शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

रेतीच्या वाहतुकीने महामार्गावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:07 IST

रेती वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे कोल्ही ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंतचा रस्ता उखडला आहे. या मार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे.

ठळक मुद्देनाल्यावरील पुलाची क्षती : कार्यवाहीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर : रेती वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे कोल्ही ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंतचा रस्ता उखडला आहे. या मार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. दिवसाला या रस्त्याने रेतीची वाहतूक करणारे शेकडो वाहने धावतात. रस्त्याची क्षमता तुलनेने कमी असल्याने रस्त्याची दैनावस्था झाली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.या मार्गाने रेतीची वाहतूक करणारे वाहने भरधाव जातात. त्यामुळे अन्य वाहन धारकांना अपघाताचा धोका असतो. महामार्गाने ही वाहतूक होत असताना याकडे संबधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बैलबंडी, दुचाकी असे वाहन या रस्त्याने घेऊन जाताना चालकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. रस्त्याच्या डागडुजीची मागणी होत आहे.अपघाताचा धोकारस्ता अरूंद असल्याने जड वाहतुकीने समस्येत अधिकच भर पडत आहे. कधीतर पादचाऱ्यांना आवागमन करायला जागा नसते. ही बाब अपघाताला निमंत्रण देत आहे. या मार्गाने रेतीची अवैध वाहतूक वाढली आहे. याकडे लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी सय्यद शफात अहमद व ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.खड्ड्यांची स्थिती जैसै थे’सेवाग्राम - हमदापूर ते सेवाग्राम मार्गावरील खड्ड्यांच्या डागडुजीचे काम सुरू आहे. मात्र यात डांबराचा वापर अत्यल्प होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करतात. रस्त्यावरील गिट्टी आताच उखडली आहे. त्यामुळे दुरूस्त केलेले खड्डे जैसे थे असल्याचे दिसते. या प्रकाराने वाहन चालक व प्रवासी संताप व्यक्त करतात. सेवाग्राम-हमदापूर हा मार्ग वर्दळीचा आहे. मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होते. याच मार्गावर पुढे रेतीघाट आहे. त्यामुळे रेतीची वाहतूक नित्य होत असते. परिणामी रस्ता खड्डेमय झाला आहे. मात्र डागडुजी करताना निकृष्ट काम होत असल्याचा प्रकार येथे घडत आहे.वाहन चालक व प्रवाशांना या रस्त्याने जाताना अडचणीचा सामना करावा लागतो. वाहनांच्या दुरूस्तीचा खर्च वाढला आहे. आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. खड्डेमय रस्त्याने प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. या मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम करताना डांबर केवळ शिंपडले जात आहे. गिट्टी भरून प्रेसिंग केली तरी ती अल्पावधीत बाहेर पडत आहे. अंबानगर परिसरातील गिट्टी उखडत आहे. गिट्टी व चुरीमुळे वाहन घसरून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे.