शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

वृक्षलागवड मोहिमेत सहभागी व्हा

By admin | Updated: June 12, 2016 01:52 IST

राज्यात २ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ जुलै रोजी सुमारे ७ लक्ष ४० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : जिल्ह्यात ७.४० लाख झाडे लावणार वर्धा : राज्यात २ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ जुलै रोजी सुमारे ७ लक्ष ४० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना साकार करण्यासाठी जनतेने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. राज्यात १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्षलागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातही ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी नवाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुख तसेच स्वयंसेवी संस्थेची बैठक आयोजित करण्यात आली. वृक्षरोपण मोहिमेत वन विभाग, सामाजिक वनीकरण, महसूल व इतर सर्व विभाग प्रमुख, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, निसर्ग सेवा समिती आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून मोहीम यशस्वी करण्यात येणार असून एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना साकार करण्यासाठी सर्व जनतेचेही सहकार्य आवश्यक आहे. जिल्ह्यात वृक्षरोपण मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षरोपणासाठी झाडे उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवाल यांनी यावेळी दिल्या. १ जुलै रोजी वृक्षलागवड करण्याबाबत वन विभागास जंगलक्षेत्रातील ५८ रोपवनस्थळी एकूण ४ लक्ष ९९ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभाग २० हजार असून शासनाचे २० विभाग व त्याअंतर्गत यंत्रणांना २ लक्ष २० हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभागाकडे इतर विभाग व यंत्रणांसाठी वर्धा वनपरिक्षेत्र, गांधीबाग, रोपवाटिका, वर्धा, हिंगणी वनपरिक्षेत्र, हिंगणी रोपवाटिका, समुद्रपूर वनपरिक्षेत्र, मोहगाव रोपवाटिका, आष्टी वनपरिक्षेत्र, पिलापूर रोपवाटिका, तळेगाव वनपरिक्षेत्र, जसापूर रोपवाटिका, कारंजा वनपरिक्षेत्र, आमझरी रोपवाटिका, आर्वी वनपरिक्षेत्र, सारंगपुरी रोपवाटिका, खरांगणा वनपरिक्षेत्र, खरांगणा रोपवाटिका येथे उपलब्ध आहे. वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच इतर सर्व यंत्रणेचे अधिकारी यांनी नियोजन केले आहे. जिल्हास्तरावर व प्रत्येक तालुक्याकरिता एक तालुका समन्वयक लागवड अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हा समन्वयक म्हणून सामाजिक वनिकरणचे उपसंचालक यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. वृक्ष लागवड मोहिमेत जास्तीत जास्त लोकसहभाग व्हावा या दृष्टीने वन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या रोप लागवड कार्यक्रमामध्ये लोकप्रतिनिधी, संस्थाचे पदाधिकारी, विद्यार्थी, सरपंच, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था आणि जिल्ह्यातील नागरिकांचा सहभाग असणार आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, उपवनसंरक्षक दिगंबर पगार, सामाजिक वनिकरणचे तळवेकर उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)