शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

वर्धा जिल्ह्यात शांततेत मतदान, एका गावाचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 11:14 IST

Wardha News वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीकरिता मतदान प्रक्रिया पार पडली.

ठळक मुद्दे कारंजा तालुक्यातील खैरेवासीयांनी प्रशासनाप्रति रोष व्यक्त करुन मतदानाचा हक्क न बजावता दिवसभर अन्नत्याग केला. पुनर्वसित असलेल्या या गावात वीस वर्षांपासून कोणत्याही सुविधा नसल्याने गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. कारंजा येथील तहसीलदार सचिन कुमा

३.३० वाजतापर्यंत ६१.१३ टक्के मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा: जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीकरिता मतदान प्रक्रिया पार पडली. कोरोनाच्या उपाययोजना राबवून मतदारांना यावर्षी मास्क लावूनच मतदानाचा हक्क बजवावा लागला. वर्धा, सेलू, देवळी या तालुक्यातील प्रत्येकी तीन, आर्वी तालुक्यातील सात, आष्टी तालुक्यातील चार, कारंजा तालुक्यातील ८, हिंगणघाट तालुक्यातील ५ तर समुद्रपूर तालुक्यातील १७ अशा एकूण ५० ग्रामपंचायतीमधील १७३ प्रभागातील ४७२ सदस्यांकरिता एकूण १ हजार २७९ उमेदवार रिंगणात आहे. या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ५७ हजार १०९ महिला तर ६० हजार ८५७ पुरुष असे एकूण १ लाख १७ हजार ९६६ मतदारांकरिता २०६ मतदान केंद्रावरुन मतदान घेण्यात आले. दुपारी ३.३० वाजतापर्यंत ६१.१३ टक्के मतदान पार पडले. शेवटची टक्केवारी उपलब्ध व्हायला विलंब झाला. पण, ही टक्केवारी ७० टक्केपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्याम.पंत) येथे मतदार यादीतील घोळामध्ये नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. तसेच कारंजा तालुक्यातील खैरेवासीयांनी प्रशासनाप्रति रोष व्यक्त करुन मतदानाचा हक्क न बजावता दिवसभर अन्नत्याग केला. पुनर्वसित असलेल्या या गावात वीस वर्षांपासून कोणत्याही सुविधा नसल्याने गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. कारंजा येथील तहसीलदार सचिन कुमावत यांनी नागरिकांना समाजाविण्याचा प्रयत्न केला तरीही नागरिक आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

 

टॅग्स :Electionनिवडणूक