शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

बोरधरण येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2015 02:27 IST

व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झालेल्या बोरधरण अभयारण्यात येणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी असलेल्या प्रवासी निवाऱ्याची पुरती दुर्दशा झाली आहे.

सर्वत्र वाढली झुडपे : प्रवाशांना सोसावा लागतो त्रास; छत नसल्याने झाडाचाच आश्रयसेलू : व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झालेल्या बोरधरण अभयारण्यात येणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी असलेल्या प्रवासी निवाऱ्याची पुरती दुर्दशा झाली आहे. प्रवासी निवाऱ्यात पाऊस आणि उन्हापासून वाचण्याऐवजी झाडांच्या सान्निध्यात रहावे लागते. त्यामुळे प्रवाशी व पर्यटक कमालीचे त्रस्त झाले आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर संंपर्र्ण विदर्भातून पर्यटक व्याघ्र प्रकल्पात वाघ व इतर प्राणी डोळ्यात टिपावे म्हणून हौसेने येतात. बसने येणाऱ्या प्रवाशांची संख्याही बरीच आहे. बसच्या प्रतिक्षेत ताटकळत असलेले प्रवाशी निवाऱ्याअभावी पानटपऱ्या व झाडांचा आश्रय शोधतात. सुमारे चार वर्षापासून या निवाऱ्याची दैना झाली आहे. छत, भिंती पडुन खंडार झाले. गवताची झुडपे वाढली आहे. मात्र कुणीही याकडे लक्ष देत नाही. नुकताच बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने येथील महत्व वाढले आहे. एस.टी. महामंडळाने व स्थानिक लोकप्रतिनिधीने प्रवाशी निवारा नव्याने बांधण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परिसरातील प्रवासी या निवाऱ्याचा प्रवासासाठी आधार घेतात. परंतु निवाराच दिसत नसल्याने अनेकदा बसही थांबत नाही. पावसाळ्यात तर कुठे थांबावे असा प्रश्न प्रवाशांना पडतो. महिला प्रवाशांना जास्तीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथे प्रवासी निवारा नव्याने बांधण्यात यावा आणि होत असलेला त्रास थांबवावा अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)महिलांची कुचंबना, पावसाळ्यात आडोसा शोधताना धावाधावया मार्गावरून सेलूकडे व इतरही गावाकडे नागरिक जातात. अनेक महिला रोजगारासाठी अभयारण्याकडे जात असतात. अशावेळी बसची वाट पाहात त्या या निवाऱ्याजवळ थांबतात. पावसाळ्यात पावसापासून रक्षणासाठी नागरिकांना आजुबाजूच्या झाडांचा किंवा टपरीचा आधार घ्यावा लागतो. पुरुषांना तितकासा त्रास अशावेळी होत नाही. परंतु महिलांची मात्र कुचंबना होते. नुकताच बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने येथील महत्व वाढले आहे. एस.टी. महामंडळाने व स्थानिक लोकप्रतिनिधीने प्रवासी निवारा नव्याने बांधण्यासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे. उन्हाच्या झळा सोसत नागरिकांना स्थानकासमोर उभे राहावे लागते. पाणी पिण्याचीही येथे कुठलीही सोय नसल्याने ये जा करणारे प्रवासी सतत संताप व्यक्त करीत असतात. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोकानिवारा परिसराला झुडपांचा वेढा आहे. या कारणाने या पत्रिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर आहे. या भीतीपोटी नागरिक निवाऱ्यापासून जरा दूरच उभे राहतात. त्यामुळे या निवाऱ्याचा उपयोग काय असा प्रश्न पडतो.