला नाही. मात्र कर्मचाऱ्यांच्या हातून ही चूक घडली. विक्री करणारा शेतकरी अथवा व्यापारी याचा निर्णय उपनिबंधक कार्यालय ठरवेल. येथे घडलेल्या चुकीअंती केलेला दंड परत देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत दोघांनी बाजार समितीतून रक्कम परत नेली आहे. - समीर पेंडके, सचिव, कृउबा समिती वर्धा