शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कांदे विक्रेत्यांना नियम डावलून दंड

By admin | Updated: May 24, 2017 00:45 IST

शहरात रस्त्यावर जागा मिळेल तिथे कांदे विकणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत. यात कोण व्यापारी व कोण शेतकरी

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रताप : गवगवा होताच दंडाची रक्कम केली परत लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरात रस्त्यावर जागा मिळेल तिथे कांदे विकणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत. यात कोण व्यापारी व कोण शेतकरी हा मुद्दा गौण असला तरी यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याची ओरड झाली. यामुळे बाजार समितीच्या एका कर्मचाऱ्याने कुठलीही चौकशी न करता नियमांना डावलून रस्त्यावर कांदे विकणाऱ्यांना थेट दंड ठोठावला. या प्रकरणाचा गवगवा होताच बाजार समितीच्यावतीने झालेल्या प्रकारावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करीत दंड केलेल्यांना त्यांची रक्कम परत केली. वर्धा शहरातच नाही तर जिल्ह्यातील इतर भागातही रस्त्यावर गाडी उभी करून कांदे विकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हे विक्रेते शेतकरी आहेत अथवा व्यापारी याची कुठलीही शहानाशी होत नाही. त्यांच्याकडून अत्यल्प दरात कांदा मिळत असल्याने नागरिकांकडून त्याची खरेदी होत आहे. याचा त्रास बाजार समितीतील काही व्यापाऱ्यांना झाल्याने त्यांनी बाजार समितीत जात ओरड केली. यावर कुठलीही चौकशी न करता एका कर्मचाऱ्याने थेट कांदा विक्रीचे ठिकाण गाठत विक्री करणाऱ्यांना दंडा ठोठावला. याची माहिती बाजार समितीच्या सचिवांना कळताच त्यांनी हा प्रकार नियमाला डावलून असल्याचे म्हणताच सदर कर्मचारी बाजार समितीत परत आला. त्याने दंड ठोठावलेल्या कांदा विक्रेत्यांकडून घेतलेली रक्कम त्यांना परत केली. आतापर्यंत दोन विक्रेते दंडाची रक्कम परत घेवून गेल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली आहे. दंडाची रक्कम परत करण्यात आली असली तरी झालेला प्रकार हा चिंताजनकच असल्याची ओरड होत आहे. याकडे बाजार समितीच्या सभापतींनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. दोघांना केली रक्कम परत बाजार समितीच्या कर्मचाऱ्याकडून केलेल्या दंडाची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. यानुसार दोघांनी बाजार समितीशी संपर्क साधात दंडाची रक्कम परत घेतली. या दोघांकडे सातबारा आणि पेरीपत्रक असल्याने ते शेतकरी असल्याचे समोर आहे. शेतकऱ्यांकडून त्याचे उत्पादन त्याच्या मर्जीच्या दराने विकल्या जात असल्याने व्यापाऱ्यांत चांगलीच खळबळ माजल्याचे दिसून येत आहे. यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. झालेला प्रकार कानावर आला. प्रारंभी याची कल्पना असती तर वेळीच यावर प्रतिबंध लावण्यात आला असता. मात्र प्रकार घडल्यावर माहिती मिळाल्याने दंड म्हणून वसूल केलेली रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. दंडासंबंधीची माहिती सचिवांना अधिक आहे. - श्याम कार्लेकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा नियमानुसार बाजारात कुठेही भाजी विक्री करणाऱ्यांना दंड करण्याचा अधिकार बाजार समितीला नाही. मात्र कर्मचाऱ्यांच्या हातून ही चूक घडली. विक्री करणारा शेतकरी अथवा व्यापारी याचा निर्णय उपनिबंधक कार्यालय ठरवेल. येथे घडलेल्या चुकीअंती केलेला दंड परत देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत दोघांनी बाजार समितीतून रक्कम परत नेली आहे. - समीर पेंडके, सचिव, कृउबा समिती वर्धा