शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

प्रकल्पाचे काम रखडल्याने रस्त्याची दैना

By admin | Updated: August 13, 2016 00:43 IST

शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेतलेल्या शिरूड प्रकल्पाचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे

शिरुड-इंझाळा रस्ता उखडला : सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल हिंगणघाट : शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेतलेल्या शिरूड प्रकल्पाचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे. प्रकल्पाचे काम पावसाळ्यामुळे बंद असल्याने प्रकल्पाजवळील इंझाळा ते शिरूड या मार्गाची अवस्था या प्रकल्पामुळे अत्यंत दयनीय झाली आहे. हा रस्ता जागोजागी तुटलेला आहे. रस्त्यात मोठेमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे खड्ड्यांत हा रस्ता शोधावा लागत आहेत. एक एक फुट चिखल आणि गाळातून ग्रामस्थांना ये-जा करावी लागत आहे. यासंदर्भात तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिल्या आहेत. परंतु वर्ष लोटूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे शिरूड येथील ग्रामस्थ मोठा संताप व्यक्त करीत आहेत. हिंगणघाट जवळील शिरूड या गावात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे शिरूड लघु पाटबंधारे प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या परिसरातील शिरूड-इंझाळा हा रस्ता प्रकल्पाच्या हद्दीत सापडल्याने दुसरा पर्यायी मार्ग बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पर्यायी मार्गाचे प्राथमिक कार्यही करण्यात आले. परंतु प्रकल्पाच्या अर्धवट कामामुळे हा रस्त्याही अर्धवटच आहे. नवीन मार्गाचे काम सुरू झाल्याने जुना रस्ता दुर्लक्षित झाला. त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले. परंतु नवीन पर्यायी मार्गही मातीचाच असल्याने पावसामुळे त्यावर दोन फुटापर्यंत चिखल साचला आहे. शिरूडवासीयांना इंझाळ्याकडे नेहमीच जावे लागते. अनेकांची शेती सुद्धा याच मार्गावर असल्याने शेतात कसे जावे हा प्रश्न नागरिकांना पडतो. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. यासंबंधीची तक्रार हिंगणघाटच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर शिरूडकडून इंझाळ्याकडे जाताना गावाजवळच नाला ओलांडून जावे लागते. पावसाळ्यात या नाल्याला पाणी असल्याने ये-जा करणे अत्यंत कठीण आणि धोक्याचे झाले आहेत. येथे पूल बांधण्याची मागणीही मागील वर्षीच करण्यात आली. परंतु निद्रिस्त अवस्थेतीत अधिकारी लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांत प्रचंड संताप व्यक्त होतो.(शहर प्रतिनिधी) दोन्ही रस्त्यांमुळे मनस्ताप शिरूड प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने शिरूड-इंझाळा रस्त्याची पूर्णत: दैना झाली. प्रकल्पात हा रस्ता सापडल्याने दुसरा पर्यायी मार्ग बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पर्यायी मार्गाचे प्राथमिक कार्यही करण्यात आले. परंतु प्रकल्पाच्या अर्धवट कामामुळे हा रस्त्याही अर्धवटच आहे. नव्या मार्गाचे काम सुरू झाल्याने जुना रस्ता दुर्लक्षित झाला. त्यावर जागोजागी मोठमोठी खड्डे पडले. परंतु नवीन पर्यायी मार्गही मातीचाच असल्याने पावसामुळे त्यावर दोन फुटापर्यंत चिखल साचला आहे.