शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

पाटचरीचे खोदकाम सदोष

By admin | Updated: May 21, 2016 02:09 IST

येथील वेणुबाई शंकरराव बेलवे यांच्या शेतातून केलेल्या पाटचरीचे खोदकाम सदोषरीत्या केले आहे.

वाहिपेरीच्या अडचणी वाढल्या : मोक्का पाहणी करण्याची मागणीरोहणा : येथील वेणुबाई शंकरराव बेलवे यांच्या शेतातून केलेल्या पाटचरीचे खोदकाम सदोषरीत्या केले आहे. त्यामुळे या महिला शेतकऱ्याची बरीच जमीन गेली. उरलेली शेतीत वाहीपेरीच्या अडचणी वाढल्या असून ओलीत शक्य नाही. त्यामुळे संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष खोदकाम पाहून आपल्याला न्याय देण्याची मागणी सदर शेतकऱ्याने केली आहे. वेणुबाई शंकरराव बेलगे यांचे वाई मौज्यात ००.९१ हेक्टर आराजीचे सर्व्हे नं. १६१ असे शेत आहे. सदर शेत रोहणा उपलघुकालव्याला लागून उजव्या भागाला आहे. पाटबंधारे विभागाने उपलघु कालव्यातील पाणी सिंचनासाठी वापरता यावे म्हणून त्यांच्या शेताच्या मध्यभागातून पाटचरी खोदली आहे. पाटचरीद्वारे पाणी शेतात नेण्यासाठी शेतजमीन सखल भागात असणे आवश्यक असते. पाटचरी उथळ भागात असेल तर पाणी शेतात नेता येणे शक्य असते. ही बाब माहिती असूनही बेलगे यांच्या शेतातील पाटचरी शेत जमिनीपासून सहा ते सात फूट खोल खोदण्यात आली. त्यामुळे पाटचरीतून येणारे पाणी शेताच्या उंचीपर्यंत वर कसे चढेल हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर खोदकामामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेताचे दोन तुकडे पडले. खोदलेली माती बाजुला टाकल्याने रस्त्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर शेतातून आधी उपकालव्यासाठी व आता पाटचरी साठी जमीन संपादित केल्यामुळे उरलेल्या अत्यल्प जमिनीतून यंदाच्या खरीप हंगामात कसे पीक घ्यावे हा गहन प्रश्न महिला शेतकरी व त्यांच्या मुलांसमोर निर्माण झाला आहे. शेतजमीन संपादनासाठी होणारा खर्च व एवढा खटाटोप करूनही सिंचन शुन्य असा प्रकार येथे पाहावयास मिळत आहे. पाटबंधारे विभागाचे काम प्रत्यक्ष मोक्यावर पाहावे अशी मागणी सदर शेतकऱ्यांचे निम्न वर्धा कालवे विभाग पिपरी (वर्धा) चे कार्यकारी अभियंता, खासदर रामदास तडस, आमदार अमर काळे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आपल्याला न्याय मिळावा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.(वार्ताहर) शेताच्या मध्यभागातच खोदली पाटचरीवेणूबाई बेलवे यांच्या शेतातून आधी उपकालव्यासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. यानंतर आता पुन्हा पाटचरी साठी जमीन संपादित केल्यामुळे अत्यल्प जमीन त्यांच्याकडे उरली आहे. या उरलेल्या जमिनीतून कसे पीक घ्यावे हा प्रश्न त्यांना पडला आहे. सिचनासाठी एवढा खटाटोप केल्यावरही सिंचन किती होते हा प्रश्नच असल्याचे बेलवे यांचे म्हणणे आहे. शेताच्या मधातूनच उपकालवा गेल्यामुळे अनेक अडचणी येत आहे.