शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

रिडींग न घेताच दिले जाते ग्राहकांना देयक

By admin | Updated: July 29, 2015 02:04 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका ग्राहकांना वारंवार सोसावा लागतो. मात्र यात कोणतीच सुधारणा केली जात नसल्याच्या

तळेगाव (श्या.पं.) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका ग्राहकांना वारंवार सोसावा लागतो. मात्र यात कोणतीच सुधारणा केली जात नसल्याच्या प्रत्यय तळेगाव येथील शेतकऱ्यांना वारंवार येत आहे. वीज देयक देताना मिटरचे रिडींग न घेता अतिरिक्त देयक ग्राहकांच्या माथी मारण्यात आले आहे. याबाबत ग्राहकांनी महावितरणकडे तक्रार केली आहे.परिसरातील मौजा देवगाव, जुनोना येथील काही शेतकऱ्यांचे मोटारपंप गत चार महिन्यांपासून विद्युत प्रवाह नसल्याने बंद अवस्थेत आहे. तरीही त्यांना विद्युत वितरण विभागाने देयक दिले आहे. तसेच येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात मिटर असूनसुध्दा विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी शेताकडे न जाता परस्पर देयक देऊन मोकळे होतात. त्यामुळे कधी अधिक तर कधी कमी देयक दिले जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मीटर रिडींग न घेता सर्रास सरासरी काढून देयक दिले जात असल्याचा प्रत्यय यापूर्वी अनेकांना आला आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. एकीकडे निसर्गाचा कोप सुरू असल्याने पिकांची अवस्था दयनीय आहे. अशात पिकांना ओलीत करण्याची गरज आहे, मात्र विद्युत पुरवठा केला जात नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना शासनातर्फे रोजगार हमी योजनेतून नवीन विहिरी देण्यात आल्या. यानंतर शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीकडे जोडणीसाठी डिमांड भरला. परंतु अजुनपर्यंत त्यांच्या शेतात विद्युत जोडणी देण्यात आली नाही. यामुळे निसर्गाचा कोप आणि विद्युत वितरणची वक्रदृष्टी या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. या समस्येची संबंधित विभागाने दखल घेण्याची मागणी भाजपा किसान आघाडीचे उपाध्यक्ष अशोक जाधव यांनी तक्रारीतून केली आहे. याबाबत कार्यवाहीकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)