शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

बोरधरण येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2015 02:27 IST

व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झालेल्या बोरधरण अभयारण्यात येणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी असलेल्या प्रवासी निवाऱ्याची पुरती दुर्दशा झाली आहे.

सर्वत्र वाढली झुडपे : प्रवाशांना सोसावा लागतो त्रास; छत नसल्याने झाडाचाच आश्रयसेलू : व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झालेल्या बोरधरण अभयारण्यात येणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी असलेल्या प्रवासी निवाऱ्याची पुरती दुर्दशा झाली आहे. प्रवासी निवाऱ्यात पाऊस आणि उन्हापासून वाचण्याऐवजी झाडांच्या सान्निध्यात रहावे लागते. त्यामुळे प्रवाशी व पर्यटक कमालीचे त्रस्त झाले आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर संंपर्र्ण विदर्भातून पर्यटक व्याघ्र प्रकल्पात वाघ व इतर प्राणी डोळ्यात टिपावे म्हणून हौसेने येतात. बसने येणाऱ्या प्रवाशांची संख्याही बरीच आहे. बसच्या प्रतिक्षेत ताटकळत असलेले प्रवाशी निवाऱ्याअभावी पानटपऱ्या व झाडांचा आश्रय शोधतात. सुमारे चार वर्षापासून या निवाऱ्याची दैना झाली आहे. छत, भिंती पडुन खंडार झाले. गवताची झुडपे वाढली आहे. मात्र कुणीही याकडे लक्ष देत नाही. नुकताच बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने येथील महत्व वाढले आहे. एस.टी. महामंडळाने व स्थानिक लोकप्रतिनिधीने प्रवाशी निवारा नव्याने बांधण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परिसरातील प्रवासी या निवाऱ्याचा प्रवासासाठी आधार घेतात. परंतु निवाराच दिसत नसल्याने अनेकदा बसही थांबत नाही. पावसाळ्यात तर कुठे थांबावे असा प्रश्न प्रवाशांना पडतो. महिला प्रवाशांना जास्तीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथे प्रवासी निवारा नव्याने बांधण्यात यावा आणि होत असलेला त्रास थांबवावा अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)महिलांची कुचंबना, पावसाळ्यात आडोसा शोधताना धावाधावया मार्गावरून सेलूकडे व इतरही गावाकडे नागरिक जातात. अनेक महिला रोजगारासाठी अभयारण्याकडे जात असतात. अशावेळी बसची वाट पाहात त्या या निवाऱ्याजवळ थांबतात. पावसाळ्यात पावसापासून रक्षणासाठी नागरिकांना आजुबाजूच्या झाडांचा किंवा टपरीचा आधार घ्यावा लागतो. पुरुषांना तितकासा त्रास अशावेळी होत नाही. परंतु महिलांची मात्र कुचंबना होते. नुकताच बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने येथील महत्व वाढले आहे. एस.टी. महामंडळाने व स्थानिक लोकप्रतिनिधीने प्रवासी निवारा नव्याने बांधण्यासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे. उन्हाच्या झळा सोसत नागरिकांना स्थानकासमोर उभे राहावे लागते. पाणी पिण्याचीही येथे कुठलीही सोय नसल्याने ये जा करणारे प्रवासी सतत संताप व्यक्त करीत असतात. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोकानिवारा परिसराला झुडपांचा वेढा आहे. या कारणाने या पत्रिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर आहे. या भीतीपोटी नागरिक निवाऱ्यापासून जरा दूरच उभे राहतात. त्यामुळे या निवाऱ्याचा उपयोग काय असा प्रश्न पडतो.