शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

पार्किंग, वाहनांची की बंड्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 22:23 IST

शहरातील पार्किंगचा प्रश्न सुटावा, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी म्हणून वाहतूक नियंत्रक विभाग दररोज विविध नियमांद्वारे कारवाई करीत आहे.

ठळक मुद्देरेल्वेस्थानक मार्गावरील प्रकार : वाहने ठेवायची कुठे, प्रश्न कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील पार्किंगचा प्रश्न सुटावा, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी म्हणून वाहतूक नियंत्रक विभाग दररोज विविध नियमांद्वारे कारवाई करीत आहे. पार्किंगसाठी जागांचा शोध घेत तत्सम फलक लावत आहे; पण अतिक्रमणामुळे त्यांना यश येताना दिसत नाही. रेल्वे स्थानक मार्गावरही पार्किंगसाठी फलक लावले; पण पालिकेने अतिक्रमणच हटविले नाही. यामुळे पार्किंग वाहनांची की बंड्यांची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्धा शहरात वाहनांची पार्किंग करण्याकरिता जागा नाही. यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करतात. परिणामी, रहदारीला अडथळा निर्माण होत असून वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलीस शाखेद्वारे पार्किंगसाठी जागा शोधली जात आहे. पालिका प्रशासनाशी बोलून तेथे फलक लावले जात आहे. या प्रयत्नांतून अनेक ठिकाणी पार्किंगची सुविधाही झाली आहे; पण बजाज चौकातील पार्किंगचा तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे. पालिका प्रशासनाशी बोलून वाहतूक पोलिसांनी भाजी बाजाराच्या रेल्वे स्थानकाकडे जाणाºया मार्गाच्या एका बाजूला पार्किंगचे फलक लावले. यासाठी त्या मार्गावरील फळ तथा भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविणे गरजेचे होते; पण सूचना दिल्यानंतरही नगर पालिका प्रशासन अतिक्रमण हटविण्यात पुढाकार घेत नसल्याने पार्किंगची सुविधा होऊ शकत नसल्याचेच दिसून येत आहे. पार्किंगचे फलक लावलेल्या ठिकाणी फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या लागल्या आहेत. यामुळे ग्राहकांनी वाहने कुठे ठेवावीत, हा प्रश्न कायम आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाºया रस्त्याच्या दुतर्फा फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. पालिका प्रशासनाने ते हटविणे गरजेचे झाले आहे.फळ विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करण्याकडेही दुर्लक्षनगर पालिका प्रशासनाने बजाज चौक, भाजी बाजार व रेल्वेस्टेशन रोडवरील अतिक्रमण अनेकवेळा हटविले; पण तेथील फळ विक्रेते, चहा कॅन्टीनधारक व अन्य किरकोळ व्यावसायिकांना पर्यायी जागा दिलेली नाही. परिणामी, ते वारंवार त्याच ठिकाणी आपली दुकाने लावतात. यापूर्वी अनेकदा पालिका प्रशासन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजी बाजाराची पाहणी केली. विकासाचा प्लानही तयार केला; पण तो प्रत्यक्षात साकारलाच जात नसल्याने फळ विक्रेत्यांनी तरी पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय कुठे करावा, असा प्रश्न उपस्थित होतो. याचा विचार करीत तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.शहरात पार्किंगची सुविधा देण्याच्या दृष्टीने जागांचा शोध घेतला जात आहे. सध्या रेल्वेस्थानक परिसर तथा त्याच मार्गावर भाजी बाजाराच्या बाजूला रस्त्याच्या कडेला नगर पालिकेची बोलणी झाल्यानंतर फलक लावले आहेत; पण तेथील अतिक्रमण पालिकेने हटविले नाही. आम्ही दररोज त्या विके्रत्यांना अन्यत्र व्यवसाय करण्यास सांगतो; पण ते ऐकत नाहीत. पालिकेने व्यावसायिकांना पर्यायी जागा देत पार्किंग व वाहतूक सुधारण्यात सहकार्य करणे गरजेचे आहे.- दत्तात्रय गुरव, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक नियंत्रक शाखा, वर्धा.