शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

रेतीच्या वाहतुकीने महामार्गावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:07 IST

रेती वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे कोल्ही ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंतचा रस्ता उखडला आहे. या मार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे.

ठळक मुद्देनाल्यावरील पुलाची क्षती : कार्यवाहीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर : रेती वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे कोल्ही ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंतचा रस्ता उखडला आहे. या मार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. दिवसाला या रस्त्याने रेतीची वाहतूक करणारे शेकडो वाहने धावतात. रस्त्याची क्षमता तुलनेने कमी असल्याने रस्त्याची दैनावस्था झाली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.या मार्गाने रेतीची वाहतूक करणारे वाहने भरधाव जातात. त्यामुळे अन्य वाहन धारकांना अपघाताचा धोका असतो. महामार्गाने ही वाहतूक होत असताना याकडे संबधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बैलबंडी, दुचाकी असे वाहन या रस्त्याने घेऊन जाताना चालकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. रस्त्याच्या डागडुजीची मागणी होत आहे.अपघाताचा धोकारस्ता अरूंद असल्याने जड वाहतुकीने समस्येत अधिकच भर पडत आहे. कधीतर पादचाऱ्यांना आवागमन करायला जागा नसते. ही बाब अपघाताला निमंत्रण देत आहे. या मार्गाने रेतीची अवैध वाहतूक वाढली आहे. याकडे लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी सय्यद शफात अहमद व ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.खड्ड्यांची स्थिती जैसै थे’सेवाग्राम - हमदापूर ते सेवाग्राम मार्गावरील खड्ड्यांच्या डागडुजीचे काम सुरू आहे. मात्र यात डांबराचा वापर अत्यल्प होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करतात. रस्त्यावरील गिट्टी आताच उखडली आहे. त्यामुळे दुरूस्त केलेले खड्डे जैसे थे असल्याचे दिसते. या प्रकाराने वाहन चालक व प्रवासी संताप व्यक्त करतात. सेवाग्राम-हमदापूर हा मार्ग वर्दळीचा आहे. मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होते. याच मार्गावर पुढे रेतीघाट आहे. त्यामुळे रेतीची वाहतूक नित्य होत असते. परिणामी रस्ता खड्डेमय झाला आहे. मात्र डागडुजी करताना निकृष्ट काम होत असल्याचा प्रकार येथे घडत आहे.वाहन चालक व प्रवाशांना या रस्त्याने जाताना अडचणीचा सामना करावा लागतो. वाहनांच्या दुरूस्तीचा खर्च वाढला आहे. आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. खड्डेमय रस्त्याने प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. या मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम करताना डांबर केवळ शिंपडले जात आहे. गिट्टी भरून प्रेसिंग केली तरी ती अल्पावधीत बाहेर पडत आहे. अंबानगर परिसरातील गिट्टी उखडत आहे. गिट्टी व चुरीमुळे वाहन घसरून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे.