शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

सेवाग्राम रस्ता झाला ‘पॅच’मय

By admin | Updated: March 5, 2017 00:38 IST

शहरातील गांधी पुतळ्यापासून सेवाग्राम उड्डाणपूलापर्यंतचा रस्ता वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

रस्त्यावरील खोल खड्डे धोकादायक : गिट्टीमुळे वाहनचालकांना त्रास वर्धा : शहरातील गांधी पुतळ्यापासून सेवाग्राम उड्डाणपूलापर्यंतचा रस्ता वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्याची डागडुजी करताना डांबराचे ‘पॅच’ लावले. यामुळे हा रस्ता उंचसखल झाला आहे. अनेकदा या रस्त्यावरून वाहने घसरतात. रस्त्याचे दुभाजकही तुटलेले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करून दुभाजकांची डागडुजी करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. या रस्त्याला काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे खोल असून अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. रात्रीच्या वेळी वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे दृष्टीस पडत नाही. परिणामी, वाहन खड्ड्यांमध्ये अडखळूून अपघातांना सामोरे जावे लागते. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. दिवसरात्र येथे वाहनांची ये-जा असते. पथदिवे असले तरी ते पुरेसा प्रकाश देत नाहीत. यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. रस्त्याच्या कडेला गिट्टी पडून आहे. यावरून वाहने घसरून किरकोळ अपघात होतात. या मार्गावर शाळा, महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थी ये-जा करतात. शिवाय याच मार्गावर शासकीय कार्यालये असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांनाही याच मार्गाने प्रवास करावा लागतो. कार्यालयीन कर्मचारी, मजूर वर्ग आणि सेवाग्राम रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. यामुळे या रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे. हा रस्ता काही भागात उंचसखल असल्याने वाहन चालविणे कठीण होते. वाहन उसळत असल्याने वाहन चालक तसेच प्रवाशांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. रुग्णव्यक्ती असल्यास त्यांनाही यातनामय प्रवास करावा लागतो. येथून जडवाहने धावतात. यामुळे अल्पावधीत रस्त्याची दुरवस्था होते. या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करून दुभाजकांची डागडुजी करणे गरजेचे झाले आहे.(स्थानिक प्रतिनिधी) व्हॉल्व्ह लिकेजमुळे खड्डा या मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ असलेला नळयोजनेचा व्हॉल्व्ह नेहमी लिक होतो. यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. व्हॉल्व्हमुळे येथे खड्डा तयार झाला असून रात्रीच्या वेळी हा खड्डा दिसत नाही. अशातच वाहन चालकांना अपघात होतात. काही दिवसांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली; पण काम करताना दर्जाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, अलपावधीत रस्त्याची चुरी बाहेर पडली आहे. या चुरीमुळे वाहनांचे टायर पंक्चर होतात. शिवाय ही बाब अपघाताला कारणीभूत ठरते.