शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंग, वाहनांची की बंड्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 22:23 IST

शहरातील पार्किंगचा प्रश्न सुटावा, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी म्हणून वाहतूक नियंत्रक विभाग दररोज विविध नियमांद्वारे कारवाई करीत आहे.

ठळक मुद्देरेल्वेस्थानक मार्गावरील प्रकार : वाहने ठेवायची कुठे, प्रश्न कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील पार्किंगचा प्रश्न सुटावा, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी म्हणून वाहतूक नियंत्रक विभाग दररोज विविध नियमांद्वारे कारवाई करीत आहे. पार्किंगसाठी जागांचा शोध घेत तत्सम फलक लावत आहे; पण अतिक्रमणामुळे त्यांना यश येताना दिसत नाही. रेल्वे स्थानक मार्गावरही पार्किंगसाठी फलक लावले; पण पालिकेने अतिक्रमणच हटविले नाही. यामुळे पार्किंग वाहनांची की बंड्यांची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्धा शहरात वाहनांची पार्किंग करण्याकरिता जागा नाही. यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करतात. परिणामी, रहदारीला अडथळा निर्माण होत असून वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलीस शाखेद्वारे पार्किंगसाठी जागा शोधली जात आहे. पालिका प्रशासनाशी बोलून तेथे फलक लावले जात आहे. या प्रयत्नांतून अनेक ठिकाणी पार्किंगची सुविधाही झाली आहे; पण बजाज चौकातील पार्किंगचा तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे. पालिका प्रशासनाशी बोलून वाहतूक पोलिसांनी भाजी बाजाराच्या रेल्वे स्थानकाकडे जाणाºया मार्गाच्या एका बाजूला पार्किंगचे फलक लावले. यासाठी त्या मार्गावरील फळ तथा भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविणे गरजेचे होते; पण सूचना दिल्यानंतरही नगर पालिका प्रशासन अतिक्रमण हटविण्यात पुढाकार घेत नसल्याने पार्किंगची सुविधा होऊ शकत नसल्याचेच दिसून येत आहे. पार्किंगचे फलक लावलेल्या ठिकाणी फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या लागल्या आहेत. यामुळे ग्राहकांनी वाहने कुठे ठेवावीत, हा प्रश्न कायम आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाºया रस्त्याच्या दुतर्फा फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. पालिका प्रशासनाने ते हटविणे गरजेचे झाले आहे.फळ विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करण्याकडेही दुर्लक्षनगर पालिका प्रशासनाने बजाज चौक, भाजी बाजार व रेल्वेस्टेशन रोडवरील अतिक्रमण अनेकवेळा हटविले; पण तेथील फळ विक्रेते, चहा कॅन्टीनधारक व अन्य किरकोळ व्यावसायिकांना पर्यायी जागा दिलेली नाही. परिणामी, ते वारंवार त्याच ठिकाणी आपली दुकाने लावतात. यापूर्वी अनेकदा पालिका प्रशासन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजी बाजाराची पाहणी केली. विकासाचा प्लानही तयार केला; पण तो प्रत्यक्षात साकारलाच जात नसल्याने फळ विक्रेत्यांनी तरी पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय कुठे करावा, असा प्रश्न उपस्थित होतो. याचा विचार करीत तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.शहरात पार्किंगची सुविधा देण्याच्या दृष्टीने जागांचा शोध घेतला जात आहे. सध्या रेल्वेस्थानक परिसर तथा त्याच मार्गावर भाजी बाजाराच्या बाजूला रस्त्याच्या कडेला नगर पालिकेची बोलणी झाल्यानंतर फलक लावले आहेत; पण तेथील अतिक्रमण पालिकेने हटविले नाही. आम्ही दररोज त्या विके्रत्यांना अन्यत्र व्यवसाय करण्यास सांगतो; पण ते ऐकत नाहीत. पालिकेने व्यावसायिकांना पर्यायी जागा देत पार्किंग व वाहतूक सुधारण्यात सहकार्य करणे गरजेचे आहे.- दत्तात्रय गुरव, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक नियंत्रक शाखा, वर्धा.