शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रिडींग न घेताच दिले जाते ग्राहकांना देयक

By admin | Updated: July 29, 2015 02:04 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका ग्राहकांना वारंवार सोसावा लागतो. मात्र यात कोणतीच सुधारणा केली जात नसल्याच्या

तळेगाव (श्या.पं.) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका ग्राहकांना वारंवार सोसावा लागतो. मात्र यात कोणतीच सुधारणा केली जात नसल्याच्या प्रत्यय तळेगाव येथील शेतकऱ्यांना वारंवार येत आहे. वीज देयक देताना मिटरचे रिडींग न घेता अतिरिक्त देयक ग्राहकांच्या माथी मारण्यात आले आहे. याबाबत ग्राहकांनी महावितरणकडे तक्रार केली आहे.परिसरातील मौजा देवगाव, जुनोना येथील काही शेतकऱ्यांचे मोटारपंप गत चार महिन्यांपासून विद्युत प्रवाह नसल्याने बंद अवस्थेत आहे. तरीही त्यांना विद्युत वितरण विभागाने देयक दिले आहे. तसेच येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात मिटर असूनसुध्दा विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी शेताकडे न जाता परस्पर देयक देऊन मोकळे होतात. त्यामुळे कधी अधिक तर कधी कमी देयक दिले जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मीटर रिडींग न घेता सर्रास सरासरी काढून देयक दिले जात असल्याचा प्रत्यय यापूर्वी अनेकांना आला आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. एकीकडे निसर्गाचा कोप सुरू असल्याने पिकांची अवस्था दयनीय आहे. अशात पिकांना ओलीत करण्याची गरज आहे, मात्र विद्युत पुरवठा केला जात नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना शासनातर्फे रोजगार हमी योजनेतून नवीन विहिरी देण्यात आल्या. यानंतर शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीकडे जोडणीसाठी डिमांड भरला. परंतु अजुनपर्यंत त्यांच्या शेतात विद्युत जोडणी देण्यात आली नाही. यामुळे निसर्गाचा कोप आणि विद्युत वितरणची वक्रदृष्टी या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. या समस्येची संबंधित विभागाने दखल घेण्याची मागणी भाजपा किसान आघाडीचे उपाध्यक्ष अशोक जाधव यांनी तक्रारीतून केली आहे. याबाबत कार्यवाहीकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)