शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

वृक्षलागवड मोहिमेत सहभागी व्हा

By admin | Updated: June 12, 2016 01:52 IST

राज्यात २ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ जुलै रोजी सुमारे ७ लक्ष ४० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : जिल्ह्यात ७.४० लाख झाडे लावणार वर्धा : राज्यात २ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ जुलै रोजी सुमारे ७ लक्ष ४० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना साकार करण्यासाठी जनतेने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. राज्यात १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्षलागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातही ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी नवाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुख तसेच स्वयंसेवी संस्थेची बैठक आयोजित करण्यात आली. वृक्षरोपण मोहिमेत वन विभाग, सामाजिक वनीकरण, महसूल व इतर सर्व विभाग प्रमुख, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, निसर्ग सेवा समिती आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून मोहीम यशस्वी करण्यात येणार असून एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना साकार करण्यासाठी सर्व जनतेचेही सहकार्य आवश्यक आहे. जिल्ह्यात वृक्षरोपण मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षरोपणासाठी झाडे उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवाल यांनी यावेळी दिल्या. १ जुलै रोजी वृक्षलागवड करण्याबाबत वन विभागास जंगलक्षेत्रातील ५८ रोपवनस्थळी एकूण ४ लक्ष ९९ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभाग २० हजार असून शासनाचे २० विभाग व त्याअंतर्गत यंत्रणांना २ लक्ष २० हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभागाकडे इतर विभाग व यंत्रणांसाठी वर्धा वनपरिक्षेत्र, गांधीबाग, रोपवाटिका, वर्धा, हिंगणी वनपरिक्षेत्र, हिंगणी रोपवाटिका, समुद्रपूर वनपरिक्षेत्र, मोहगाव रोपवाटिका, आष्टी वनपरिक्षेत्र, पिलापूर रोपवाटिका, तळेगाव वनपरिक्षेत्र, जसापूर रोपवाटिका, कारंजा वनपरिक्षेत्र, आमझरी रोपवाटिका, आर्वी वनपरिक्षेत्र, सारंगपुरी रोपवाटिका, खरांगणा वनपरिक्षेत्र, खरांगणा रोपवाटिका येथे उपलब्ध आहे. वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच इतर सर्व यंत्रणेचे अधिकारी यांनी नियोजन केले आहे. जिल्हास्तरावर व प्रत्येक तालुक्याकरिता एक तालुका समन्वयक लागवड अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हा समन्वयक म्हणून सामाजिक वनिकरणचे उपसंचालक यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. वृक्ष लागवड मोहिमेत जास्तीत जास्त लोकसहभाग व्हावा या दृष्टीने वन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या रोप लागवड कार्यक्रमामध्ये लोकप्रतिनिधी, संस्थाचे पदाधिकारी, विद्यार्थी, सरपंच, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था आणि जिल्ह्यातील नागरिकांचा सहभाग असणार आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, उपवनसंरक्षक दिगंबर पगार, सामाजिक वनिकरणचे तळवेकर उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)