शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

विलगीकरणासाठी प्रवाशांची तब्बल चार तास ताटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:00 IST

जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे. विमान, रेल्वे किंवा बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर त्यांना सुरुवातीचे सात दिवस संस्थात्मक तर नंतरचे सात दिवस गृह विलगीकरणात ठेवण्याचे आदेश आहे. बाहेर जिल्ह्यातून वर्धा शहरात प्रवेश केल्यानंतर त्यांना घरी जाण्यापूर्वी सामान्य रुग्णालयात तपासणी करुन नंतरच क्वारंटाईन व्हावे लागतात.

ठळक मुद्देसामान्य रुग्णालयातील प्रकार : मुंबई, पुण्यातून आलेल्या सात व्यक्तींचा रोष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याबाहेरुन शहरात आलेल्यांना प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य तपासणी करणे बंधनकारक केले आहे पण; सामान्य रुग्णालयात तपासणीकरिता नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची नेहमीच ओरड होत आली आहे. आजही मुंबई व पुण्यावरुन आलेल्यांना तब्बल चार तास ताटकळत राहावे लागले. त्यामुळे त्यांनी सामान्य रुग्णायालयातील आरोग्य व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे. विमान, रेल्वे किंवा बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर त्यांना सुरुवातीचे सात दिवस संस्थात्मक तर नंतरचे सात दिवस गृह विलगीकरणात ठेवण्याचे आदेश आहे. बाहेर जिल्ह्यातून वर्धा शहरात प्रवेश केल्यानंतर त्यांना घरी जाण्यापूर्वी सामान्य रुग्णालयात तपासणी करुन नंतरच क्वारंटाईन व्हावे लागतात. रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांना थेट रुग्णालयात पोहोचविण्यासाठी तेथे प्रशासनाकडून वाहनाची व्यवस्था केली आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका परिवारातील पाच व्यक्ती मुंबई आणि दोघे पुण्याहून आले.या सातही जणांना सामान्य रुग्णालयात तपासणीकरिता नेले. रात्रभर प्रवास करुन आलेले हे सर्व व्यक्ती आरोग्य तपासणीकरिता उपाश्यापोटी बसून राहिले.रुग्णालयात उपस्थित कर्मचाऱ्यांना वारंवार तपासणी करण्याची विनंती केल्यानंतरही त्यांना तब्बल दीड वाजतापर्यंत बसवून ठेवले. त्यानंतर यातील एकाने उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्याशी संपर्क करुन माहिती दिली. त्यानंतर लगेच यासर्वांची विचारपूस करुन त्यांच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का मारुन त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्राकडे रवाना केले. सामान्य रुग्णालयातील त्यांना आलेल्या या अनुभवामुळे त्यांनी तीव्र रोष व्यक्त केला.जिल्हा सामान्य रुग्णालयात असा प्रकार होऊच शकत नाही. बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांच्या तपासणीकरिता चोविस तास व्यवस्था करण्यात आली आहे. आजही सकाळी साडेदहा वाजतापासून त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित होते. आलेल्यांची तपासणी करुन त्यांना लगेच गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठविले जातात. कधीकधी वाहन उपलब्ध नसले तर थोडा विलंब होऊ शकतो.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटल