शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

विलगीकरणासाठी प्रवाशांची तब्बल चार तास ताटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:00 IST

जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे. विमान, रेल्वे किंवा बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर त्यांना सुरुवातीचे सात दिवस संस्थात्मक तर नंतरचे सात दिवस गृह विलगीकरणात ठेवण्याचे आदेश आहे. बाहेर जिल्ह्यातून वर्धा शहरात प्रवेश केल्यानंतर त्यांना घरी जाण्यापूर्वी सामान्य रुग्णालयात तपासणी करुन नंतरच क्वारंटाईन व्हावे लागतात.

ठळक मुद्देसामान्य रुग्णालयातील प्रकार : मुंबई, पुण्यातून आलेल्या सात व्यक्तींचा रोष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याबाहेरुन शहरात आलेल्यांना प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य तपासणी करणे बंधनकारक केले आहे पण; सामान्य रुग्णालयात तपासणीकरिता नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची नेहमीच ओरड होत आली आहे. आजही मुंबई व पुण्यावरुन आलेल्यांना तब्बल चार तास ताटकळत राहावे लागले. त्यामुळे त्यांनी सामान्य रुग्णायालयातील आरोग्य व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे. विमान, रेल्वे किंवा बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर त्यांना सुरुवातीचे सात दिवस संस्थात्मक तर नंतरचे सात दिवस गृह विलगीकरणात ठेवण्याचे आदेश आहे. बाहेर जिल्ह्यातून वर्धा शहरात प्रवेश केल्यानंतर त्यांना घरी जाण्यापूर्वी सामान्य रुग्णालयात तपासणी करुन नंतरच क्वारंटाईन व्हावे लागतात. रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांना थेट रुग्णालयात पोहोचविण्यासाठी तेथे प्रशासनाकडून वाहनाची व्यवस्था केली आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका परिवारातील पाच व्यक्ती मुंबई आणि दोघे पुण्याहून आले.या सातही जणांना सामान्य रुग्णालयात तपासणीकरिता नेले. रात्रभर प्रवास करुन आलेले हे सर्व व्यक्ती आरोग्य तपासणीकरिता उपाश्यापोटी बसून राहिले.रुग्णालयात उपस्थित कर्मचाऱ्यांना वारंवार तपासणी करण्याची विनंती केल्यानंतरही त्यांना तब्बल दीड वाजतापर्यंत बसवून ठेवले. त्यानंतर यातील एकाने उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्याशी संपर्क करुन माहिती दिली. त्यानंतर लगेच यासर्वांची विचारपूस करुन त्यांच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का मारुन त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्राकडे रवाना केले. सामान्य रुग्णालयातील त्यांना आलेल्या या अनुभवामुळे त्यांनी तीव्र रोष व्यक्त केला.जिल्हा सामान्य रुग्णालयात असा प्रकार होऊच शकत नाही. बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांच्या तपासणीकरिता चोविस तास व्यवस्था करण्यात आली आहे. आजही सकाळी साडेदहा वाजतापासून त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित होते. आलेल्यांची तपासणी करुन त्यांना लगेच गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठविले जातात. कधीकधी वाहन उपलब्ध नसले तर थोडा विलंब होऊ शकतो.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटल