शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

निवडणूक कार्यक्रम कामचुकार कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर

By admin | Updated: October 9, 2014 23:06 IST

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. यात अनेक कामे असतात. या कामाकरिता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. ही नियुक्ती करताना कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना त्रास होणार नाही

वर्धा : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. यात अनेक कामे असतात. या कामाकरिता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. ही नियुक्ती करताना कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना त्रास होणार नाही याकरिता काही कर्मचारी कार्यालयात असतात. वर्धेत मात्र शासकीय कार्यालयात सारेच कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. साऱ्याच विभागात शुकशुकाट आहे. निवडणुकीच्या कामात जरी नियुक्ती झाली नसली तरी काही कामचोर कर्मचारी या कारणाने कार्यालयातून बेपत्ता होत असल्याचे चित्र आहे.जिल्हा प्रशासनाच्या कोणत्याही कार्यालयात सकाळी ११ वाजताच्या सुमारास गेल्यास अर्ध्या बाकांवर कर्मचारी दिसतील तर अर्धे बाक रिकामे दिसतील. यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास कार्यालयात जा सारेच बाक रिकामे दिसतील. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्याच्या तोंडून एकच उत्तर मिळते निवडणुकीच्या कामात आहे. जिल्ह्यातील सारेच कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असतील तर नागरिकांनी त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता नेमके कुठे जावे असा नवा प्रश्न समोर येत आहे. आचारसंहिता असल्याने शासकीय कामे अडकली आहेत; मात्र समस्या सोडविण्यात तर आचारसंहितेची आडकाठी येत नसावी, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनातील पाच हजार ५६४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे, यात दुमत नाही. या कामात महसूल विभागाच्या व शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा भरणा अधिक आहे. इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची सख्या तशी कमीच आहे. असे असतानाही जिल्ह्यातील कृषी विभाग, आरोग्य विभागासारख्या कार्यालयात काही कामाकरिता गेले असता नागरिकांना साहेब निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे उत्तर मिळत आहे. कार्यालयात कर्मचारी नसल्याने या काळात विविध कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.येत्या दिवसात सणांना सुरुवात होत अससल्याने गावातील नागरिक विविध शासकीय कामांकरिता वर्धेत येत आहेत. यामुळे गाव खेड्यातून विविध कामाकरिता येत असलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. (प्रतिनिधी)