शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंग, वाहनांची की बंड्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 22:23 IST

शहरातील पार्किंगचा प्रश्न सुटावा, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी म्हणून वाहतूक नियंत्रक विभाग दररोज विविध नियमांद्वारे कारवाई करीत आहे.

ठळक मुद्देरेल्वेस्थानक मार्गावरील प्रकार : वाहने ठेवायची कुठे, प्रश्न कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील पार्किंगचा प्रश्न सुटावा, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी म्हणून वाहतूक नियंत्रक विभाग दररोज विविध नियमांद्वारे कारवाई करीत आहे. पार्किंगसाठी जागांचा शोध घेत तत्सम फलक लावत आहे; पण अतिक्रमणामुळे त्यांना यश येताना दिसत नाही. रेल्वे स्थानक मार्गावरही पार्किंगसाठी फलक लावले; पण पालिकेने अतिक्रमणच हटविले नाही. यामुळे पार्किंग वाहनांची की बंड्यांची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्धा शहरात वाहनांची पार्किंग करण्याकरिता जागा नाही. यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करतात. परिणामी, रहदारीला अडथळा निर्माण होत असून वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलीस शाखेद्वारे पार्किंगसाठी जागा शोधली जात आहे. पालिका प्रशासनाशी बोलून तेथे फलक लावले जात आहे. या प्रयत्नांतून अनेक ठिकाणी पार्किंगची सुविधाही झाली आहे; पण बजाज चौकातील पार्किंगचा तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे. पालिका प्रशासनाशी बोलून वाहतूक पोलिसांनी भाजी बाजाराच्या रेल्वे स्थानकाकडे जाणाºया मार्गाच्या एका बाजूला पार्किंगचे फलक लावले. यासाठी त्या मार्गावरील फळ तथा भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविणे गरजेचे होते; पण सूचना दिल्यानंतरही नगर पालिका प्रशासन अतिक्रमण हटविण्यात पुढाकार घेत नसल्याने पार्किंगची सुविधा होऊ शकत नसल्याचेच दिसून येत आहे. पार्किंगचे फलक लावलेल्या ठिकाणी फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या लागल्या आहेत. यामुळे ग्राहकांनी वाहने कुठे ठेवावीत, हा प्रश्न कायम आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाºया रस्त्याच्या दुतर्फा फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. पालिका प्रशासनाने ते हटविणे गरजेचे झाले आहे.फळ विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करण्याकडेही दुर्लक्षनगर पालिका प्रशासनाने बजाज चौक, भाजी बाजार व रेल्वेस्टेशन रोडवरील अतिक्रमण अनेकवेळा हटविले; पण तेथील फळ विक्रेते, चहा कॅन्टीनधारक व अन्य किरकोळ व्यावसायिकांना पर्यायी जागा दिलेली नाही. परिणामी, ते वारंवार त्याच ठिकाणी आपली दुकाने लावतात. यापूर्वी अनेकदा पालिका प्रशासन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजी बाजाराची पाहणी केली. विकासाचा प्लानही तयार केला; पण तो प्रत्यक्षात साकारलाच जात नसल्याने फळ विक्रेत्यांनी तरी पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय कुठे करावा, असा प्रश्न उपस्थित होतो. याचा विचार करीत तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.शहरात पार्किंगची सुविधा देण्याच्या दृष्टीने जागांचा शोध घेतला जात आहे. सध्या रेल्वेस्थानक परिसर तथा त्याच मार्गावर भाजी बाजाराच्या बाजूला रस्त्याच्या कडेला नगर पालिकेची बोलणी झाल्यानंतर फलक लावले आहेत; पण तेथील अतिक्रमण पालिकेने हटविले नाही. आम्ही दररोज त्या विके्रत्यांना अन्यत्र व्यवसाय करण्यास सांगतो; पण ते ऐकत नाहीत. पालिकेने व्यावसायिकांना पर्यायी जागा देत पार्किंग व वाहतूक सुधारण्यात सहकार्य करणे गरजेचे आहे.- दत्तात्रय गुरव, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक नियंत्रक शाखा, वर्धा.