शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

चोरीच्या घटनांनी पवनार हादरले

By admin | Updated: January 12, 2015 22:56 IST

गारठा कमालीचा वाढला असल्याने रात्रीच्या वेळी १२ नंतर चिटपाखरूही गावांमध्ये सध्या दिसत नाही. हीच संधी साधून शहरालगत असलेल्या पवनार येथे एकाच रात्री एसबीआयचे

एटीएम व दुकानासह विठ्ठल मंदिरातील दानपेटीही फोडलीवर्धा : गारठा कमालीचा वाढला असल्याने रात्रीच्या वेळी १२ नंतर चिटपाखरूही गावांमध्ये सध्या दिसत नाही. हीच संधी साधून शहरालगत असलेल्या पवनार येथे एकाच रात्री एसबीआयचे एटीएम व दोन दुकाने फोडण्यात आली. याच दिवशी नदीकाठच्या विठ्ठल मंदिरातील दानपेटीही फोडण्यात आली. सकाळी हा प्रकार लक्षात येताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. या तिन्ही घटनांमध्ये जवळपास आठ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला तरी नागरिकांत दहशत पसरली आहे. जिल्ह्यात सर्वत्र थंडीचा कहर सुरू आहे. पवनार हे गाव नदीलगत असल्याने येथे गारठा जास्त अनुभवास मिळतो. त्यामुळे रात्री ८ नंतरच गावामध्ये निरव शांतता सध्या दिसत आहे. याचाच फायदा घेत ग्रामपंचायत जवळ असलेल्या एसबीआयचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. यात त्यांना पूर्णत: यश आले नाही. केवळ डायव्हर्ट बॉक्समध्ये जमा झालेले दोन हजार रुपये चोरट्याने लंपास केले. त्यानंतर चोरट्याने त्यांचा मोर्चा ग्रामपंचायत परिसरातच असलेल्या संकुलातील दुकानाकडे वळविला. यातील प्रशांत चोंदे यांचे दुकान फोडून दुकानातील ५ हजार रुपये रोख चोरले. तसेच काही सामानाची नासधूसही केली. त्यानंतर चोंदे यांच्या दुकानाला लागूनच असलेल्या मनीष हिवरे यांचे दुकान फोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा नदीकाठालगतच्या नंदी खेडा परिसराकडे वळविला. तेथील विठ्ठल मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लंपास केली. याच परिसरातील वरभे यांचा पानठेला फोडून तेथून दहा ते बारा सिगारेटची पाकिटे चोरली. एटीएम चोरीप्रकरणी सुबोध लाभे तर दुकानातील चोरी प्रकरणी चोंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध सेवाग्राम पोलिसांनी भादंविच्या कलम ४५७, ३८०, ५११ कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत. शहरालगत असलेल्या या भागात एकाच रात्री चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.(शहर प्रतिनिधी)