शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

चोरीच्या घटनांनी पवनार हादरले

By admin | Updated: January 12, 2015 22:56 IST

गारठा कमालीचा वाढला असल्याने रात्रीच्या वेळी १२ नंतर चिटपाखरूही गावांमध्ये सध्या दिसत नाही. हीच संधी साधून शहरालगत असलेल्या पवनार येथे एकाच रात्री एसबीआयचे

एटीएम व दुकानासह विठ्ठल मंदिरातील दानपेटीही फोडलीवर्धा : गारठा कमालीचा वाढला असल्याने रात्रीच्या वेळी १२ नंतर चिटपाखरूही गावांमध्ये सध्या दिसत नाही. हीच संधी साधून शहरालगत असलेल्या पवनार येथे एकाच रात्री एसबीआयचे एटीएम व दोन दुकाने फोडण्यात आली. याच दिवशी नदीकाठच्या विठ्ठल मंदिरातील दानपेटीही फोडण्यात आली. सकाळी हा प्रकार लक्षात येताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. या तिन्ही घटनांमध्ये जवळपास आठ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला तरी नागरिकांत दहशत पसरली आहे. जिल्ह्यात सर्वत्र थंडीचा कहर सुरू आहे. पवनार हे गाव नदीलगत असल्याने येथे गारठा जास्त अनुभवास मिळतो. त्यामुळे रात्री ८ नंतरच गावामध्ये निरव शांतता सध्या दिसत आहे. याचाच फायदा घेत ग्रामपंचायत जवळ असलेल्या एसबीआयचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. यात त्यांना पूर्णत: यश आले नाही. केवळ डायव्हर्ट बॉक्समध्ये जमा झालेले दोन हजार रुपये चोरट्याने लंपास केले. त्यानंतर चोरट्याने त्यांचा मोर्चा ग्रामपंचायत परिसरातच असलेल्या संकुलातील दुकानाकडे वळविला. यातील प्रशांत चोंदे यांचे दुकान फोडून दुकानातील ५ हजार रुपये रोख चोरले. तसेच काही सामानाची नासधूसही केली. त्यानंतर चोंदे यांच्या दुकानाला लागूनच असलेल्या मनीष हिवरे यांचे दुकान फोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा नदीकाठालगतच्या नंदी खेडा परिसराकडे वळविला. तेथील विठ्ठल मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लंपास केली. याच परिसरातील वरभे यांचा पानठेला फोडून तेथून दहा ते बारा सिगारेटची पाकिटे चोरली. एटीएम चोरीप्रकरणी सुबोध लाभे तर दुकानातील चोरी प्रकरणी चोंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध सेवाग्राम पोलिसांनी भादंविच्या कलम ४५७, ३८०, ५११ कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत. शहरालगत असलेल्या या भागात एकाच रात्री चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.(शहर प्रतिनिधी)