शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
4
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
5
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
6
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
7
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
8
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
9
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
10
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
11
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
12
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
13
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
14
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
15
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
16
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
17
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
18
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
19
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

पुलगाव-आर्वी रेल्वे मार्गाबाबत शासनाकडून पक्षपात

By admin | Updated: August 22, 2016 00:44 IST

मध्य प्रांतातील कापूस उत्पादक भाग म्हणून पुलगाव, हिंगणघाट, आर्वीचे महत्व आहे. याच भागात व्यापाराच्या दृष्टीकोनातून इंग्रजांनी पुलगाव,

रेल्वे मिशन समितीचा आरोप : पुलगाव-आर्वी व मूर्तिजापूर-यवतमाळ दोन्ही रेल्वे मार्ग निक्सन अ‍ॅण्ड कंपनीचेचपुलगाव : मध्य प्रांतातील कापूस उत्पादक भाग म्हणून पुलगाव, हिंगणघाट, आर्वीचे महत्व आहे. याच भागात व्यापाराच्या दृष्टीकोनातून इंग्रजांनी पुलगाव, आर्वी, अचलपूर, मूर्तिजापूर, यवतमाळ हा नॅरोगेज रेल्वे मार्ग निर्मित केला. येथूनच वऱ्हाडाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. स्वातंत्र्यानंतर या दोन्ही नॅरोगेज मार्गाचा निक्सन अ‍ॅड. कंपनीशी दर दहा वर्षांनी सुरू ठेवण्याचा करार भारत सरकारला करावा लागत होता. यामुळे या मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रूपांतर व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. यातच केंद्र शासनाने अचलपूर, यवतमाळ रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी १५०० कोटी रुपये दिले; मात्र पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वे मार्ग बंद केला. या मार्गाबाबत शासनाने पक्षपात केल्याचा आरोप १०० कि.मी मीटर रेल्वे मिशन समितीने केला आहे. येथील एका भवनात १०० कि.मी मोटर रेल्वे मिशन समितीची सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर शहाकार होते. सभेत मिशनचे प्रकाश साकडे (रोहणा), प्रशांत सव्वालाखे, गौरव जाजू, श्रीकांत वाघमारे, सुनील राठी, अ‍ॅड. अवतार सिंग, बाबासाहेब गलाट, प्रमोद बोराटणे आदींनी विचार व्यक्त केले. १९१६ साली ब्रिटिशांनी या भागातील कापूस उत्पादकाचे महत्त्व लक्षात घेता पुलगाव-आर्वी ही नॅरोगेज रेल्वे सुरू केली. या ३५ किमीच्या रेल्वेमुळे पुलगाव-आर्वी दरम्यान रोहणा, विरूळ, सोरटा, धनोडी, पारगोठाण, पिंपळखुटासह इतर ग्रामीण परिसरातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना व दूध, दही, लोण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना सोईस्कर झाले होते. आर्वी परिसरातील आष्टी, मोर्शी, वरूड हा परिसर संत्रा उत्पादकांचा असल्यामुळे पुलगाव-आर्वी हा नॅरोगेज रेल्वे मार्ग वरूड व पुढे आमला या सैनिकी विभागापर्यंत वाढवून पुलगाव व आमला हे दोन संरक्षण विभाग जोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यात पुलगाव, आमला व इटारशी ही संरक्षण विभागाची महत्त्वाची ठिकाणे या मार्गाने जोडल्या जाऊ शकत होती. देश स्वातंत्र झाला. विविध राजकीय पक्षांची सरकारे आलीत व ब्रिटीशकालीन नॅरोगेज मार्गाकडे दुर्लक्ष झाले. या दोन्ही मार्गावर अनेक संकटे आलीत. त्यातून पुलगाव, आर्वी हा रेल्वे मार्ग ३१ जुलै २००६ पासून बंद झाल्याने परिसरातील १० लाख जनतेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम पडत आहे. याच पद्धतीने चालणाऱ्या अचलपूर, मूर्तिजापूर, यवतमाळ या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी शासनाने १५०० कोटी दिले. त्याप्रमाणे पुलगाव आर्वी मार्गासाठी राशी देवून हा मार्ग आमला पर्यंत वाढवावा, अशी मागणी करण्यात आली. सभेला भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, गिरीश चौधरी, शाबिर कुरेशी, कपील शुक्ला, अ‍ॅड. अजय तिवारी, मनोज पनपालिया, मधुकर रेवतकर, आशिष गांधी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)