शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

वर्धा जिल्ह्यात शांततेत मतदान, एका गावाचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 11:14 IST

Wardha News वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीकरिता मतदान प्रक्रिया पार पडली.

ठळक मुद्दे कारंजा तालुक्यातील खैरेवासीयांनी प्रशासनाप्रति रोष व्यक्त करुन मतदानाचा हक्क न बजावता दिवसभर अन्नत्याग केला. पुनर्वसित असलेल्या या गावात वीस वर्षांपासून कोणत्याही सुविधा नसल्याने गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. कारंजा येथील तहसीलदार सचिन कुमा

३.३० वाजतापर्यंत ६१.१३ टक्के मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा: जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीकरिता मतदान प्रक्रिया पार पडली. कोरोनाच्या उपाययोजना राबवून मतदारांना यावर्षी मास्क लावूनच मतदानाचा हक्क बजवावा लागला. वर्धा, सेलू, देवळी या तालुक्यातील प्रत्येकी तीन, आर्वी तालुक्यातील सात, आष्टी तालुक्यातील चार, कारंजा तालुक्यातील ८, हिंगणघाट तालुक्यातील ५ तर समुद्रपूर तालुक्यातील १७ अशा एकूण ५० ग्रामपंचायतीमधील १७३ प्रभागातील ४७२ सदस्यांकरिता एकूण १ हजार २७९ उमेदवार रिंगणात आहे. या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ५७ हजार १०९ महिला तर ६० हजार ८५७ पुरुष असे एकूण १ लाख १७ हजार ९६६ मतदारांकरिता २०६ मतदान केंद्रावरुन मतदान घेण्यात आले. दुपारी ३.३० वाजतापर्यंत ६१.१३ टक्के मतदान पार पडले. शेवटची टक्केवारी उपलब्ध व्हायला विलंब झाला. पण, ही टक्केवारी ७० टक्केपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्याम.पंत) येथे मतदार यादीतील घोळामध्ये नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. तसेच कारंजा तालुक्यातील खैरेवासीयांनी प्रशासनाप्रति रोष व्यक्त करुन मतदानाचा हक्क न बजावता दिवसभर अन्नत्याग केला. पुनर्वसित असलेल्या या गावात वीस वर्षांपासून कोणत्याही सुविधा नसल्याने गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. कारंजा येथील तहसीलदार सचिन कुमावत यांनी नागरिकांना समाजाविण्याचा प्रयत्न केला तरीही नागरिक आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

 

टॅग्स :Electionनिवडणूक