शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

पार्सलचे ओझे पुन्हा कर्मचाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:18 IST

रस्ता तिथं एसटी या ब्रीदाप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाची सेवा सुरू आहे. याच सेवेचा एक भाग म्हणून नागरिकांचे विविध वस्तूचे ‘पार्सल’ त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचविण्याचे कामही रापमच्यावतीने केल्या जाते.

ठळक मुद्देरापमचा खासगी कंत्राटदाराशी करार संपला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रस्ता तिथं एसटी या ब्रीदाप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाची सेवा सुरू आहे. याच सेवेचा एक भाग म्हणून नागरिकांचे विविध वस्तूचे ‘पार्सल’ त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचविण्याचे कामही रापमच्यावतीने केल्या जाते. ही सेवा पुरविण्याची जबाबदारी परिवहन महामंडळामार्फत एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आली होती. हा कंत्राट संपला असून त्याचे नुतनीकरण झाले नसल्याने हे पार्सलचे ओझे पुन्हा परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आले आहे.पूर्वी परिवहन महामंडळाची पार्सल विभाग म्हणून एक स्वतंत्र शाखा होती. या शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास हातो असे म्हणत ही शाखा बंद करण्यात आली. मिळकतीचे साधन असलेला हा विभाग बंद करून जमणार नाही असे वाटताच त्याचा कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आला. तो कंत्राट संपला असे परिवहन विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र जीएसटीच्या कारणाने तो संपुष्टात आल्याची चर्चा परिवहन विभागात आहे. नेमके काय याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.वर्धा जिल्ह्यात एकूण पाच आगार आहेत. या पाचही आगारातून ही सेवा सध्या कर्मचाºयांच्या माध्यमातून सुरू आहे. हा कंत्राट संपुष्टात आल्याने नोंदणी झालेल्या नागरिकांचे पार्सल सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पुन्हा कर्मचाºयांवर आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना या कामाचा अनुभव आहे त्यांना पुन्हा या कामात गुंतविण्यात आले आहे. पूर्वी पार्सल विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच या कामात गुंतविल्याचे दिसून आले आहे. यामुळे परिवहन महामंडळाने पार्सलचा नवा कंत्राट करून या कर्मचाऱ्यांना या कामातून मुक्त करावे अशी मागणी होत आहे.संगणकाचे ज्ञान असलेल्यांना अतिरिक्त कामराज्य परिवहन महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना या विभागाचे अतिरिक्त काम देण्यात आले आहे. नागरिकांचे आलेल्या पार्सलची नोंद घेत ते सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. पार्सलमधील साहित्याची अफरातफर हे विभाग बंद करून तो एका खासगी कंपनीला देण्यामागचे एक कारण असल्याची चर्चा आहे. यात कर्मचाऱ्यांना दोष नसताना त्यांना नाहक दंड बसविल्याचा इतिहास आहे. आता पुन्हा हाच प्रकार घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे नवा कंत्राट देत यातून कर्मचाऱ्यांना मुक्त करण्याची मागणी आहे.जुना कत्राट संपल्याने नवा कंत्राट देण्यासंबंधी हालचाली होणे अपेक्षित होते. हा कंत्राट संपून बराच कालावधी होत आहे. असे असताना वरिष्ठ स्तरावर कुठल्याही हालचाली नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे महामंडळाकडून पुन्हा हा भार कर्मचाºयांवरच टाकण्याचे षडयंत्र महामंडळाचे असल्याचा आरोप कर्मचारी करीत आहेत.