शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

पाटचरीचे खोदकाम सदोष

By admin | Updated: May 21, 2016 02:09 IST

येथील वेणुबाई शंकरराव बेलवे यांच्या शेतातून केलेल्या पाटचरीचे खोदकाम सदोषरीत्या केले आहे.

वाहिपेरीच्या अडचणी वाढल्या : मोक्का पाहणी करण्याची मागणीरोहणा : येथील वेणुबाई शंकरराव बेलवे यांच्या शेतातून केलेल्या पाटचरीचे खोदकाम सदोषरीत्या केले आहे. त्यामुळे या महिला शेतकऱ्याची बरीच जमीन गेली. उरलेली शेतीत वाहीपेरीच्या अडचणी वाढल्या असून ओलीत शक्य नाही. त्यामुळे संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष खोदकाम पाहून आपल्याला न्याय देण्याची मागणी सदर शेतकऱ्याने केली आहे. वेणुबाई शंकरराव बेलगे यांचे वाई मौज्यात ००.९१ हेक्टर आराजीचे सर्व्हे नं. १६१ असे शेत आहे. सदर शेत रोहणा उपलघुकालव्याला लागून उजव्या भागाला आहे. पाटबंधारे विभागाने उपलघु कालव्यातील पाणी सिंचनासाठी वापरता यावे म्हणून त्यांच्या शेताच्या मध्यभागातून पाटचरी खोदली आहे. पाटचरीद्वारे पाणी शेतात नेण्यासाठी शेतजमीन सखल भागात असणे आवश्यक असते. पाटचरी उथळ भागात असेल तर पाणी शेतात नेता येणे शक्य असते. ही बाब माहिती असूनही बेलगे यांच्या शेतातील पाटचरी शेत जमिनीपासून सहा ते सात फूट खोल खोदण्यात आली. त्यामुळे पाटचरीतून येणारे पाणी शेताच्या उंचीपर्यंत वर कसे चढेल हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर खोदकामामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेताचे दोन तुकडे पडले. खोदलेली माती बाजुला टाकल्याने रस्त्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर शेतातून आधी उपकालव्यासाठी व आता पाटचरी साठी जमीन संपादित केल्यामुळे उरलेल्या अत्यल्प जमिनीतून यंदाच्या खरीप हंगामात कसे पीक घ्यावे हा गहन प्रश्न महिला शेतकरी व त्यांच्या मुलांसमोर निर्माण झाला आहे. शेतजमीन संपादनासाठी होणारा खर्च व एवढा खटाटोप करूनही सिंचन शुन्य असा प्रकार येथे पाहावयास मिळत आहे. पाटबंधारे विभागाचे काम प्रत्यक्ष मोक्यावर पाहावे अशी मागणी सदर शेतकऱ्यांचे निम्न वर्धा कालवे विभाग पिपरी (वर्धा) चे कार्यकारी अभियंता, खासदर रामदास तडस, आमदार अमर काळे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आपल्याला न्याय मिळावा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.(वार्ताहर) शेताच्या मध्यभागातच खोदली पाटचरीवेणूबाई बेलवे यांच्या शेतातून आधी उपकालव्यासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. यानंतर आता पुन्हा पाटचरी साठी जमीन संपादित केल्यामुळे अत्यल्प जमीन त्यांच्याकडे उरली आहे. या उरलेल्या जमिनीतून कसे पीक घ्यावे हा प्रश्न त्यांना पडला आहे. सिचनासाठी एवढा खटाटोप केल्यावरही सिंचन किती होते हा प्रश्नच असल्याचे बेलवे यांचे म्हणणे आहे. शेताच्या मधातूनच उपकालवा गेल्यामुळे अनेक अडचणी येत आहे.