शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बोरधरण येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2015 02:27 IST

व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झालेल्या बोरधरण अभयारण्यात येणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी असलेल्या प्रवासी निवाऱ्याची पुरती दुर्दशा झाली आहे.

सर्वत्र वाढली झुडपे : प्रवाशांना सोसावा लागतो त्रास; छत नसल्याने झाडाचाच आश्रयसेलू : व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झालेल्या बोरधरण अभयारण्यात येणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी असलेल्या प्रवासी निवाऱ्याची पुरती दुर्दशा झाली आहे. प्रवासी निवाऱ्यात पाऊस आणि उन्हापासून वाचण्याऐवजी झाडांच्या सान्निध्यात रहावे लागते. त्यामुळे प्रवाशी व पर्यटक कमालीचे त्रस्त झाले आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर संंपर्र्ण विदर्भातून पर्यटक व्याघ्र प्रकल्पात वाघ व इतर प्राणी डोळ्यात टिपावे म्हणून हौसेने येतात. बसने येणाऱ्या प्रवाशांची संख्याही बरीच आहे. बसच्या प्रतिक्षेत ताटकळत असलेले प्रवाशी निवाऱ्याअभावी पानटपऱ्या व झाडांचा आश्रय शोधतात. सुमारे चार वर्षापासून या निवाऱ्याची दैना झाली आहे. छत, भिंती पडुन खंडार झाले. गवताची झुडपे वाढली आहे. मात्र कुणीही याकडे लक्ष देत नाही. नुकताच बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने येथील महत्व वाढले आहे. एस.टी. महामंडळाने व स्थानिक लोकप्रतिनिधीने प्रवाशी निवारा नव्याने बांधण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परिसरातील प्रवासी या निवाऱ्याचा प्रवासासाठी आधार घेतात. परंतु निवाराच दिसत नसल्याने अनेकदा बसही थांबत नाही. पावसाळ्यात तर कुठे थांबावे असा प्रश्न प्रवाशांना पडतो. महिला प्रवाशांना जास्तीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथे प्रवासी निवारा नव्याने बांधण्यात यावा आणि होत असलेला त्रास थांबवावा अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)महिलांची कुचंबना, पावसाळ्यात आडोसा शोधताना धावाधावया मार्गावरून सेलूकडे व इतरही गावाकडे नागरिक जातात. अनेक महिला रोजगारासाठी अभयारण्याकडे जात असतात. अशावेळी बसची वाट पाहात त्या या निवाऱ्याजवळ थांबतात. पावसाळ्यात पावसापासून रक्षणासाठी नागरिकांना आजुबाजूच्या झाडांचा किंवा टपरीचा आधार घ्यावा लागतो. पुरुषांना तितकासा त्रास अशावेळी होत नाही. परंतु महिलांची मात्र कुचंबना होते. नुकताच बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने येथील महत्व वाढले आहे. एस.टी. महामंडळाने व स्थानिक लोकप्रतिनिधीने प्रवासी निवारा नव्याने बांधण्यासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे. उन्हाच्या झळा सोसत नागरिकांना स्थानकासमोर उभे राहावे लागते. पाणी पिण्याचीही येथे कुठलीही सोय नसल्याने ये जा करणारे प्रवासी सतत संताप व्यक्त करीत असतात. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोकानिवारा परिसराला झुडपांचा वेढा आहे. या कारणाने या पत्रिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर आहे. या भीतीपोटी नागरिक निवाऱ्यापासून जरा दूरच उभे राहतात. त्यामुळे या निवाऱ्याचा उपयोग काय असा प्रश्न पडतो.