शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

पुलावरील पादचारी मार्ग धोक्याचा

By admin | Updated: February 16, 2017 01:24 IST

शहरातून सेवाग्रामकडे जाणाऱ्या मार्गावर इंदिरा गांधी रेल्वे उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात आली आहे;

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : इंदिरा गांधी उड्डाणपूल दुरवस्थेत, अपघाताचा धोका वर्धा : शहरातून सेवाग्रामकडे जाणाऱ्या मार्गावर इंदिरा गांधी रेल्वे उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात आली आहे; पण त्याच्या देखभाल, दुरूस्ती, डागडुजीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेच पाहावयास मिळत आहे. या पुलावरील रस्त्याची दुरूस्ती केली जाते; पण पदचारी मार्गाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचेच पाहावयास मिळते. परिणामी, पादचारी मार्ग धोक्याचा ठरू लागला आहे. या मार्गाला अनेक ठिकाणी खड्डे पडले असून सिमेंटच्या पाट्याच बेपत्ता झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे. वर्धा ते सेवाग्राम मार्गावर असलेल्या इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपूल गत काही दिवसांपासून दुरवस्थेत आहे. या पुलावर नागरिकांना पायी चालता यावे म्हणून पादचारी मार्ग तयार करण्यात आलेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या या पादचारी मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सिमेंटच्या पाट्यांचा आधार घेऊन सदर पादचारी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे; पण यातील बहुतांश ठिकाणच्या पाट्याच बेपत्ता झाल्या आहेत. परिणामी, खड्ड्यांतून मार्ग काढताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी खड्डे तर कुठे सिमेंटच्या पाट्या व्यवस्थित असल्याचे दिसते. काही ठिकाणी सिमेंटच्या पाट्या तुटलेल्या अवस्थेत आढळून येतात. पायी चालत असताना या रस्त्यात पाय फसून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय खाद्य निगमकडे उतरणाऱ्या पुलावरील पादचारी मार्गाची तर अत्यंत दुरवस्था झाली आहे. शिवाय रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. पादचारी मार्गावर खड्डे पडले असून नागरिकांना व्यवस्थित पायी चालता येत नसल्याने दुखापत होत असल्याचे सांगितले जाते. रस्त्यावरही खड्डे पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पहाटे परिसरातील अनेक नागरिक पुलावर फेरफटका मारण्याकरिता जातात. काळोखात खड्डे दिसत नसल्याने त्यांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसते. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी) पहाटे व रात्री पायी चालणाऱ्यांना होते दुखापत शरीर स्वास्थ उत्तम राखण्यासाठी पायी चालणे हा सर्वोत्तम उपाय आहे. सध्याच्या जीवनशैलीत डॉक्टरांकडून जेवढे शक्य आहे, तेवढे पायी चालण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे बहुतांश नागरिक पहाटे आणि रात्री पायी चालून आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न करतात. शुद्ध हवेसाठी बरेच नागरिक उड्डाण पुलावरून पायी चालतात. यासाठी पुलावर पादचारी मार्गही आहे; पण या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्याने अनेकांना अपघातांनाच सामोरे जावे लागत असल्याचे दिसते. पहाटे व रात्री काळोखामुळे कुठे खड्डा आहे, कुठे सिमेंटच्या पाट्या नाहीत, हे दृष्टीस पडत नाही. परिणामी, पाय खड्ड्यात फसून दुखापत ओढवून घ्यावी लागते. याबाबत अनेक नागरिकांनी बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्यात; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसून येत आहे. या पादचारी मार्गाची दुरूस्ती करावी व रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी होत आहे.