शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

वर्धा जिल्ह्यात शांततेत मतदान, एका गावाचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 11:14 IST

Wardha News वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीकरिता मतदान प्रक्रिया पार पडली.

ठळक मुद्दे कारंजा तालुक्यातील खैरेवासीयांनी प्रशासनाप्रति रोष व्यक्त करुन मतदानाचा हक्क न बजावता दिवसभर अन्नत्याग केला. पुनर्वसित असलेल्या या गावात वीस वर्षांपासून कोणत्याही सुविधा नसल्याने गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. कारंजा येथील तहसीलदार सचिन कुमा

३.३० वाजतापर्यंत ६१.१३ टक्के मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा: जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीकरिता मतदान प्रक्रिया पार पडली. कोरोनाच्या उपाययोजना राबवून मतदारांना यावर्षी मास्क लावूनच मतदानाचा हक्क बजवावा लागला. वर्धा, सेलू, देवळी या तालुक्यातील प्रत्येकी तीन, आर्वी तालुक्यातील सात, आष्टी तालुक्यातील चार, कारंजा तालुक्यातील ८, हिंगणघाट तालुक्यातील ५ तर समुद्रपूर तालुक्यातील १७ अशा एकूण ५० ग्रामपंचायतीमधील १७३ प्रभागातील ४७२ सदस्यांकरिता एकूण १ हजार २७९ उमेदवार रिंगणात आहे. या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ५७ हजार १०९ महिला तर ६० हजार ८५७ पुरुष असे एकूण १ लाख १७ हजार ९६६ मतदारांकरिता २०६ मतदान केंद्रावरुन मतदान घेण्यात आले. दुपारी ३.३० वाजतापर्यंत ६१.१३ टक्के मतदान पार पडले. शेवटची टक्केवारी उपलब्ध व्हायला विलंब झाला. पण, ही टक्केवारी ७० टक्केपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्याम.पंत) येथे मतदार यादीतील घोळामध्ये नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. तसेच कारंजा तालुक्यातील खैरेवासीयांनी प्रशासनाप्रति रोष व्यक्त करुन मतदानाचा हक्क न बजावता दिवसभर अन्नत्याग केला. पुनर्वसित असलेल्या या गावात वीस वर्षांपासून कोणत्याही सुविधा नसल्याने गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. कारंजा येथील तहसीलदार सचिन कुमावत यांनी नागरिकांना समाजाविण्याचा प्रयत्न केला तरीही नागरिक आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

 

टॅग्स :Electionनिवडणूक