शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

पुलगाव-आर्वी रेल्वे मार्गाबाबत शासनाकडून पक्षपात

By admin | Updated: August 22, 2016 00:44 IST

मध्य प्रांतातील कापूस उत्पादक भाग म्हणून पुलगाव, हिंगणघाट, आर्वीचे महत्व आहे. याच भागात व्यापाराच्या दृष्टीकोनातून इंग्रजांनी पुलगाव,

रेल्वे मिशन समितीचा आरोप : पुलगाव-आर्वी व मूर्तिजापूर-यवतमाळ दोन्ही रेल्वे मार्ग निक्सन अ‍ॅण्ड कंपनीचेचपुलगाव : मध्य प्रांतातील कापूस उत्पादक भाग म्हणून पुलगाव, हिंगणघाट, आर्वीचे महत्व आहे. याच भागात व्यापाराच्या दृष्टीकोनातून इंग्रजांनी पुलगाव, आर्वी, अचलपूर, मूर्तिजापूर, यवतमाळ हा नॅरोगेज रेल्वे मार्ग निर्मित केला. येथूनच वऱ्हाडाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. स्वातंत्र्यानंतर या दोन्ही नॅरोगेज मार्गाचा निक्सन अ‍ॅड. कंपनीशी दर दहा वर्षांनी सुरू ठेवण्याचा करार भारत सरकारला करावा लागत होता. यामुळे या मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रूपांतर व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. यातच केंद्र शासनाने अचलपूर, यवतमाळ रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी १५०० कोटी रुपये दिले; मात्र पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वे मार्ग बंद केला. या मार्गाबाबत शासनाने पक्षपात केल्याचा आरोप १०० कि.मी मीटर रेल्वे मिशन समितीने केला आहे. येथील एका भवनात १०० कि.मी मोटर रेल्वे मिशन समितीची सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर शहाकार होते. सभेत मिशनचे प्रकाश साकडे (रोहणा), प्रशांत सव्वालाखे, गौरव जाजू, श्रीकांत वाघमारे, सुनील राठी, अ‍ॅड. अवतार सिंग, बाबासाहेब गलाट, प्रमोद बोराटणे आदींनी विचार व्यक्त केले. १९१६ साली ब्रिटिशांनी या भागातील कापूस उत्पादकाचे महत्त्व लक्षात घेता पुलगाव-आर्वी ही नॅरोगेज रेल्वे सुरू केली. या ३५ किमीच्या रेल्वेमुळे पुलगाव-आर्वी दरम्यान रोहणा, विरूळ, सोरटा, धनोडी, पारगोठाण, पिंपळखुटासह इतर ग्रामीण परिसरातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना व दूध, दही, लोण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना सोईस्कर झाले होते. आर्वी परिसरातील आष्टी, मोर्शी, वरूड हा परिसर संत्रा उत्पादकांचा असल्यामुळे पुलगाव-आर्वी हा नॅरोगेज रेल्वे मार्ग वरूड व पुढे आमला या सैनिकी विभागापर्यंत वाढवून पुलगाव व आमला हे दोन संरक्षण विभाग जोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यात पुलगाव, आमला व इटारशी ही संरक्षण विभागाची महत्त्वाची ठिकाणे या मार्गाने जोडल्या जाऊ शकत होती. देश स्वातंत्र झाला. विविध राजकीय पक्षांची सरकारे आलीत व ब्रिटीशकालीन नॅरोगेज मार्गाकडे दुर्लक्ष झाले. या दोन्ही मार्गावर अनेक संकटे आलीत. त्यातून पुलगाव, आर्वी हा रेल्वे मार्ग ३१ जुलै २००६ पासून बंद झाल्याने परिसरातील १० लाख जनतेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम पडत आहे. याच पद्धतीने चालणाऱ्या अचलपूर, मूर्तिजापूर, यवतमाळ या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी शासनाने १५०० कोटी दिले. त्याप्रमाणे पुलगाव आर्वी मार्गासाठी राशी देवून हा मार्ग आमला पर्यंत वाढवावा, अशी मागणी करण्यात आली. सभेला भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, गिरीश चौधरी, शाबिर कुरेशी, कपील शुक्ला, अ‍ॅड. अजय तिवारी, मनोज पनपालिया, मधुकर रेवतकर, आशिष गांधी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)