शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

पारधी आवास योजनेत वर्धा जिल्हा राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:20 IST

मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाºया जिल्हा परिषदेमध्ये मागील वर्षी भाजपाची सत्ता येऊन २१ मार्च रोजी अध्यक्षाची निवड झाली. आज भाजप सत्तेची वर्षपूर्ती झाली.

ठळक मुद्देमिनी मंत्रालयातील सत्तेची वर्षपूर्ती : शेतकऱ्यांसाठी पशु, कृषी तर युवकांकरिता रोजगार मेळावे

ऑनलाईन लोकमतवर्धा : मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाºया जिल्हा परिषदेमध्ये मागील वर्षी भाजपाची सत्ता येऊन २१ मार्च रोजी अध्यक्षाची निवड झाली. आज भाजप सत्तेची वर्षपूर्ती झाली. या एक वर्षात विविध कामे मार्गी लागली आहेत. यात पारधी आवास योजनेत वर्धा जिल्हा नागपूर विभागात तथा राज्यात प्रथम ठरला, हे विशेष! पारधी आवास योजनेत जिल्ह्याला २० घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्याची १०० टक्के पूर्तता करण्यात आली आहे.२०१७-१८ या वित्तीय वर्षात पारधी समाजासाठी आवास योजनेतील २० घरकुल मंजूर करण्यात आले आहे. ही योजना अद्याप राज्यात कुठेही फारशी राबविली गेली नाही. सर्व घरकूल मंजूर करणारा वर्धा जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांच्या नेतृत्वात विविध योजना राबविण्यात आल्या. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलास पात्र लाभार्थी जागेअभावी वंचित राहत होते. ही बाब लक्षात घेत पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसाह्य योजना सुरू केली. यात जागेसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसाह्य केले जाते. याबाबत शासकीय जागेसाठी कारंजा तालुक्यात २०, आर्वी ६ प्रस्ताव मंजूर झालेत. शिवाय आर्वी २ व आष्टी तालुक्यातील २ खासगी जागेचे प्रस्तावही मंजूर केले. निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वळता केला. जीवनोन्नती अभियानांतर्गत पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबविली जात आहे. यातील कौशल्य प्रशिक्षण केंद्र नागपूर व अमरावती येथे असून वर्धा जिल्ह्यातील २८० युवकांना प्रशिक्षण देत २३० युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेत. १६० युवक-युवतींना पुणे, वापी (गुजरात) व औरंगाबाद येथे रोजगार दिले. शासनाच्या कमवा व शिका उपक्रमातून ३१५ मुला-मुलींना विद्यावेतनावर प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध झाला. ६५ युवकांना नागपूर येथे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.जि.प. च्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना आरोग्याची सुविधा मिळावी म्हणून मुख्यमंत्री आरोग्य मॅराथॉन शिबिर घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील २५:१५ चा निधी जि.प. कडे वळविण्यात आला. जि.प. च्या इतिहासात प्रथमच १७ सामूहिकचा तब्बल ४ कोटी ५० लाखांचा निधी सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आला. पं.स. सभापतींना जि.प. च्या विषय समित्यांमध्ये स्थान देत अतिरिक्त वाहन उपलब्ध करून देण्यात आले. शिक्षकांच्या प्रलंबित समस्या बैठका लावून निकाली काढल्या. प्रधानमंत्री आवास योजनेत आदिवासी समाजाचे लक्ष्यांक वाढवून घेतले. राज्यात प्रथमच जि.प. वर्धाने शिक्षण विभागाच्या ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर म्हणून सिनेतारका निशीगंधा वाड यांची नियुक्ती केली आहे. पशुसंवर्धन विभागाद्वारे शेतकºयांसाठी पशु व कृषी मेळावे आयोजित करण्यात आले. महिला बालकल्याण विभागामार्फत महिला व किशोरी मुलींकरिता स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावे घेण्यात आलेत. समाज कल्याणमार्फत जि.प. परिसरात येणाºया दिव्यांग बांधवांकरिता व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या. जिल्ह्यातील ४० पशुचिकित्सालये आएसओ मानांकनास पात्र ठरली असून ३७ जिल्हास्तरावर तर ३ राज्यस्तरावर पात्र ठरले आहेत.सर्व पदाधिकारी, जि.प. सदस्य, खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे. सामान्यांच्या समस्या विचारात घेत त्या सोडविण्याचा व जिल्ह्यात नवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पूढील कार्यकाळात जनतेचे प्रश्न सोडवित त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न राहणार आहे.- नितीन मडावी, अध्यक्ष, जि.प. वर्धा.