शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

तूर खरेदीच्या आॅनलाईन नोंदणीला विराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:03 IST

शासकीय तूर खरेदी यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अडचणीचीच ठरली. यात आतापर्यंत झालेल्या तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत. त्याची प्रतीक्षा असतानाच तूर खरेदीच्या आॅनलाईन नोंदणीला बुधवारी विराम देण्याचे शासन आदेश धडकले.

ठळक मुद्देशासनाचे आदेश : शेतकऱ्यांची हमीभावाची आशा मावळली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय तूर खरेदी यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अडचणीचीच ठरली. यात आतापर्यंत झालेल्या तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत. त्याची प्रतीक्षा असतानाच तूर खरेदीच्या आॅनलाईन नोंदणीला बुधवारी विराम देण्याचे शासन आदेश धडकले. परिणामी, शासकीय दरात तूर विकण्याची इच्छा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची आशा मावळली आहे. यातच गोदाम व हमालांच्या समस्येमुळे नोंद झालेली तूर खरेदी होईल वा नाही, याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.अक्षय तृतिया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याचे मानले जाते. या दिवशी अनेकांकडून शुभकार्य होताना दिसते; पण शासनाच्यावतीने या मुहूर्ताला शेतकºयांची तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेत तो अशुभ ठरविल्याची चर्चा आहे. शासनाच्या पत्रानुसार बुधवारपर्यंत तुरीची आॅनलाईन नोंदणी करणाºया शेतकऱ्यांकडूनच तूर खरेदीच्या सूचना आहेत. आॅनलाईन नोंदी करणाऱ्या केंद्रांवर गर्दी झाल्याने बºयाच शेतकºयांनी काही काळ प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला; पण आता ही नोंदणी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने शेतकरी हमी भावापासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत झालेल्या तूर खरेदीत शेतकºयांचे चुकारे अद्याप अडले आहेत. एकट्या वर्धा जिल्ह्यात नाफेड आणि विदर्भ मार्केटींग फेडरेशनच्यावतीने दहा केंद्रांवरून ८० हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. या तूर खरेदीपोटी ३५ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहे. यामुळे शेतकºयांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकºयांकडून नव्या उमेदीने पुन्हा नव्या खरीपाची तयारी सुरू झाली आहे. उन्हाळवाही करीत बी-बियाणे खरेदीकडे तो वळत आहे; पण त्याच्याच उत्पादनाचे चुकारे त्यांना मिळाले नसल्याने त्यांची गोची होत आहे. यामुळे शेतकºयांचे चुकारे तत्काळ देण्याची मागणी होत आहे.गोदामाची समस्या कायमचतूर खरेदी झाली त्या काळापासूनच राज्यात गोदामाची समस्या निर्माण झाली होती. सध्या खरेदी झालेली तूर ठेवण्याकरिता जागा नसल्याने खरेदी बंद करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती आहे. वर्धा जिल्ह्यातील केंद्रांवर खरेदी झालेली तूर बाजार समितीत पडून आहे. यातच पावसाचे संकेत असल्याने ही तूर ओली होण्याची शक्यता आहे.चुकारे करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला आगतूर उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे देण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या कार्यालयाला आग लागली आहे. यामुळे शेतकºयांचे चुकारे अडल्याची माहिती महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशनच्यावतीने सांगण्यात आले आहे.शासकीय तूर खरेदीकरिता आॅनलाईन नोंदी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. ही नोंदणी उद्या बुधवारपासून बंद करण्यात येणार आहे. त्या शेतकऱ्यांनी नोंदी केल्या आहेत त्यांची तूर खरेदी करणार आहे. पण ती ठेवण्याची समस्या समोर असल्याने नवे काय आदेश येतात याकडे लक्ष आहे. यातच आॅनलाईन चुकारे करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला आग लागल्याचे चुकाºयांची प्रतीक्षा कायमच राहणार असल्याचे दिसते.- व्ही.पी. आपदेव, जिल्हा मार्केटींग अधिकारी, वर्धा.