शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

निवडणूक कार्यक्रम कामचुकार कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर

By admin | Updated: October 9, 2014 23:06 IST

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. यात अनेक कामे असतात. या कामाकरिता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. ही नियुक्ती करताना कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना त्रास होणार नाही

वर्धा : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. यात अनेक कामे असतात. या कामाकरिता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. ही नियुक्ती करताना कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना त्रास होणार नाही याकरिता काही कर्मचारी कार्यालयात असतात. वर्धेत मात्र शासकीय कार्यालयात सारेच कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. साऱ्याच विभागात शुकशुकाट आहे. निवडणुकीच्या कामात जरी नियुक्ती झाली नसली तरी काही कामचोर कर्मचारी या कारणाने कार्यालयातून बेपत्ता होत असल्याचे चित्र आहे.जिल्हा प्रशासनाच्या कोणत्याही कार्यालयात सकाळी ११ वाजताच्या सुमारास गेल्यास अर्ध्या बाकांवर कर्मचारी दिसतील तर अर्धे बाक रिकामे दिसतील. यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास कार्यालयात जा सारेच बाक रिकामे दिसतील. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्याच्या तोंडून एकच उत्तर मिळते निवडणुकीच्या कामात आहे. जिल्ह्यातील सारेच कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असतील तर नागरिकांनी त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता नेमके कुठे जावे असा नवा प्रश्न समोर येत आहे. आचारसंहिता असल्याने शासकीय कामे अडकली आहेत; मात्र समस्या सोडविण्यात तर आचारसंहितेची आडकाठी येत नसावी, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनातील पाच हजार ५६४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे, यात दुमत नाही. या कामात महसूल विभागाच्या व शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा भरणा अधिक आहे. इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची सख्या तशी कमीच आहे. असे असतानाही जिल्ह्यातील कृषी विभाग, आरोग्य विभागासारख्या कार्यालयात काही कामाकरिता गेले असता नागरिकांना साहेब निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे उत्तर मिळत आहे. कार्यालयात कर्मचारी नसल्याने या काळात विविध कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.येत्या दिवसात सणांना सुरुवात होत अससल्याने गावातील नागरिक विविध शासकीय कामांकरिता वर्धेत येत आहेत. यामुळे गाव खेड्यातून विविध कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. (प्रतिनिधी)