शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची

By admin | Updated: July 3, 2015 02:34 IST

खरीप हंगामात शासनाकडून जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात येते. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची

वर्धा : खरीप हंगामात शासनाकडून जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात येते. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असल्याने या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे यांनी केले आहे.जिल्ह्यात खरीपात ज्वारी, सोयाबीन, तूर व कापूस पिकांकरिता संपूर्ण तालुके तर खरीपातील भुईमुग पिकांकरिता आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्याची निवड केली आहे. यासह भूईमूग, मूग, उडीद व तीळ पिके आर्वी तालुक्याकरिता व ऊस पूर्व हंगामी व ऊस खोडवा पिकांकरिता आर्वी, वर्धा, सेलू, देवळी व ऊस सुरूकरिता आर्वी, वर्धा सेलू व समुद्रपूर चार तालुक्यांची निवड करण्यात आलेली आहे.पीक विमा योजनेसाठी वर्धा जिल्ह्याच्या विमा हप्ता दरात अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना ५० टक्के सर्व पिके व कापूस पिकांसाठी अल्प, अत्यल्प शेतकरी ७५ टक्के व इतर शेतकरी यांना ५० टक्के विशेष सूट देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अधिसूचित तालुका पीक व अधिसूचित मंडळे याची यादी संबंधित तालुका अधिकारी कार्यालयात उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख पेरणीपासून एक महिना किंवा ३१ जुलै २०१५ यापैकी जी आधी असेल त्या तारखेच्या आत सहभागी व्हायचे आहे. पूर्व हंगामी ऊस पिकांसाठी लागणीपासून एक महिना किंवा ३१ डिसेंबर २०१५ तसेच ऊस खोडवाकरिता ३१ मे २०१६ व सुरू ऊसाकरिता ३१ मार्च २०१६ पर्यंत सहभागी व्हायचे आहे. चक्रीवादळ, पूर, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येईल. यासाठी स्थानिक आपत्तीमुळे योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतलेला आहे त्या संबंधित वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतलेला आहे. त्या संबंधित वित्तीय संस्थेस नुकसान झाल्यापासून ४८ तासांत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती नुकसानीचे कारण व प्रमाण परिस्थितीत नुकसान अधिसूचित पिकाची माहिती नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीने जिल्हा महसूल कार्यलयाच्य मदतीने नुकसान भरपाई निश्चित करण्यात येणार आहे.(स्थानिक प्रतिनिधी)