शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

चुकाऱ्याच्या धनादेशातून पीक कर्जाची कपात

By admin | Updated: January 5, 2017 00:32 IST

कॅशलेस व्यवहार करण्यावर शासनाचा भर आहे. त्याकरिता विविध कार्यशाळाही आयोजित करण्यात येत आहे.

बँकेच्या भीतीपोटी शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच वर्धा : कॅशलेस व्यवहार करण्यावर शासनाचा भर आहे. त्याकरिता विविध कार्यशाळाही आयोजित करण्यात येत आहे. याच कॅशलेसच्या धरतीवर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे धनादेश आणि आरटीजीएस पद्धतीने देणे सुरू केले. शेतकऱ्यांकडून हे धनादेश बँकेत असलेल्या बचत खात्यात जमा होत असतानाच यातून त्यांच्या पीक कर्जाचे हप्ते कपात करण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी करताना दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांत भीती निर्माण झाल्याने शेतमाल घरीच असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. नोटबंदीचा निर्णय झाला त्या काळापासूनच सर्वत्र कॅशलेस व्यवहार सुरू झाला आहे. यात सारेच व्यवहार आॅनलाईन करण्यावर भर देण्यात आला. नोटबंदी जाहीर झाली तो काळ आणि पांढऱ्या सोन्याचा उत्पादक असलेल्या या भागातील शेतकऱ्यांचे उत्पादन निघण्याची वेळ एकच आली. यामुळे बाजारात असलेल्या व्यापाऱ्यांनी त्यांचे व्यवहार धनादेश किंवा आरटीजीएस पद्धतीने करणे सुरू केले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे चुकारे धनादेशाने मिळू लागले. ते धनादेश बँकेत त्यांच्या खात्यात जमा होताच बँक प्रशासनाने शेतकऱ्याकडे असलेल्या पीक कर्जाचे हप्ते कपात करण्याचा सपाटा सुरू केला. साधारणत: शेतमाल विकून पहिले हातउधारी फेडण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो; मात्र बँकेकडून झालेल्या या निर्णयामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. याची ओरड शेतकऱ्यांकडून होत असून याकडे बँक व्यवस्थापकाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. असे असताना बँक व्यवस्थापकांकडून केवळ चौकशी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात येत असून त्यांची लूट सुरूच आहे. जिल्ह्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या लुटीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी) शेतमाल विकूनही हात रिकामेच शेतकऱ्यांनी बाजारात आणून त्याचा शेतमाल विकला. शेतमाल विकल्यानंतर त्याच्या हाती रक्कम येईल, असे वाटले होते; मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला. शेतमालाचा चुकारे धनादेशाच्या रूपाने मिळाले. ती रक्कम बँकेत जमा झाली आणि ती तिकडूनच गायब झाली. यामुळे शेतमाल विकूनही शेतकऱ्यांचे हात रिकामेच राहिल्याचा प्रकार त्याच्यासोबत घडल्याचे चित्र आहे. बँकांकडून होत असलेल्या कपातीच्या भीतीपोटी अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे उत्पादन बाजारात आणावे अथवा नाही, या विवंचनेत सापडले आहे. यामुळे त्यांचा शेतमाल त्यांच्याच घरी पडून असल्याचे चित्र आहे. सेलगाव (लवणे) येथील शेतकऱ्याचे कापले १६ हजार रुपये सेलगाव (लवणे) येथील शेतकरी मनोहर घागरे यांनी त्यांचा शेतमाल विकून चुकाऱ्याचा धनादेश बँकेत जमा केला. १५ दिवसांनी ते धनादेश वठला असेल, जमा झालेल्या रक्कमेची उचल करावी म्हणून ठाणेगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत गेले. येथे गेल्यावर त्यांच्या खात्यातील तब्बल १६ हजार रुपये बँकेने कापल्याचे समोर आले. यामुळे आता त्यांच्या खात्यात काहीच रक्कम नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. या प्रकरणासंदर्भात त्यांनी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता चौकशी करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्यावर अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे.